





*शंका*- श्रीमहाराज म्हणत, तदाकार वृत्ती भगवंतमय होणे याचे नाव भक्ति!
यातील तदाकार वृत्ति म्हणजे काय...????
आणि सहजावस्था म्हणजे काय...???
यातील तदाकार वृत्ति म्हणजे काय...????
आणि सहजावस्था म्हणजे काय...???

*श्रीराम!* तदाकार वृत्ती हे प्रत्येक साधकाचं ध्येय असतं. तिथपर्यंत पोचण्यासाठीची प्रक्रिया म्हणजे वर लिहिलेलं श्रीमहाराजांचे बोधवचन. आणि तदाकार वृत्ती साधल्यानंतरची अवस्था म्हणजे सहजावस्था!
वर विचारलेल्या तीन शंकेत तीन टप्पे आहेत!
साधनावस्था -> साध्यावस्था -> उत्तरसाध्यावस्था
साधनावस्था -> साध्यावस्था -> उत्तरसाध्यावस्था
*१) साधनावस्था 
साधनावस्थेत नामोच्चारण हा साधनप्रवेश! हळूहळू हे नामोच्चारण नामस्मरणात रुपांतरीत झाले की, नाम उच्चारले की अंतःचक्षूसमोर नामी म्हणजे भगवंत उभा राहील. यांत चित्तात नामाचे ध्यान आणि मनात नामीचे स्मरण ही अवस्था येईल. हेंच श्रीमहाराजांनी वरील बोधवचनांत सांगितलं:
*नाम उच्चारिता कंठी, पुढे उभा जगजेठी ।*
*ऐसे धरूनीया ध्यान, मने करावे चिंतन ।*

साधनावस्थेत नामोच्चारण हा साधनप्रवेश! हळूहळू हे नामोच्चारण नामस्मरणात रुपांतरीत झाले की, नाम उच्चारले की अंतःचक्षूसमोर नामी म्हणजे भगवंत उभा राहील. यांत चित्तात नामाचे ध्यान आणि मनात नामीचे स्मरण ही अवस्था येईल. हेंच श्रीमहाराजांनी वरील बोधवचनांत सांगितलं:
*नाम उच्चारिता कंठी, पुढे उभा जगजेठी ।*
*ऐसे धरूनीया ध्यान, मने करावे चिंतन ।*
*२) साध्यावस्था 
श्रीमहाराजांचे शेवटचे वचन "जेथें नाम तेथें माझें प्राण" ही खूण महाराज = नाम असा संकेत देते. हा संकेत म्हणजे महाराजांची नामाशी तदाकार वृत्ती! तदाकार वृत्तीचं व्यावहारिक उदाहरण बघुया..

श्रीमहाराजांचे शेवटचे वचन "जेथें नाम तेथें माझें प्राण" ही खूण महाराज = नाम असा संकेत देते. हा संकेत म्हणजे महाराजांची नामाशी तदाकार वृत्ती! तदाकार वृत्तीचं व्यावहारिक उदाहरण बघुया..
एखाद्या स्त्रीचं राहणीमान, बोलण्याची पद्धत, जेवणाची सवय इ. विवाह झाल्यावर कालांतरानें पूर्णपणे बदलून जातं. इतकं की तिची अगोदरची बोलण्याची, हसण्याची, ओरडण्याची शैली ही सासरच्या मंडळींसारखी विशेषत्वानें पतीसारखी होते. उदा. नागपुरची मुलगी पुण्यात किंवा पुण्याची मुलगी बेळगावला सून म्हणून गेली की कालांतरानें तिचं वागणं, बोलणं एक नवीन आकार घेतं.
आणि मग एक दिवस सासू किंवा आणखी कुणीतरी म्हणतं की या घरची सून किंवा अमक्याची पत्नी बरोबर शोभते. याचा अर्थ त्या स्त्रीचं अंतरंग, बहिरंग पालटून जातं. या वृत्तीला तदाकार वृत्ती म्हणतात. ही तदाकार वृत्ती होण्याचं कारण म्हणजे त्या स्त्रीचं समर्पण आणि पतीच्या आवडी-निवडीचा मनांतून स्विकार! हे जसं व्यवहारात घडतं, तसंच परमार्थात साधकानें आपल्या सद्गुरूंना समर्पित होऊन त्यांच्या आवडी-निवडीचा मनांतून स्विकार केला की साधकाचं अंतरंग व बहिरंग पालटून जी वृत्ती तयार होते, तिला तदाकार वृत्ती म्हणतात! आणि ही वृत्ती झाली की तो साधक साधक न राहता राहता सद्गुरूंशी एकरूप होतो, भगवंताशी एकनिष्ठ होतो आणि म्हणतो,
*पतिव्रतेजैसा भ्रतार प्रमाण ।* *आम्हा नारायण तैशापरी ।।*
ही तदाकार वृत्ती आपली सुद्धां व्हावी असं वाटत असल्यास सद्गुरूंची आवड ती माझी आवड आणि सद्गुरूंची नावड ती माझी नावड झाली पाहिजे. सद्गुरूंना द्वेष, मत्सर, क्रोध, मानाची हौस, वासना यांची नावड असते, तसं माझं झालं पाहिजे. आणि सद्गुरूंची आवड एकच : नाम सदा बोलावें, गावे भावे जनांसी सांगावें।
ही माझी आवड झाली की तदाकार वृत्ती झाली!
*ध्यानीं ध्याता पंढरीराया, मनेसहित पालटे काया।।* असं घडलं तर एक दिवस कुणीतरी म्हणेल *'महाराजांचा शिष्य शोभतो'!* आपल्याकडे पाहून सामान्य माणसाला देखील असं वाटणं, ही आपल्या जीवनाची इतिकर्तव्यता आहे!
*पतिव्रतेजैसा भ्रतार प्रमाण ।* *आम्हा नारायण तैशापरी ।।*
ही तदाकार वृत्ती आपली सुद्धां व्हावी असं वाटत असल्यास सद्गुरूंची आवड ती माझी आवड आणि सद्गुरूंची नावड ती माझी नावड झाली पाहिजे. सद्गुरूंना द्वेष, मत्सर, क्रोध, मानाची हौस, वासना यांची नावड असते, तसं माझं झालं पाहिजे. आणि सद्गुरूंची आवड एकच : नाम सदा बोलावें, गावे भावे जनांसी सांगावें।
ही माझी आवड झाली की तदाकार वृत्ती झाली!
*ध्यानीं ध्याता पंढरीराया, मनेसहित पालटे काया।।* असं घडलं तर एक दिवस कुणीतरी म्हणेल *'महाराजांचा शिष्य शोभतो'!* आपल्याकडे पाहून सामान्य माणसाला देखील असं वाटणं, ही आपल्या जीवनाची इतिकर्तव्यता आहे!
*३) सहजावस्था 
साधकानें साधनावस्था जीवेभावे सांभाळून साध्याप्रत पोचला की ही तदाकार वृत्ती अनुभवता येते. परंतु, साध्य गाठल्यावर पुढची पायरी म्हणजे उत्तरसाध्यावस्था! या अवस्थेत साधक साध्य गाठुनही साधना सोडत नाही. किंबहुना ती साधनाच त्याची पाठ सोडत नाही. मात्र आता ही साधना करावी लागत नाहीं, ती आपोआप होत राहते. नाम घ्यावं लागत नाहीं, नामस्मरण आपोआप होऊ लागतं. असं प्रयत्न न करता नकळत सहज नामस्मरण होण्याची अवस्था म्हणजे 'सहजावस्था'! *राम हमारा जप करे, हम बैठे आराम।।* ही समाधानाची सहज अवस्था म्हणजे सहजसमाधी! आणि हे सर्व टप्पे पार करण्यासाठी,
*चालता बोलता, धंदा करिता । खाता जेविता सुखी होता ।*
*नाना उपभोग भोगिता । नाम विसरू नयें ।।*

साधकानें साधनावस्था जीवेभावे सांभाळून साध्याप्रत पोचला की ही तदाकार वृत्ती अनुभवता येते. परंतु, साध्य गाठल्यावर पुढची पायरी म्हणजे उत्तरसाध्यावस्था! या अवस्थेत साधक साध्य गाठुनही साधना सोडत नाही. किंबहुना ती साधनाच त्याची पाठ सोडत नाही. मात्र आता ही साधना करावी लागत नाहीं, ती आपोआप होत राहते. नाम घ्यावं लागत नाहीं, नामस्मरण आपोआप होऊ लागतं. असं प्रयत्न न करता नकळत सहज नामस्मरण होण्याची अवस्था म्हणजे 'सहजावस्था'! *राम हमारा जप करे, हम बैठे आराम।।* ही समाधानाची सहज अवस्था म्हणजे सहजसमाधी! आणि हे सर्व टप्पे पार करण्यासाठी,
*चालता बोलता, धंदा करिता । खाता जेविता सुखी होता ।*
*नाना उपभोग भोगिता । नाम विसरू नयें ।।*
*("नामप्रेम" पुस्तकातून साभार)*


No comments:
Post a Comment