Wednesday, December 13, 2017

नामस्मरणात मनावर नियंत्रण कसे ठेवायचे?

 🌹🌷 नामप्रेमचिंतन  🌹🌷

शंका - अखंड नामस्मरण करायचे ठरवले तरी एक ५ मिनीट होते परत मन कधी इतर विचार करायला लागतो कळतच नाही परत खुप कालाने लक्षात येतं की आपण विचारात गुंग झालोय कसे काय मनावर नियंत्रण ठेवायचे??


श्रीराम!
यात दोन शब्द महत्त्वाचे आहेत. स्मरण आणि अखंड!
असे अखंड स्मरण राहण्यास आपण नाम घेतो. तेव्हा नाम घेणे म्हणजेच स्मरण राहणे. त्यासाठी विचारांची दिशा बदलली पाहिजे!
दिशा बदलणे म्हणजे प्रत्येक दिवसभरातल्या गोष्टींचा जास्तीत जास्त संबंध भगवंताशी जोडणे. यासाठी 'भगवंत' हे आपले ध्येय व्हायला हवे. ध्येय आहे पैसा मिळवणे (किंवा इतर अनंत ध्येये असू शकतील)आणि इच्छा आहे अखंड स्मरणाची असे झाल्यास हे साधणे थोडे अवघड आहे.
मुख्यतः नामाची अडचण थोडीशी अशी आहे की नाम सूक्ष्मातले आहे आणि आपण स्थूलात आहोत!
त्यामुळे नाम चालण्यासाठी जी शक्ती लागते ती बौद्धिक शक्ती नसून अध्यात्मिक शक्ती आहे!
या अध्यात्मिक शक्तीचा साठा होण्यास वेळ लागतो.
ही 2-4 महिन्यात साधणारी गोष्ट नाही. याला चिकाटी+ अभ्यास+ सद्गुरुंची कळवळून प्रार्थना आणि त्यांच्या कृपेचा ओघ जाणण्यासाठी पुन्हा त्यांची कृपा लागते
एक छोटं उदाहरण बघा,
महाराजांकडे एक भक्त यायचे. वय 80 वर्षे. त्यांचा दिवसातून 20 तास जप व्हायचा!!! पण ते महाराजांना काय मागायचे तर *"महाराज, माझी नामाची निष्ठा तयार करा!"*
तेव्हा नामाची निष्ठा तयार होणे हे आपले ध्येय आहे! ते सतत नज़रे समोर ठेवून नाम घ्यावे!
दुसरी गोष्ट तू विचारलीस की मन ताब्यात आणायला काय करावं?
याबद्दल कान्हनगड चे स्वामी रामदास जे सांगतात ते मला फार आवडतं! (अर्थात आपले महाराजही तेच सांगतात म्हणूनच ते भावलं)
मी मन ताब्यात आणलंच नाही कधी! नाम घेता घेता एक दिवस मन नाहीसंच झालं!
That’s our aim!
तुम्ही फक्त नाम घ्या ते विवेक वैराग्य मी बघून घेतो, असं महाराज म्हणालेत ना! हे अक्षरशः खरं आहे!
तेव्हा त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून नाम घेत रहावं! अखंड नाम कधी राहू लागेल समजायचंही नाही असं वाटतं!

("नामप्रेम" पुस्तकातून साभार)

 जानकी जीवन स्मरण जय जय राम 

No comments:

Post a Comment