🌹🌷🌹" नामप्रेमचिंतन " 🌹🌷🌹
शंका- रामी रंगले त्रिभुवन । जडमूढ काष्ठ पाषाण ।
घटमठांत सर्वात परिपूर्ण । त्याहून वेगळा राहिला ।।
यावर चिंतन घडावं, अशी विनंती आहे.
➡
श्रीराम! सकल जीवांचा सांभाळ करणारा रामराया माझ्या पाठीशी सदैव रहावा, या सदिच्छेने केलेले कवन म्हणजे "श्रीराम पाठ"! जीव सृष्टी केवळ पृथ्वीवरच नसून मंगळ, चंद्रादी ग्रहावरदेखील असेल असं संशोधन करणाऱ्या आधुनिक शास्त्रज्ञांनी विज्ञानासोबत अध्यात्मज्ञान चिंतनात घेतलं तर विज्ञानाचे सर्व प्रश्न सहज सुटतील. यासाठी अध्यात्मज्ञानविश्वातील एक अतिशय महत्त्वाचं सूत्र म्हणजे "रामी रंगले त्रीभुवन"!
अवकाशात अगणित सूर्यमाला आहेत, हे आजच्या विज्ञानवादी पंडितांनी मान्य केलं आहे. ज्याअर्थी, एवढे अनंत ब्रम्हांड आहेत आणि त्यात अनंतकोटी ग्रह निर्माण आणि नष्ट होण्याची क्रिया सुरू आहे, त्याअर्थी या क्रिया करणारी नक्कीच कोणती तरी महासत्ता असली पाहिजे. ही सत्ता कोणती हे विज्ञानवादी पंडितांना कळले नसले तरी संतांना मात्र कळले आहे, अनुभवाला, प्रचितीला आले आहे. वृक्षाचेही पान हाले ज्याची सत्ता। असं म्हणणाऱ्या संतमंडळींनी नेहमी अनंतकोटी ब्रम्हांडाचा नायक, कर्ता करविता म्हणजे परब्रम्ह परमात्मा आहे, हे आत्मप्रचितीनें सांगितलं आहे!
तेंव्हा, रामी रंगले त्रीभुवन असें वरील ओवीत म्हणत असतांना परब्रम्ह परमात्मा श्रीरामाचं सुप्त चैतन्य त्रीभुवनी भरून आहे, हा स्पष्ट संकेत केलेला आहे! त्रीभुवन रामानें रंगले, भरले आहे याचा पुरावा म्हणजे केवळ मनुष्यांतच नाही तर जडमुढ, काष्ठ, पाषाण या सर्वांमध्ये त्याचीच शक्ती भरलेली आहे. जडमुढ म्हणजे ज्याची मती सत् तत्वाबद्दल अनभिज्ञ आहे, असा! एखादा मनुष्य किंवा मुलगा विचित्र वागू लागला तर आपण म्हणतो की, तो माकडचाळे करतोय. म्हणजे माकड जसं जडमुढ असतं तसा हा वागतोय! परंतु, अशाच एका जडमुढ माकडातील रामतत्व, सत् तत्व जागृत झालं, तेंव्हा तो मर्कट एक चिरंजीव आणि त्रीभुवनी श्रेष्ठ राम-दास हनुमंत म्हणून प्रगट झाला!
फारच गोड प्रसंग आहे तो! जेंव्हा, परब्रम्ह परमात्मा श्रीरामाची आणि लौकिक अर्थाने जडमुढ असणाऱ्या माकडाची औपचारिक अशी पहिली भेट झाली. आपल्याला तो प्रसंग माहीतच आहे. सुग्रीवाने आपल्या प्रदेशात फिरणारे क्षत्रिय परंतू वल्कल वेषातील दोन तरूण कोण आहेत, याचा अंदाज घेण्यासाठी आपल्या एका विश्वासू मंत्र्याला पाठवले. हा मंत्री जन्माने वानर असल्याने ओळखू येऊ नयें म्हणून विप्रवेष घेतला आणि रामलक्ष्मणासमोर आला. त्यानें आपल्या संस्कृत भाषेतील वाक्चातुर्यानें रामरायाला प्रभावित केले. परंतु, जेंव्हा हे दोन तरूण कुणी शत्रुपक्षाचे गुप्तहेर नसून प्रत्यक्ष शेष व नारायण आहेत, हे समजल्यावर रामरायाला आपलं मूळ वानररूपात येऊन लोटांगन घातलं!
तेंव्हा, डोळ्यांत पाणी येऊन हनुमंत म्हंटले, "हे राघव, मी तर जढमती वानरच! आपल्याला ओळखू शकलो नाही. परंतु, आपण आपल्या या अनादी भक्ताला ओळखायला का वेळ लावला?"
तेंव्हा, श्रीराम म्हंटले, "मी तर तुला बघितल्याबरोबर ओळखलं. पण तुझ्या व्याकरणदृष्ट्या निर्दोष पण अतिशय गोड संस्कृत वचनाला मी भाळलो. तुला माझी खरी ओळख अगोदरच दिली असती तर तुझं वाक् चातुर्य मला लाभलं नसतं ना!" आणि मग रामरायानें जडमुढ वाटणाऱ्या हनुमंतावर पूर्ण कृपा करून त्याच्या रुपानें रामतत्व चिरंजीव केले! अशाप्रकारे, त्रीभुवन रामी रंगले म्हणतांना त्रीभुवनातील जडमुढ वाटणाऱ्या जीवातील सत् तत्व रामी रंगल्याचा हा पुरावा!
वानर हे जडमुढ असलं तरी त्यात सत् तत्व असतंच. परंतु, एखादं लाकुड बघितलं तर ते रामनिर्मित असल्याने सत् असेल, पण ते अचेतन असतं. त्यात चेतना म्हणजे चैतन्य नसतं! परंतु, प्रल्हादासारखा एखादा अनन्य भक्त असेल तर आपल्या नामनिष्ठेच्या आणि श्रद्धेच्या जोरावर अचेतन काष्ठातून सुद्धा नारायणाचं चैतन्य प्रगट करू शकतो! हाकेसरशी उडी घालोनि स्तंभ फोडी! याप्रमाणें त्रीभुवन रामी रंगले की ते वाटेल तिथून प्रगट होऊ शकते! त्याला आवाहन करणारा मात्र प्रल्हादनिष्ठेचाच असावा!
जडमुढ वानरातील भगवद्तत्व, काष्ठाच्या खांबातील भगवद्तत्व आपण पाहीलं. आता, वरील ओवीतील पाषाणाचं उदाहरण बघुया. पाषाणातील भगवद्तत्व प्रगट होण्याचा प्रसंग चिंचवड प्रवचनांत आपण पाहिला होता. राम लक्ष्मण विश्वामित्रांबरोबर मिथिलेत आले तेंव्हा जनक महाराज आपले कुलगुरू शतानंद मुनींसोबत विश्वामित्रांच्या स्वागताला गेले होते.
हे दोन तरूण पाहून विरागी जनक महाराज त्यांच्या प्रेमात पडलेच, पण जेंव्हा राम लक्ष्मणाचा परिचय विश्वामित्रांनी करून दिला, तेंव्हा शतानंद मुनी भावविभोर होऊन अश्रू गाळू लागले.
दुसऱ्या दिवशी जेंव्हा शतानंद मुनी जेंव्हा पुन्हा रामासमोर आले तेंव्हा पुन्हा डोळे पाणावले. असं प्रत्येक वेळी झालं. लक्ष्मणाला काही कळेना. विवाहानंतर लक्ष्मणानें शतानंद मुनींना एकांतात विचारलं, तुम्ही दरवेळी राघवाला बघून प्रेमापोटी अश्रू गाळता का? मुनी म्हंटले, "लक्ष्मणा, हे अश्रू केवळ प्रेमाचेच नसून कृतज्ञतेचे आहेत. रामरायाचे माझ्या कुटुंबावर फार उपकार आहेत. हे अश्रू त्या कृतज्ञतेचे आहेत."
"कोणता उपकार?"
लक्ष्मणा, रामाने माझ्या आईवडिलांना एकत्र आणलं!
लक्ष्मणाने विचारलं तुम्ही कोण आहात?
मुनी म्हंटले, "मी सती अहिल्या व गौतम ऋषींचा पुत्र आहे! माझ्या पित्याच्या शापाने माझी माता शिळा बनल्यावर सर्वांनी तो आश्रम, ते वन सोडून दिलं.नंतर तिथे एकही फुल, फळ आलं नाही. माझी माता जशी पाशाण बनली, तसं ते संपूर्ण वन पाषाणासारखं अचेतन होऊन पडलं होतं. रामरायानें त्या पाषाणाला आपले चरणरज लावून माझ्या मातेला लागलेला कलंक पुसला! लक्ष्मणा, हे अश्रू त्या कृतज्ञतेचे आहेत!
श्रीराम चरणरजानें पाषाणातील सुप्त चैतन्य जागृत झाल्याचा अहिल्येला आनंद झाला! अशाप्रकारे, जडमुढ वानरातील सत्, स्तंभाच्या काष्ठातील चिद् आणि पाषाणरुपी सती अहिल्येला आनंद देणारा परब्रम्ह परमात्मा हा स्वतः सच्चिदानंद असल्याने त्यानें निर्माण केलेल्या त्रीभुवनी त्याच्याच सच्चिदानंद तत्वाचा रंग भरलेला आहे!
घटाकाश असो की मठाकाश असो की महदाकाश असो, या सर्व ठिकाणी व्यापूनही जे निर्गूण निराकार रामतत्व उरलं आहे, ते सद्गुरू रुपानें आपल्याला सगुणात लाभलं आहे!
उरला तोचि सद्गुरू माझा । सगुणरुपे नटला, सगुणरुपे नटला । श्रीरामी आराम, जपे नाम मंगला ।।
सतत नामांत राहिल्यानेच ते रामरायाचं सच्चिदानंद तत्व आपल्यात प्रगट होईल, यांत मुळीच संशय नाही!
("नामप्रेम" पुस्तकातून साभार)
🙏 जानकी जीवन स्मरण जय जय राम 🙏
शंका- रामी रंगले त्रिभुवन । जडमूढ काष्ठ पाषाण ।
घटमठांत सर्वात परिपूर्ण । त्याहून वेगळा राहिला ।।
यावर चिंतन घडावं, अशी विनंती आहे.
➡
श्रीराम! सकल जीवांचा सांभाळ करणारा रामराया माझ्या पाठीशी सदैव रहावा, या सदिच्छेने केलेले कवन म्हणजे "श्रीराम पाठ"! जीव सृष्टी केवळ पृथ्वीवरच नसून मंगळ, चंद्रादी ग्रहावरदेखील असेल असं संशोधन करणाऱ्या आधुनिक शास्त्रज्ञांनी विज्ञानासोबत अध्यात्मज्ञान चिंतनात घेतलं तर विज्ञानाचे सर्व प्रश्न सहज सुटतील. यासाठी अध्यात्मज्ञानविश्वातील एक अतिशय महत्त्वाचं सूत्र म्हणजे "रामी रंगले त्रीभुवन"!
अवकाशात अगणित सूर्यमाला आहेत, हे आजच्या विज्ञानवादी पंडितांनी मान्य केलं आहे. ज्याअर्थी, एवढे अनंत ब्रम्हांड आहेत आणि त्यात अनंतकोटी ग्रह निर्माण आणि नष्ट होण्याची क्रिया सुरू आहे, त्याअर्थी या क्रिया करणारी नक्कीच कोणती तरी महासत्ता असली पाहिजे. ही सत्ता कोणती हे विज्ञानवादी पंडितांना कळले नसले तरी संतांना मात्र कळले आहे, अनुभवाला, प्रचितीला आले आहे. वृक्षाचेही पान हाले ज्याची सत्ता। असं म्हणणाऱ्या संतमंडळींनी नेहमी अनंतकोटी ब्रम्हांडाचा नायक, कर्ता करविता म्हणजे परब्रम्ह परमात्मा आहे, हे आत्मप्रचितीनें सांगितलं आहे!
तेंव्हा, रामी रंगले त्रीभुवन असें वरील ओवीत म्हणत असतांना परब्रम्ह परमात्मा श्रीरामाचं सुप्त चैतन्य त्रीभुवनी भरून आहे, हा स्पष्ट संकेत केलेला आहे! त्रीभुवन रामानें रंगले, भरले आहे याचा पुरावा म्हणजे केवळ मनुष्यांतच नाही तर जडमुढ, काष्ठ, पाषाण या सर्वांमध्ये त्याचीच शक्ती भरलेली आहे. जडमुढ म्हणजे ज्याची मती सत् तत्वाबद्दल अनभिज्ञ आहे, असा! एखादा मनुष्य किंवा मुलगा विचित्र वागू लागला तर आपण म्हणतो की, तो माकडचाळे करतोय. म्हणजे माकड जसं जडमुढ असतं तसा हा वागतोय! परंतु, अशाच एका जडमुढ माकडातील रामतत्व, सत् तत्व जागृत झालं, तेंव्हा तो मर्कट एक चिरंजीव आणि त्रीभुवनी श्रेष्ठ राम-दास हनुमंत म्हणून प्रगट झाला!
फारच गोड प्रसंग आहे तो! जेंव्हा, परब्रम्ह परमात्मा श्रीरामाची आणि लौकिक अर्थाने जडमुढ असणाऱ्या माकडाची औपचारिक अशी पहिली भेट झाली. आपल्याला तो प्रसंग माहीतच आहे. सुग्रीवाने आपल्या प्रदेशात फिरणारे क्षत्रिय परंतू वल्कल वेषातील दोन तरूण कोण आहेत, याचा अंदाज घेण्यासाठी आपल्या एका विश्वासू मंत्र्याला पाठवले. हा मंत्री जन्माने वानर असल्याने ओळखू येऊ नयें म्हणून विप्रवेष घेतला आणि रामलक्ष्मणासमोर आला. त्यानें आपल्या संस्कृत भाषेतील वाक्चातुर्यानें रामरायाला प्रभावित केले. परंतु, जेंव्हा हे दोन तरूण कुणी शत्रुपक्षाचे गुप्तहेर नसून प्रत्यक्ष शेष व नारायण आहेत, हे समजल्यावर रामरायाला आपलं मूळ वानररूपात येऊन लोटांगन घातलं!
तेंव्हा, डोळ्यांत पाणी येऊन हनुमंत म्हंटले, "हे राघव, मी तर जढमती वानरच! आपल्याला ओळखू शकलो नाही. परंतु, आपण आपल्या या अनादी भक्ताला ओळखायला का वेळ लावला?"
तेंव्हा, श्रीराम म्हंटले, "मी तर तुला बघितल्याबरोबर ओळखलं. पण तुझ्या व्याकरणदृष्ट्या निर्दोष पण अतिशय गोड संस्कृत वचनाला मी भाळलो. तुला माझी खरी ओळख अगोदरच दिली असती तर तुझं वाक् चातुर्य मला लाभलं नसतं ना!" आणि मग रामरायानें जडमुढ वाटणाऱ्या हनुमंतावर पूर्ण कृपा करून त्याच्या रुपानें रामतत्व चिरंजीव केले! अशाप्रकारे, त्रीभुवन रामी रंगले म्हणतांना त्रीभुवनातील जडमुढ वाटणाऱ्या जीवातील सत् तत्व रामी रंगल्याचा हा पुरावा!
वानर हे जडमुढ असलं तरी त्यात सत् तत्व असतंच. परंतु, एखादं लाकुड बघितलं तर ते रामनिर्मित असल्याने सत् असेल, पण ते अचेतन असतं. त्यात चेतना म्हणजे चैतन्य नसतं! परंतु, प्रल्हादासारखा एखादा अनन्य भक्त असेल तर आपल्या नामनिष्ठेच्या आणि श्रद्धेच्या जोरावर अचेतन काष्ठातून सुद्धा नारायणाचं चैतन्य प्रगट करू शकतो! हाकेसरशी उडी घालोनि स्तंभ फोडी! याप्रमाणें त्रीभुवन रामी रंगले की ते वाटेल तिथून प्रगट होऊ शकते! त्याला आवाहन करणारा मात्र प्रल्हादनिष्ठेचाच असावा!
जडमुढ वानरातील भगवद्तत्व, काष्ठाच्या खांबातील भगवद्तत्व आपण पाहीलं. आता, वरील ओवीतील पाषाणाचं उदाहरण बघुया. पाषाणातील भगवद्तत्व प्रगट होण्याचा प्रसंग चिंचवड प्रवचनांत आपण पाहिला होता. राम लक्ष्मण विश्वामित्रांबरोबर मिथिलेत आले तेंव्हा जनक महाराज आपले कुलगुरू शतानंद मुनींसोबत विश्वामित्रांच्या स्वागताला गेले होते.
हे दोन तरूण पाहून विरागी जनक महाराज त्यांच्या प्रेमात पडलेच, पण जेंव्हा राम लक्ष्मणाचा परिचय विश्वामित्रांनी करून दिला, तेंव्हा शतानंद मुनी भावविभोर होऊन अश्रू गाळू लागले.
दुसऱ्या दिवशी जेंव्हा शतानंद मुनी जेंव्हा पुन्हा रामासमोर आले तेंव्हा पुन्हा डोळे पाणावले. असं प्रत्येक वेळी झालं. लक्ष्मणाला काही कळेना. विवाहानंतर लक्ष्मणानें शतानंद मुनींना एकांतात विचारलं, तुम्ही दरवेळी राघवाला बघून प्रेमापोटी अश्रू गाळता का? मुनी म्हंटले, "लक्ष्मणा, हे अश्रू केवळ प्रेमाचेच नसून कृतज्ञतेचे आहेत. रामरायाचे माझ्या कुटुंबावर फार उपकार आहेत. हे अश्रू त्या कृतज्ञतेचे आहेत."
"कोणता उपकार?"
लक्ष्मणा, रामाने माझ्या आईवडिलांना एकत्र आणलं!
लक्ष्मणाने विचारलं तुम्ही कोण आहात?
मुनी म्हंटले, "मी सती अहिल्या व गौतम ऋषींचा पुत्र आहे! माझ्या पित्याच्या शापाने माझी माता शिळा बनल्यावर सर्वांनी तो आश्रम, ते वन सोडून दिलं.नंतर तिथे एकही फुल, फळ आलं नाही. माझी माता जशी पाशाण बनली, तसं ते संपूर्ण वन पाषाणासारखं अचेतन होऊन पडलं होतं. रामरायानें त्या पाषाणाला आपले चरणरज लावून माझ्या मातेला लागलेला कलंक पुसला! लक्ष्मणा, हे अश्रू त्या कृतज्ञतेचे आहेत!
श्रीराम चरणरजानें पाषाणातील सुप्त चैतन्य जागृत झाल्याचा अहिल्येला आनंद झाला! अशाप्रकारे, जडमुढ वानरातील सत्, स्तंभाच्या काष्ठातील चिद् आणि पाषाणरुपी सती अहिल्येला आनंद देणारा परब्रम्ह परमात्मा हा स्वतः सच्चिदानंद असल्याने त्यानें निर्माण केलेल्या त्रीभुवनी त्याच्याच सच्चिदानंद तत्वाचा रंग भरलेला आहे!
घटाकाश असो की मठाकाश असो की महदाकाश असो, या सर्व ठिकाणी व्यापूनही जे निर्गूण निराकार रामतत्व उरलं आहे, ते सद्गुरू रुपानें आपल्याला सगुणात लाभलं आहे!
उरला तोचि सद्गुरू माझा । सगुणरुपे नटला, सगुणरुपे नटला । श्रीरामी आराम, जपे नाम मंगला ।।
सतत नामांत राहिल्यानेच ते रामरायाचं सच्चिदानंद तत्व आपल्यात प्रगट होईल, यांत मुळीच संशय नाही!
("नामप्रेम" पुस्तकातून साभार)
🙏 जानकी जीवन स्मरण जय जय राम 🙏
No comments:
Post a Comment