





*शंका*- जय श्रीराम. साधकाने दीन असावं, लीन असावं असं श्रीमहाराज म्हणत. याचा नेमका अर्थ काय?




श्रीराम!
*"देयम् दीन जनाय च वित्तम्"* असं शंकराचार्यांचं एक सुंदर वचन आहे. वित्त केवळ दीन असेल त्यालाच दिलं जावं, हा त्याचा अर्थ....
*"देयम् दीन जनाय च वित्तम्"* असं शंकराचार्यांचं एक सुंदर वचन आहे. वित्त केवळ दीन असेल त्यालाच दिलं जावं, हा त्याचा अर्थ....
दीन कोण ज्याच्यात दैन्य आहे. हे दैन्य दोन तऱ्हेने येतं...
पहिली तऱ्हा आपली: आपण प्रपंच, व्यवहार अत्यंच चोखपणे करतो. परंतु, परमार्थ केवळ दार्शनिकदृष्ट्या करतो. प्रपंचांत आकंठ बुडून परमार्थ नावापुरता केल्यानें *"तुका म्हणे त्यासी दोहींकडे धक्का, शेवटी तो नरकामाजी पडे"* अशी दयनीय अवस्था होते. याला दैन्य म्हणतात. प्रपंच मुळात अपुर्णात्वातून आलेला असल्यानें त्याला पूर्णपणे वाहून घेतलं की जी तोंडघशी पडण्याची परिस्थिती उद्भवते, तिला दैन्यावस्था म्हणावं. अशा स्थितीत काहीतरी (नावापुरता) परमार्थ करून तिकडेसुद्धां समाधान मिळत नाही....
दुसरी तऱ्हा: प्रपंचाचं अपुर्णत्व अगोदरच ओळखून त्यात केवळ देहानें राहून मन पारमार्थिक वाटचाल करत असेल तर त्याला प्रापंचिक दैन्यावस्था येते. यालाच अध्यात्म शास्त्रात "वैराग्य" म्हणतात...
दैन्यावस्थेच्या पहिल्या तऱ्हेचं उदाहरण आरशात बघावं.
दुसऱ्या दैन्यावस्थेचं म्हणजे वैराग्याचं एक जबरदस्त उदाहरण म्हणजे प.पु. रामानंद महाराज उर्फ पु. पांडुरंगबुवा...
ह्या सत्पुरूषाची आज पुण्यतिथी आहे, तेंव्हा, त्यांच्या चरित्राचा गाभा म्हणजे वैराग्य, दीनता बघुया! ही दीनता शेवटी लीनतेत कशी गेली, या यात्रेचा आढावा....
*बालपणीच वैराग्य प्रखर ते ।*
*गुरूकृपा ही झाली वरते ।।*
असं पु. रामानंद महाराजांचं वर्णन आहे.
*गुरूकृपा ही झाली वरते ।।*
असं पु. रामानंद महाराजांचं वर्णन आहे.
बालवयांतच घर सोडून काशीला आले. काशीला बापुजी उपाध्ये नावाचें सद्गृहस्थ या तेजस्वी मुलाला म्हंटलें, "मी तुम्हाला स्वप्नांत बघितलं आहे. विश्वेश्वराच्या आज्ञेनें मी आपली चातुर्मास अनुष्ठानांत मदत करेल"!
या बाल पांडुरंगानें दुसऱ्या दिवशी कपडे वगैरे दान करून लंगोटी नेसून अनुष्ठान सुरू केलं. मनिकर्णिका घाटावर प्रातःस्नान, दुपारपर्यंत गायत्रीजप, नंतर भिक्षा, नैवेद्यारती, दुपारी ग्रंथवाचन, नामस्मरण, रात्री गोड भजन याप्रकारें चार महिने सर्व चाललं...
समाप्तीच्या दिवशी सहस्त्रभोजन झाल्यावर या तपस्वी पांडुरंगाला एका महात्म्यानें दर्शन दिलें: हातात तुळशी माळ, पायांत खडावा, कमरेला लंगोटी, भाळावर त्रिपुंड अशी गौर मुर्ती दिसली!
या मुर्तीचं वर्णन याच पांडुरंगानें नंतर एक अभंग रचून केलं:
*गौरवर्ण कांती, मुर्तीमंत शांती ।*
*दयाक्षमा शोभे चित्ती ।।*
या मुर्तीनें पांडुरंगाला गोदातिरी जाऊन दिक्षेसाठी जायला सांगितलें.
*गौरवर्ण कांती, मुर्तीमंत शांती ।*
*दयाक्षमा शोभे चित्ती ।।*
या मुर्तीनें पांडुरंगाला गोदातिरी जाऊन दिक्षेसाठी जायला सांगितलें.
म्हणून मग ते राक्षसभुवनजवळ गोदातिरी आले. तिथें पु. अंबादास महाराजांचं दर्शन झालं. त्यांनी समर्थांनी दिलेल्या दृष्टांतानुसार पांडुरंगाला दिक्षा देऊन त्याचं नाव ठेवलं "रामानंद"!
आणि पुढे अंबादास महाराज म्हंटले, "माझ्याकडून एवढंच मिळणार. तुझं पुर्ण काम मारुती अंशावतार सद्गुरू श्री ब्रम्हचैतन्य महाराज गोंदवले येथे होईल. म्हणून तू आता जालन्याला जा!"
त्यावेळी रामानंदाचं वय होतं १६ वर्ष!
त्यानुसार जालन्याला स्टेशनजवळ आल्यावर श्रीराम मंदीरात आले आणि रामरायाचं दर्शन घेतलं. त्यावेळी तिथे पु. आनंदसागर महाराज होते. त्यांनी मग रामानंदांना गोंदवल्याला नेलें....
त्यावेळी रामानंदाचं वय होतं १६ वर्ष!
त्यानुसार जालन्याला स्टेशनजवळ आल्यावर श्रीराम मंदीरात आले आणि रामरायाचं दर्शन घेतलं. त्यावेळी तिथे पु. आनंदसागर महाराज होते. त्यांनी मग रामानंदांना गोंदवल्याला नेलें....
श्रीमहाराजांना बघितल्याबरोबर रामानंद चित्रासारखे उभे राहिले. श्रीमहाराजांनी जवळ बोलावून कुरवाळले. अत्यंत आनंद वाटला. श्रीमहाराज त्यांना प्रेमानं बुवा, पांडुरंगबुवा म्हणत!
काही दिवसानंतर श्रीमहाराजांनी त्यांना चार महिने एक खडतर असं असिधारा व्रत करायला सांगितलं...
असिधारा व्रत म्हणजे तलवारीच्या धारेवर चालण्यासारखं खडतर व्रत!
यात श्रीमहाराजांनी त्यांना एक वस्त्र दिलं, तेवढंच वापरायचं, पायी तिर्थयात्रा करायची, कोणतंही भांड न वापरता ७ घरी कोरान्न भिक्षा मागून रामरायाला नैवेद्य दाखवायचा. रोज रात्री भोजन, दिवसभर मौनजप, इ. चार महिने करायचं...
असिधारा व्रत म्हणजे तलवारीच्या धारेवर चालण्यासारखं खडतर व्रत!
यात श्रीमहाराजांनी त्यांना एक वस्त्र दिलं, तेवढंच वापरायचं, पायी तिर्थयात्रा करायची, कोणतंही भांड न वापरता ७ घरी कोरान्न भिक्षा मागून रामरायाला नैवेद्य दाखवायचा. रोज रात्री भोजन, दिवसभर मौनजप, इ. चार महिने करायचं...
पांडुरंगबुवांनी सर्व मनोभावें केलं. परंतु, शेवटच्या दिवशी पंढरपुरात भिक्षा जास्त आल्यानें १५ पानगे तयार झालें. दररोज एकच पानगा खाल्ला. आज वाटेवर ५ पानगे आले. एकच खाऊन इतर चंद्रभागेत समर्पण करणार, इतक्याच एक अतिथी आला. भुक लागली म्हंटल्यावर पांडुरंगबुवांनी बनवलेले पानगे दिलें. ४ पानग्यात अतिथी तृप्त!
अशा तऱ्हेने हे व्रत समाप्त झाल्यावर बुवा गोंदवल्याला परत आले आणि सद्गुरूंचें चरणी लोटांगण घातलं. श्रीमहाराजांनी पोटाशी धरून म्हंटलं, 'धन्य बुवा!'
काही दिवसानंतर भोजनाचें वेळी श्रीमहाराज म्हंटलें, 'भूक लागली आहे. परंतु, पांडुरंगबुवांनी जर पानगे बनवलें तर मी चार पानगे खाईल!'
हे ऐकून बुवांचं ह्रदय भरून आलं.
नंतर श्रीमहाराजांनी बुवांना कफनी, टोपी, कुबडी, माळ दिली आणि डोक्यावर वरदहस्त ठेवून रामप्रसार करण्यास सांगितलं....
पु. आनंदसागर महाराजांनी रामानंदांना श्रीमहाराजचरणीं आणल्यावर त्यांच्या वैराग्यप्रधान भक्तीचं तेज उत्तरोत्तर वाढत गेलं....
हे ऐकून बुवांचं ह्रदय भरून आलं.
नंतर श्रीमहाराजांनी बुवांना कफनी, टोपी, कुबडी, माळ दिली आणि डोक्यावर वरदहस्त ठेवून रामप्रसार करण्यास सांगितलं....
पु. आनंदसागर महाराजांनी रामानंदांना श्रीमहाराजचरणीं आणल्यावर त्यांच्या वैराग्यप्रधान भक्तीचं तेज उत्तरोत्तर वाढत गेलं....
पुढे पु. आनंदसागर महाराजांनी आपल्या मातोश्रींना एकदां म्हंटले की,आपली कन्या 'कृष्णा' हिला पांडुरंगबुवांना द्यावी. परंतु, पांडुरंगबुवा (रामानंद) लग्न करणार नाही, असं मातोश्रींना वाटलं. यांवर आनंदसागर महाराज म्हंटले, गोंदवल्याला जाऊन श्रीमहाराजचरणीं विनंती करुया!
दरम्यान आनंदसागर महाराजांनी देह ठेवल्यावर त्यांच्या मातोश्रींना,कृष्णाला गोंदवले येथे बोलवून घेतलं. मातोश्रींनी आपला मानस सांगितल्यावर श्रीमहाराज म्हंटलें, "माझ्या मनांत होतंच ते. श्रीराम सत्तेने घडेल सगळं. पांडुरंगबुवा जालन्याला राहिले तर श्रीराम मंदीर संस्थान चांगले वाढेल"!
मग पांडुरंगबुवांना बोलावून सांगितलं की जटाभार उतरवा, रामभाऊ शौचेंसह जालना संस्थान चालवावें"!
त्यानुसार, पांडुरंगबुवांनी जालना संस्थान चांगले वाढवून रामनाम प्रसार केला....
परंतु, बुवा आपल्या सत्शिष्य पु. प्रल्हाद महाराजांच्या लग्नासाठी निघाले असतांना श्रीमहाराजांचं पत्र आलं, 'जेवत असल्यास हात धुवायला गोंदवल्यास यावें!'
बुवांना कल्पना आली की महाराज लग्नाचा विषय काढतील. परंतु, नाईलाजास्तव त्यांना गोंदवले येथे जावं लागलं...
मग पांडुरंगबुवांना बोलावून सांगितलं की जटाभार उतरवा, रामभाऊ शौचेंसह जालना संस्थान चालवावें"!
त्यानुसार, पांडुरंगबुवांनी जालना संस्थान चांगले वाढवून रामनाम प्रसार केला....
परंतु, बुवा आपल्या सत्शिष्य पु. प्रल्हाद महाराजांच्या लग्नासाठी निघाले असतांना श्रीमहाराजांचं पत्र आलं, 'जेवत असल्यास हात धुवायला गोंदवल्यास यावें!'
बुवांना कल्पना आली की महाराज लग्नाचा विषय काढतील. परंतु, नाईलाजास्तव त्यांना गोंदवले येथे जावं लागलं...
इकडे गोंदवल्यात श्रीमहाराजांनी सर्वांना सांगितलं की उद्या आनंदसागरांच्या मुलीच्या लग्नाला यावं. मुलगा कोण हे विचारलं तर महाराज म्हंटले की रामराया पाठवणार आहे....
पांडुरंगबुवा आल्यावर श्रीमहाराज म्हंटलें की आता तुम्ही नाही, आम्हीच तुम्हाला नमस्कार करायला हवा!
हे ऐकून बुवांच्या डोळ्यांत पाणी आलं आणि म्हंटले, "महाराज, असं का म्हणता? काय अपराध घडला?"
श्रीमहाराज म्हंटलें, बुवा, तुम्ही ब्रम्हचारी आणि मी तर २ लग्न केलेय. तुमचा लग्न न करण्याचा विचार बदलला असेल तर सांगा, लग्न करता का?
बुवा म्हंटले, आजन्म ब्रम्हचर्य पालन करावं, अशी आंतरिक इच्छा आहे. ही इच्छा तुमच्या आज्ञेनेंच आहे!
श्रीमहाराज म्हंटलें, 'जो संसारात घालू शकतो तो त्यातून काढूसुद्धा शकतो. जर तुमचा विश्वास असेल तर ते मानावें'! आणि मग शेवटी बुवा लग्नाला तयार झालें. श्रीमहाराजांनी त्यांना लोकात बोलावून सर्वांसमोरगंमतीने म्हंटलें, 'बुवा चळले म्हणून त्यांचं लग्न लावून देतो. बुवा, लग्नासाठी पैसे किती आहेत?'
हे ऐकून बुवांच्या डोळ्यांत पाणी आलं आणि म्हंटले, "महाराज, असं का म्हणता? काय अपराध घडला?"
श्रीमहाराज म्हंटलें, बुवा, तुम्ही ब्रम्हचारी आणि मी तर २ लग्न केलेय. तुमचा लग्न न करण्याचा विचार बदलला असेल तर सांगा, लग्न करता का?
बुवा म्हंटले, आजन्म ब्रम्हचर्य पालन करावं, अशी आंतरिक इच्छा आहे. ही इच्छा तुमच्या आज्ञेनेंच आहे!
श्रीमहाराज म्हंटलें, 'जो संसारात घालू शकतो तो त्यातून काढूसुद्धा शकतो. जर तुमचा विश्वास असेल तर ते मानावें'! आणि मग शेवटी बुवा लग्नाला तयार झालें. श्रीमहाराजांनी त्यांना लोकात बोलावून सर्वांसमोरगंमतीने म्हंटलें, 'बुवा चळले म्हणून त्यांचं लग्न लावून देतो. बुवा, लग्नासाठी पैसे किती आहेत?'
पांडुरंगबुवा म्हंटलें, 'दोन रुपये!'
श्रीमहाराज म्हंटलें, 'दोन रुपयावर कोण मुलगी देईल?' अशी विनोद मस्करी झाल्यावर श्रीमहाराजांनी स्वतः आपल्या लाडक्या पांडुरंगबुवांना हळद लावली आणि थाटांत लग्न लावलं!
काय हे सद्गुरू, काय हा शिष्य! निव्वळ भक्तीप्रेम!
काय हे सद्गुरू, काय हा शिष्य! निव्वळ भक्तीप्रेम!
इकडे मेहकरला त्याचवेळीं शिष्योत्तम प्रल्हाद महाराजांचं लग्न लागलं!
धन्य गुरूपरंपरा!
धन्य गुरूपरंपरा!
प्रापंचिक दृष्टीने दीन असल्यानें सद्गुरूप्रति ही लीनता पु. पांडुरंगबुवांमध्ये आली होती.
लग्नानंतर रामानंद महाराजांना सहकुटुंब जालना संस्थान सांभाळण्यासाठी पाठवण्यात आले. दोघांनी संस्थान उत्तम प्रकारे चालवलं..
कालांतरानें त्यांना पुत्ररत्न झालें, नाव ठेवलं 'सीताराम'!
मुलाच्या बारशाच्या वेळी रामानंद महाराज हजर नव्हतें...
पुढें कृष्णाबाईला इंफ्लुएंझानें ग्रासले. अंतकाळ जवळ आला तेंव्हा रामानंद महाराज मंदिराच्या माडीवर होते. परंतु, अनेकदा बोलावूनही ते आले नाही. त्यातच मायबाईंचं निधन झाल्यानंतर लोकांनी न येण्याचं कारण विचारलं तेंव्हा बुवा म्हंटले, "ती माझं स्मरण करीत होती आणि मी सद्गुरूंचं स्मरण करत होतो. परिणामी तिचें चित्त सद्गुरू चरणी लागून तिचा अंतकाळ साधला गेला. स्त्रीला पती हाच देव आणि पुरुषाला सद्गुरू हेंच सर्वस्व हे ध्यानांत ठेवावें!"
*प्रापंचिक दीनता, पारमार्थिक लीनता!*
नंतर मूल देखील अल्पायुषी ठरले.
ही घटना १९१८ ची. पत्नी गेली, लहानसा मुलगा गेला. तरी, दुःख केलं नाही. प्रखर वैराग्य आणि विवेकांचा पुतळा असलेले रामानंद महाराज डगमगले नाहीं....
परंतु, भक्तीप्रेमापुढे हे विवेक, वैराग्याचं तत्वज्ञान लुळं पडतं....
कसं?
बालपणीच वैराग्य प्रखर ते।
गुरूकृपा ही झाली वरते।।
अशा पत्नी, मुलगा गेल्याचं दुःख न करणाऱ्या निरासक्त, विरागी पांडुरंगबुवांची अवस्था श्रीमहाराजांनी देह ठेवला तेंव्हा अतिशय भावविभोर झाली होती. श्रीमहाराजांनी हेतुपुरस्सर आपल्या अत्यंत प्रिय असणाऱ्या ब्रम्हानंद व पांडुरंगबुवा या सत्शिष्यांना देहकार्य सोडतांना जवळ ठेवलं नाही....
बालपणीच वैराग्य प्रखर ते।
गुरूकृपा ही झाली वरते।।
अशा पत्नी, मुलगा गेल्याचं दुःख न करणाऱ्या निरासक्त, विरागी पांडुरंगबुवांची अवस्था श्रीमहाराजांनी देह ठेवला तेंव्हा अतिशय भावविभोर झाली होती. श्रीमहाराजांनी हेतुपुरस्सर आपल्या अत्यंत प्रिय असणाऱ्या ब्रम्हानंद व पांडुरंगबुवा या सत्शिष्यांना देहकार्य सोडतांना जवळ ठेवलं नाही....
गुरूराव माझें रामचि केवळ। मानणारे ब्रम्हानंदबुवा श्रीमहाराजांनी अवतारकार्य समाप्त केले समजल्याबरोबर लहान मुलासारखे ओक्साबोक्षी रडू लागले. तशीच करूण अवस्था विरागी असणाऱ्या पांडुरंगबुवांची झाली!
श्रीमहाराजांची वार्ता कळल्याबरोबर गोंदवल्यात येऊन सगळीकडे आपल्या प्राणाहून प्रिय सद्गुरूंना शोधू लागले....
रामराया भगवंत असुनही सीताहरण झाल्यावर जसे नीतिमर्यादा विसरून सामान्य माणसाप्रमाणें पत्नीविरहानें भटकत होता, तीच विरह भावना होऊन पांडुरंगबुवा म्हणू लागले
*चैतन्य ब्रम्ह माझें कुणी मजला दाखवाsss*
*दीनांचा मायबाप कुणी मजला भेटवाsss*
*चैतन्य ब्रम्ह माझें कुणी मजला दाखवाsss*
*दीनांचा मायबाप कुणी मजला भेटवाsss*
गोंदवल्यातील सोबतची शिष्य मंडळी सांत्वन करून त्यांना गुरूतत्व अविनाशी आहे वगैरे सांगू लागली. परंतु,
*तत्वाचें बोल फोल बडबडता कितीतरी ।*
*शमली का आग त्यानें अंतरिची कधीतरी ।*
असं म्हणून पुढे बुवा म्हंटले की तत्वज्ञानाचं
*मृगजळ हे झूठ सारे फसविती वरीवरी ।*
*नयनाचा तो विसावा नयनांना दाखवा ।*
*चैतन्य ब्रम्ह माझें कुणी मजला दाखवाsss*
आपले महाराज सगळीकडे व्यापून आहेत, ही मनधरणी न पटून बुवा म्हंटले
*कुणी म्हणती सर्वाभूती भगवंत भरला ।*
*कुणी म्हणती साक्षीरूपे भगवंत व्यापिला ।*
*कुणी म्हणती तो अतीत सर्वांच्या राहिला ।*
*नका बोलू ज्ञान काही आम्ही डोळा पाहीला ।*
*चैतन्य ब्रम्ह माझें कुणी मजला दाखवाsss*
ज्यांच्या अनुग्रहानें राम भेटला, ज्यांनी गोड बोलून मला प्रेम दिलं, ज्यांनी स्वतः हळद लावून, मंगल स्नान घालून संसार, भक्ती दोन्ही साधून दिलं, त्या श्रीमहाराजांच्या आठवणींनी ऊर भरून येऊन बुवा म्हणू लागले,
*या ठाई देव माझा डोळ्यांनी पाहीला ।*
*या ठाई मंजुळ बोल गुरू माझा बोलिला ।*
*या ठाई भक्ती क्रिडा भावानें खेळला ।*
*गुणगुणते माणगंगा गुण त्याचे जणू पहा ।।*
*चैतन्य ब्रम्ह माझें कुणी मजला दाखवा sss*
*तत्वाचें बोल फोल बडबडता कितीतरी ।*
*शमली का आग त्यानें अंतरिची कधीतरी ।*
असं म्हणून पुढे बुवा म्हंटले की तत्वज्ञानाचं
*मृगजळ हे झूठ सारे फसविती वरीवरी ।*
*नयनाचा तो विसावा नयनांना दाखवा ।*
*चैतन्य ब्रम्ह माझें कुणी मजला दाखवाsss*
आपले महाराज सगळीकडे व्यापून आहेत, ही मनधरणी न पटून बुवा म्हंटले
*कुणी म्हणती सर्वाभूती भगवंत भरला ।*
*कुणी म्हणती साक्षीरूपे भगवंत व्यापिला ।*
*कुणी म्हणती तो अतीत सर्वांच्या राहिला ।*
*नका बोलू ज्ञान काही आम्ही डोळा पाहीला ।*
*चैतन्य ब्रम्ह माझें कुणी मजला दाखवाsss*
ज्यांच्या अनुग्रहानें राम भेटला, ज्यांनी गोड बोलून मला प्रेम दिलं, ज्यांनी स्वतः हळद लावून, मंगल स्नान घालून संसार, भक्ती दोन्ही साधून दिलं, त्या श्रीमहाराजांच्या आठवणींनी ऊर भरून येऊन बुवा म्हणू लागले,
*या ठाई देव माझा डोळ्यांनी पाहीला ।*
*या ठाई मंजुळ बोल गुरू माझा बोलिला ।*
*या ठाई भक्ती क्रिडा भावानें खेळला ।*
*गुणगुणते माणगंगा गुण त्याचे जणू पहा ।।*
*चैतन्य ब्रम्ह माझें कुणी मजला दाखवा sss*
कुणीही मला माझे सद्गुरू दाखवत नाही, हे पाहून ज्यांना आपल्या हातचे साधे पानगे सुद्धां गोड वाटले, त्या 'सद्गुरूंनाच' हे पांडुरंगबुवा म्हणू लागले,
*ब्रम्हानंदा काय तुम्ही ह्रदयी या चोरिले ।*
*आनंदसागराच्या तळी का हो बैसले ।*
*गोंदवले हेचि काय मज कैसे फसविले ।*
*महाराज कोठे माssझें पांडुरंगा दाखवा ।।*
*चैतन्य ब्रम्ह माझें कुणी मजला दाखवाsss*
*दीनांचा मायबाप कुणी मजला दाखवाsss*
*ब्रम्हानंदा काय तुम्ही ह्रदयी या चोरिले ।*
*आनंदसागराच्या तळी का हो बैसले ।*
*गोंदवले हेचि काय मज कैसे फसविले ।*
*महाराज कोठे माssझें पांडुरंगा दाखवा ।।*
*चैतन्य ब्रम्ह माझें कुणी मजला दाखवाsss*
*दीनांचा मायबाप कुणी मजला दाखवाsss*
हा भक्तीचा, प्रेमाचा खरा पूर वाहू लागला की त्यात असं ज्ञान, वैराग्य, विवेक, सगुण, निर्गुण, ध्यान, समाधी सगळं सगळं वाहून जातं आणि शेवटी एकच तत्व शिल्लक राहतं ते म्हणजे
*।। प्रेम ।।*
पांडुरंगबुवा म्हणजे वैराग्याची खाणच, परंतु त्याहीपेक्षा त्यांनी रचलेले अभंग वाचले की लक्षात येतं की हा तर भक्तीप्रेमानें ओसंडून वाहणारा अथांग महासागरच!
*।। प्रेम ।।*
पांडुरंगबुवा म्हणजे वैराग्याची खाणच, परंतु त्याहीपेक्षा त्यांनी रचलेले अभंग वाचले की लक्षात येतं की हा तर भक्तीप्रेमानें ओसंडून वाहणारा अथांग महासागरच!
श्रीराम! विरागी रामानंद महाराज 'सद्गुरूंचं' अवतारकार्य समाप्त झाल्यावर अधिकच विरागी बनले...
सद्गुरू देहात असतांना त्यांना मनुष्यत्वाची बंधनें पाळावी लागतात. परंतु, देहातीत गुरूतत्व हे अधिकारी सत्शिष्यांत सुक्ष्म रूपानें प्रगट होऊन अधिक तेजानें जगत्कार्य करत राहतात....
जालना श्रीराम मंदीर फारसं वाढलेलं नव्हतं. बांधकामांला परवानगीसाठी निजामाकडे अर्ज करावा लागे. राम मंदीरचा अर्ज २० वर्ष pending होता. शेवटी १९१८ मध्ये परवानगी मिळाली. तेंव्हा, पांडुरंगबुवांनी श्रीमहाराजांचं स्मरण करून विचार केला की पैसा कुठून आणायचा? सभामंडप बांधकाम, रंग इ.साठी त्याकाळी ६०,००० रुपये खर्च लागणार होता. रामरायासमोर मनापासून प्रार्थना केली की, "हे रामा, लौकिक कामासाठी लोक दुसऱ्यासमोर हात पसरतात. इथे तर अलौकिक कार्य आहे. मोठं कार्य आहे. यासाठी भिक्षा मागेन. परंतु, हे कार्य सिद्धीस जाईपर्यंत अन्न ग्रहण करणार नाही! आपण सांभाळून घ्यावं!"
जालना श्रीराम मंदीर फारसं वाढलेलं नव्हतं. बांधकामांला परवानगीसाठी निजामाकडे अर्ज करावा लागे. राम मंदीरचा अर्ज २० वर्ष pending होता. शेवटी १९१८ मध्ये परवानगी मिळाली. तेंव्हा, पांडुरंगबुवांनी श्रीमहाराजांचं स्मरण करून विचार केला की पैसा कुठून आणायचा? सभामंडप बांधकाम, रंग इ.साठी त्याकाळी ६०,००० रुपये खर्च लागणार होता. रामरायासमोर मनापासून प्रार्थना केली की, "हे रामा, लौकिक कामासाठी लोक दुसऱ्यासमोर हात पसरतात. इथे तर अलौकिक कार्य आहे. मोठं कार्य आहे. यासाठी भिक्षा मागेन. परंतु, हे कार्य सिद्धीस जाईपर्यंत अन्न ग्रहण करणार नाही! आपण सांभाळून घ्यावं!"
रामानंद महाराजांनी भिक्षेवर मंदिर बांधायचा ध्यास धरल्यावर अन्नत्याग, दगदग, यांमुळें प्रकृती खालावत चालली....
हे पाहून बापुसाहेब नावाच्या सद्गृहस्थानें आपली तिजोरी उघडून ३०,००० रुपये देऊ केले. रामानंद महाराजांना हे रुचलं नाही. त्यांनी प्रल्हाद महाराजांना सांगितलं की बापुसाहेबांना माझ्याकडे पाठव....
बापुसाहेब भीतभीत रामानंद महाराजांसमोर आले. महाराज अतिशय गोड भाषेत म्हंटलें, "बसा! तुम्ही माझे ऐकता की मी तुमचे ऐकावे?"
हे पाहून बापुसाहेब नावाच्या सद्गृहस्थानें आपली तिजोरी उघडून ३०,००० रुपये देऊ केले. रामानंद महाराजांना हे रुचलं नाही. त्यांनी प्रल्हाद महाराजांना सांगितलं की बापुसाहेबांना माझ्याकडे पाठव....
बापुसाहेब भीतभीत रामानंद महाराजांसमोर आले. महाराज अतिशय गोड भाषेत म्हंटलें, "बसा! तुम्ही माझे ऐकता की मी तुमचे ऐकावे?"
बापुसाहेबांनी डोळ्यांत पाणी आणून म्हंटले, "मी तुमचं ऐकतो!"
सत्पुरूषाचं एकेक अक्षर ह्रदयाचा ठाव घेणारं असतं!
बुवा पुढे म्हंटलें, "बापुसाहेब, तुमचे पैसे घेतले तर लोक म्हणतील मी जहागिरदाराला लुबाडलं. आणि हे राम मंदिर लोकांना आपलं वाटेल का? लोक म्हणतील हे जहागिरदारांचं राम मंदिर आहे. भक्तांना वाटलं पाहिजे की या मंदिरातील एक वीट मी दिली आहे, म्हणजे हे माझं सुद्धां मंदिर आहे!"
सत्पुरूषाचं एकेक अक्षर ह्रदयाचा ठाव घेणारं असतं!
बुवा पुढे म्हंटलें, "बापुसाहेब, तुमचे पैसे घेतले तर लोक म्हणतील मी जहागिरदाराला लुबाडलं. आणि हे राम मंदिर लोकांना आपलं वाटेल का? लोक म्हणतील हे जहागिरदारांचं राम मंदिर आहे. भक्तांना वाटलं पाहिजे की या मंदिरातील एक वीट मी दिली आहे, म्हणजे हे माझं सुद्धां मंदिर आहे!"
चाफळच्या राममंदिरासाठी छ. शिवाजी महाराजांनी देऊ केलेली रक्कम समर्थांनी नाकारली होती. आणि आता हे राम मंदिर! १९२७चा जालना संस्थान येथील श्रीराम नवमीचा उत्सव डोळ्यांचं पारण फेडणारा झाला. आतापर्यंत श्रीराम मंदीर संस्थान दिमाखांत तयार झालें होतें. श्रीमहाराजांच्या मनांत होतं तसंच!
आणि म्हणूनच पु. तात्यासाहेबांच्या रुपानें श्रीमहाराज गोंदवले संस्थान ट्रस्टींना घेऊन जालना उत्सवाला आले.
आणि म्हणूनच पु. तात्यासाहेबांच्या रुपानें श्रीमहाराज गोंदवले संस्थान ट्रस्टींना घेऊन जालना उत्सवाला आले.
पु. तात्यासाहेब रामरायासमोर आल्याबरोबर त्यांचे डोळे भरून आलें. आणि नंतर काय?
व्यासपिठावर बसून पेटीवर हात ठेवताच, "या, या आशिर्वाद!" या शब्दांनी सर्वांच्या काळजाचा ठोका चुकवला...
व्यासपिठावर बसून पेटीवर हात ठेवताच, "या, या आशिर्वाद!" या शब्दांनी सर्वांच्या काळजाचा ठोका चुकवला...
श्रीमहाराजांचं गोड प्रवचन झालं. बुवांनी रामनामाचं वेड लावण्याचं दुष्कर कार्य केल्याची पावती त्यांनी दिली. आठवडाभर हा नामरसाचा अविष्कार होत राहिला! यांत पु. प्रल्हाद महाराजांचं रामायण प्रवचन, श्रीमहाराजाचं नाममहात्म्य प्रवचन, भजन सगळा आनंदोत्सव!
*नित्य उपासना आणि अन्नदान ।*
*भावें गावें नाम राघवाचें ।।*
*भावें गावें नाम राघवाचें ।।*
या आनंदोत्सवानंतर श्रीराम मंदीरातील उपासना, अन्नदान आणि नामाचं तेज उत्तरोत्तर वाढत गेलं आहे आणि अजुनही वाढतंय!
पुढे सततच्या उपवास, दगदगीमुळें रामानंद महाराजांची प्रकृती फार क्षीण झाली होती. त्यामुळें, प्रल्हाद महाराजांनी आपल्या सद्गुरूंना मालाडला श्रीमहाराजचरणीं आणले...
रामानंद महाराजांनी गोंदवल्याला जाण्याचा ध्यास धरल्यावर श्रीमहाराजांनी परवानगी दिली...
रामानंद महाराजांनी गोंदवल्याला जाण्याचा ध्यास धरल्यावर श्रीमहाराजांनी परवानगी दिली...
क्षीण देह असुनही रामानंद महाराज तिर्थ टाकल्याशिवाय पाणी पीत नव्हते. यांत एक दिवस तिर्थ घालायचं राहिल्यानें चोविस तास पाण्याविणा रहावं लागलं, परंतु बुवांनी नामाला, रामाला सोडलं नाही!
शारिरिक अवस्था क्षीण असुनही गोंदवल्यात येऊन समाधीजवळ लोटांगण घातलं तेंव्हा त्यांचा कंठ दाटून आला. त्यांनी रचलेल्या आणखी एका पदातील ओळी
*धन्य त्रिभुवनी, क्षेत्र गोंदावले ।*
*जेथें प्रगटले, गुरूराज ।।*
*धन्य माणगंगा, धन्य ज्ञानगंगा ।*
*चैतन्याचा गाभा, उभा तेथे ।।*
*धन्य त्रिभुवनी, क्षेत्र गोंदावले ।*
*जेथें प्रगटले, गुरूराज ।।*
*धन्य माणगंगा, धन्य ज्ञानगंगा ।*
*चैतन्याचा गाभा, उभा तेथे ।।*
श्रीमहाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी त्यांनी आपल्या खोलीतूनच गुलाल उधळला, कासाविसी सुरू झाली! रामानंद महाराज म्हंटले, 'आजच्या पर्वकाळांत महाराजांनी या देहाला जवळ करावं!'
त्याचवेळीं पु. तात्यासाहेब तिथें येऊन म्हंटलें, 'आपण हा पर्वकाळ साधला तर उत्सवावर विरजन पडेल! उद्या सांगू, विश्वास ठेवा!'
त्याचवेळीं पु. तात्यासाहेब तिथें येऊन म्हंटलें, 'आपण हा पर्वकाळ साधला तर उत्सवावर विरजन पडेल! उद्या सांगू, विश्वास ठेवा!'
दुसऱ्या दिवशी विद्वान मंडळींचा बुवांच्या हस्ते सत्कार होणार होता, तो पार पडला!
परंतु, द्वादशीला फार अवघड अवस्था झाली. रामानंद महाराज दुध घेईना. तेंव्हा, पु. तात्यासाहेबांनी म्हणजे श्रीमहाराजांनी स्वतः दुध पाजलं. गुरूआईच्या हातानं पांडुरंगबुवा दुध प्यायले.
नंतर श्रीमहाराजांनी सर्वांना दूर ठेवलं. रामानंद महाराजांना एकांतात घेतलं, उभं राहण्यासाठी खुणावलं. पांडुरंगबुवांनी हात जोडून श्रीमहाराजांचा तीन वेळा जयजयकार केला, तीन वेळा 'श्रीराम' म्हणून देह ठेवला!
परंतु, द्वादशीला फार अवघड अवस्था झाली. रामानंद महाराज दुध घेईना. तेंव्हा, पु. तात्यासाहेबांनी म्हणजे श्रीमहाराजांनी स्वतः दुध पाजलं. गुरूआईच्या हातानं पांडुरंगबुवा दुध प्यायले.
नंतर श्रीमहाराजांनी सर्वांना दूर ठेवलं. रामानंद महाराजांना एकांतात घेतलं, उभं राहण्यासाठी खुणावलं. पांडुरंगबुवांनी हात जोडून श्रीमहाराजांचा तीन वेळा जयजयकार केला, तीन वेळा 'श्रीराम' म्हणून देह ठेवला!
*श्री ब्रम्हचैतन्य सनकादिका मान्य ।*
*त्रिभुवनी धन्य महाराज ।।*
*धन्य त्रिभुवनी, क्षेत्र गोंदावले ।*
*जेथें प्रगटले, गुरूराज ।। *
*धन्य माणगंगा, धन्य ज्ञानगंगा ।*
*चैतन्याचा गाभा, उभा तेथे ।।*
*धन्य ते भूमि, लागे ते चरणी ।*
*धन्य ते मरण, तये ठायी ।।*
*धन्य तेचि जन जाती दर्शनासी ।*
*तयाच्या पुण्यासी काय वानूं ।।*
*आनंदसागर ब्रम्हानंद धन्य ।*
*झाले ते अनन्य रामरुपी ।।*
*सद्गुरूदर्शने धन्य झालो आता ।*
*आनंदाच्या सुता कृपा केली ।।*
*धन्य तेचि भूमी, लागो ते चरणी ।*
*धन्य ते मरण तये ठायी ।।*
*त्रिभुवनी धन्य महाराज ।।*
*धन्य त्रिभुवनी, क्षेत्र गोंदावले ।*
*जेथें प्रगटले, गुरूराज ।। *
*धन्य माणगंगा, धन्य ज्ञानगंगा ।*
*चैतन्याचा गाभा, उभा तेथे ।।*
*धन्य ते भूमि, लागे ते चरणी ।*
*धन्य ते मरण, तये ठायी ।।*
*धन्य तेचि जन जाती दर्शनासी ।*
*तयाच्या पुण्यासी काय वानूं ।।*
*आनंदसागर ब्रम्हानंद धन्य ।*
*झाले ते अनन्य रामरुपी ।।*
*सद्गुरूदर्शने धन्य झालो आता ।*
*आनंदाच्या सुता कृपा केली ।।*
*धन्य तेचि भूमी, लागो ते चरणी ।*
*धन्य ते मरण तये ठायी ।।*
ज्या सद्गुरूंच्या आज्ञेत आजन्म "रामसेवा आणि नाममेवा" लाभला, अशा पु. पांडुरंगबुवा म्हणजे रामानंद महाराजांनी आपला शेवटचा श्वासदेखील गुरूचरणी सोडला!
*धन्य तेचि भूमी, लागो ते चरणी।*
*धन्य ते मरण तये ठायी।।*
*धन्य ते मरण तये ठायी।।*
कठोर वैराग्य, उत्कट भक्ती, रामसेवेचा आदर्श असणाऱ्या पांडुरंगबुवांनी आपला अभंग जगून दाखवला!
आजच्या बुवांच्या पुण्यतिथी पर्वकाळापासून आपण त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जगण्याचा यत्न करूया, आपल्याला सुद्धां हा "रामानंद" अनुभवता येईल!!!
*("नामप्रेम" पुस्तकातून साभार)*


No comments:
Post a Comment