





*शंका*- आज दत्तजयंती निमित्त दत्तावताराबद्दल थोडं सांगावं!



श्रीराम! भक्ताने भक्तीची परिसीमा गाठावी, यासाठी भगवंत कधीकधी कृपाळूपणे अल्प धारिष्ट्य पाहे ।
या परिक्षेत जो उत्तिर्ण होतो त्याचा तर उद्धार होतोच, परंतु त्यायोगानें पुढच्या असंख्य सामान्य माणसांना असामान्य भगवद्भक्ती चा सोपान त्यातून निर्माण होतो. आणि याचं एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे माता अनुसया!
अतिथी रुपानें आलेल्या त्रिदेवांना जिनें आपल्या अध्यात्मिक संकल्पशक्तीने बालकत्व स्विकारायला लावलं, अशी माता अनुसया ही परमात्म्याची माता बनली. याचं कारण, 'पती हाच परमेश्वर' हा दृढभाव असलेल्या अनुसयेचं पातिव्रत्याचं तेज आणि अधिकार! या तेजातून ज्या जगताचा उद्धार करणाऱ्या बालकांचा जन्म झाला, त्यांना आपण दत्तात्रय असं म्हणतो!
दत्त व आत्रेय यांचा संयोग म्हणजे दत्तात्रेय!
*दत्तो मयाहमिति यद् भगवान् स दत्तः ।।*
दत्त व आत्रेय यांचा संयोग म्हणजे दत्तात्रेय!
*दत्तो मयाहमिति यद् भगवान् स दत्तः ।।*
निर्गुण आणि निराकार अशा ब्रह्म तत्त्वाची अनुभूती जो करून देतो तो गुरू. अशा गुरूचांही जो गुरू तो श्रीदत्त गुरू! संपूर्ण विश्वाचे गुरूपद श्रीदत्तात्रेयांना बहाल केले गेले आहे.
त्रिगुणात्मक दत्तात्रयांचे गुण नंतर बघावें, परंतु अनुसया मातेप्रमाणें 'पती हाच परमेश्वर' मानणारी सती बनणें हा सद्गुण प्रत्येक स्त्रीनें अंगिकारला तर इतर प्रकारे भक्ती न करता देखील दत्तात्रय भगवान तिच्यासाठी प्रगट होतील!
आजच्या युगात सर्व नात्यात कटुता तर आलीच आहे. परंतु, पती-पत्नीमध्ये वाढणारा बेबनाव, संशय, वाद-विवाद यांनी गाठलेला कळस हे या आधुनिक आणि तथाकथित प्रगट जगाचं फार मोठं दुर्दैव आहे. यानेच अनेक संसार उध्वस्त झालेले, होत असलेले आपण बघतोय.
तेंव्हा, दत्तात्रय भगवंत कळण्यापेक्षा तो आपल्यात प्रगट व्हावा, असं वाटण्यात सार्थकता आहे. आणि ही सार्थकता येण्यासाठी आपण दत्तात्रयांच्या अवताराचं निमित्त बनलेल्या त्यांच्या मातापित्याचा भाव आदर्श म्हणून डोळ्यासमोर ठेवावा!
तेंव्हा, दत्तात्रय भगवंत कळण्यापेक्षा तो आपल्यात प्रगट व्हावा, असं वाटण्यात सार्थकता आहे. आणि ही सार्थकता येण्यासाठी आपण दत्तात्रयांच्या अवताराचं निमित्त बनलेल्या त्यांच्या मातापित्याचा भाव आदर्श म्हणून डोळ्यासमोर ठेवावा!
अवधूत म्हणजे 'अहं धुतो तो अवधूत' असं आपण मानतो. ते बरोबरच आहे. परंतु 'अवधूत' शब्दाची व्याख्या सांगणारा एक उद्बोधक श्लोक आहे...
*अक्षरत्वात् वरेण्यत्वात् धूतसंसारबंधनात।*
*तत्त्वमस्यादि लक्षत्वात् अवधूत इति इर्यते।।*
*अक्षरत्वात् वरेण्यत्वात् धूतसंसारबंधनात।*
*तत्त्वमस्यादि लक्षत्वात् अवधूत इति इर्यते।।*
अक्षरत्वात्: अक्षर म्हणजे अविनाशी तत्त्वासाठी'अ',
वरिष्ठत्वात्: वरिष्ठ भाव प्रकट करण्यासाठी `व’,
धूतसंसारबंधनात्: संसारबंधने धुवून टाकणारा त्यासाठी `धू’
आणि
तत्वमस्यादि लक्षत्वात्: चार महावाक्ये आहेत, त्या महावाक्यांचे लक्षण म्हणून `त.’
वरिष्ठत्वात्: वरिष्ठ भाव प्रकट करण्यासाठी `व’,
धूतसंसारबंधनात्: संसारबंधने धुवून टाकणारा त्यासाठी `धू’
आणि
तत्वमस्यादि लक्षत्वात्: चार महावाक्ये आहेत, त्या महावाक्यांचे लक्षण म्हणून `त.’
अशाप्रकारे अ, व, धू आणि त ही चार अक्षरे म्हणजे 'अविनाशी तत्वासाठी, श्रेष्ठ भाव प्रगट होण्यासाठी संसारबंधन नाहीसं करणारं तत्व' म्हणजेच "अवधूत"!
या अवधूताचं चिंतन केल्यास आपल्याला श्री म्हणजे खरं ऐश्वर्य लाभेल. त्यासाठी अवधूत ज्याच्यात आहे असा तो आपला गुरू आणि देव दोन्ही बनला पाहिजे.
या अवधूताचं चिंतन केल्यास आपल्याला श्री म्हणजे खरं ऐश्वर्य लाभेल. त्यासाठी अवधूत ज्याच्यात आहे असा तो आपला गुरू आणि देव दोन्ही बनला पाहिजे.
असा 'अवधूत' असलेला, ऐश्वर्यसंपन्न म्हणजे 'श्री' असलेला, गुरु आणि देव दोन्ही असणारा तो केवळ 'दत्तात्रय' भगवंतच आहे!
म्हणून "अवधूत चिंतन श्रीगुरूदेव दत्त" यांत सर्व ब्रम्हज्ञान, अविनाशी ऐश्वर्य आणि अखंड समाधान सामावलेलं आहे!
ज्याला याचं धनी व्हायचं असेल त्यानें अंतःकरणा-पासून म्हणावं...
🌺 *!!! अवधूत चिंतन श्रीगुरूदेव दत्त !!!*
🌺
म्हणून "अवधूत चिंतन श्रीगुरूदेव दत्त" यांत सर्व ब्रम्हज्ञान, अविनाशी ऐश्वर्य आणि अखंड समाधान सामावलेलं आहे!
ज्याला याचं धनी व्हायचं असेल त्यानें अंतःकरणा-पासून म्हणावं...


*("नामप्रेम" पुस्तकातून साभार)*


No comments:
Post a Comment