Wednesday, December 13, 2017

प्रारब्ध

 🌹🌷🌹*" नामप्रेमचिंतन "* 🌹🌷🌹
*शंका*- प्रारब्ध निश्चित असतं, परंतु ते बदलता येतं. किंबहुना ते अनेकदा बदलतं सुद्धां...कसे?

*श्रीराम:
आपण बँकेतून कर्ज काढलं की दर महिन्याचा हफ्ता ठरतो आणि ते सांगतात की १५ वर्षानंतर अमुक महिन्यात तुमचं कर्ज फिटेल व घराची तारण कागदपत्रं तुम्हाला परत मिळतील...
बँकेनें १०,००० रू. महिना भरणे अनिवार्य सांगितले आणि त्यानुसार विशिष्ट वर्षी, विशिष्ट महिन्यात घर मोकळे होईल, हे प्रारब्ध निश्चित केलं.
परंतु, तुम्ही जर काही वर्षांनंतर पगार वाढल्यानें जास्त हप्ता भरू लागलात तर वेळेच्या अगोदर घर मोकळं होईल. किंवा काही कोर्टाचा निकाल जिंकून मोठी रक्कम मिळाली तर एकरकमी पैसा भरून लगेच कर्जमुक्त व्हाल.
याचा अर्थ बँकेनं ठरवलेलं प्रारब्ध बदललं!
दुसरं उदाहरण बघुया...
एखादा गुन्हेगार २५ वर्षांसाठी तुरूंगात जातो. कोर्टानें हे त्याचं प्रारब्ध निश्चित केलं. परंतु, त्याची चांगली वागणूक दिसली तर त्याला १-२ वर्ष अगोदर मुक्त करतात. म्हणजेच प्रारब्ध बदललं!
अनेक लोकांना लुटणाऱ्या दरोडेखोराचं प्रारब्ध काय असतं?
"माझं प्रारब्ध अगोदरच लिहून ठेवलं आहे आणि जर ते कुणी बदलु शकत नाही तर मी नामस्मरण का करू?" असा प्रश्न जर वाल्या कोळीला पडला असता, तर आपल्याला उद्याचा पाडवा साजरा करता आला नसता!
एक लक्षात घ्यावं की, प्रारब्ध हे भुतकाळातील कर्मानें निश्चित होतं आणि भुतकाळ बदलता येत नसतो म्हणून त्यातून निर्माण झालेंलं प्रारब्ध सुद्धां बदलता येणार नाही, असं आपल्याला वाटतं!
परंतु, त्या प्रारब्धांत बदल करता येतो.
प्रारब्ध हे LIC policy सारखं असतं. त्यात भगवंतानें आपल्याला जो plan निश्चित केलेला असतो, तो flexible असतो, rigid नाही!
जसं कर्ज माफ होणार नाही, पण कर्जाची योजना, कर्जमुक्तीची वेळ हप्त्यानुसार बदलू शकते. गुन्हा माफ होणार नाही, पण गुन्ह्याची शिक्षा कमी किंवा जास्त होऊ शकते, त्याचप्रमाणें, प्रारब्ध पूर्णपणे पुसले जात नाही परंतु त्यात बदल करण्यासाठी भगवंतानें scope ठेवला आहे!
By the way, आपण प्रारब्धाची काळजी न करता आजचं कर्म असं करावं की त्यातून गतकर्माचं प्रारब्ध सुसह्य होईल!
आणि आज जर सदाचरण आणि धर्माचरण केलं तर विपरीत प्रारब्ध सुद्धां कल्याणकारी होईल!
श्रवण बाळाचा नकळत वध केल्यानें अंध माता-पित्याचा शाप मिळून दशरथ राजाला एक विपरीत प्रारब्धाचा धनी बनावं लागलं!
परंतु, सद्गुरू श्री वसिष्ठमुनींची सेवा आणि सदाचरणामुळें या विपरीत प्रारब्धाचं रुपांतर दिव्य प्रारब्धांत झालं. आणि निपुत्रिक दशरथ राजा परब्रम्ह परमात्म्याचा पिता बनला!
तेंव्हा, प्रारब्धानुसार आपल्या जीवनात येणारे अनपेक्षित प्रसंग आपल्या साधनेनें, सदाचरणानें भविष्यात कल्याणकारी ठरू शकते!
प्रारब्ध बदलणें हे भगवंताच्या हातांत नाही, परंतु एखाद्या समर्थ सद्गुरूंच्या कृपेनें ते प्रारब्ध मोक्षपदाला नेऊ शकते. त्यासाठी साधना मात्र निष्काम होणें जरूर आहे. नाहीतर सकाम साधनेमुळें आणखी नवीन प्रारब्ध निर्माण होऊन माणूस आणखी सुख-दुःखाच्या बंधनांत अडकू शकतो.
म्हणून, माझ्या सद्गुरूंनी सांगितलं म्हणून मी नाम घेईल या भावनेनं जो साधन करेल, त्याला 'गुरूकृपेनें' 'जन्म कर्म च में दिव्यम्' ची अनुभुती येईल!
*("नामप्रेम" पुस्तकातून साभार)*
🙏 *जानकी जीवन स्मरण जय जय राम* 🙏

No comments:

Post a Comment