🌹
🌷
" नामप्रेमचिंतन "
🌹
🌷
शंका - आनंदाचा स्रोत कोणता? कृपया सांगावे. भजनात हा आनंद कसा येईल?

श्रीराम! आनंदाचा स्त्रोत तिथें आहे जिथें ब्रम्हज्ञान आहे, जिथें द्वंद्वाचा काही संबंध नाही, जिथें सत्व, रज आणि तम या त्रिगुणांचा संबंध नाही, जिथें सत् तत्वाचं लक्षण प्रगट झालेलं आहे, जिथें स्थीर अवस्था आहे, जो सदा सर्वदा साक्षित्वानें राहणारा आहे, जो भावरहित आहे, जो नित्य आहे, सत्य आहे, शुद्ध आहे, बुद्ध आहे, तिथेंच आनंदाचा स्त्रोत आहे!
वरील सर्व गोष्टी एकत्रितपणें जिथें मिळतात, त्या स्त्रोताला, त्या आनंदसागराला सद्गुरू म्हणतात! हा आनंदाचा स्त्रोत सद्गुरूंमध्यें कशाप्रकारे आहे, हे दाखवणारा श्लोक म्हणजे-
ब्रम्हानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं ।
द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् ॥
एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षीभूतं ।
भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ॥
ब्रम्हानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं ।
द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् ॥
एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षीभूतं ।
भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ॥
भजनांतून हा स्त्रोत मिळाला पाहिजे. या स्त्रोताचं, म्हणजे सद्गुरूंचं सुक्ष्म रूप म्हणजे त्यांनी दिलेलं नाम!
तेंव्हा, भजनातून हे नामरूपी सार घेणं म्हणजे भजनम् नाम रसनम् आहे!
तेंव्हा, भजनातून हे नामरूपी सार घेणं म्हणजे भजनम् नाम रसनम् आहे!
कलेत नवरस असतात, शृंगार, हास्य, करूण इ. परंतु भजनकलेमध्यें दहावा आणि अकरावा रस असतो. हे दोन रस म्हणजे वात्सल्यरस आणि भक्तीरस! हे रस नसतील तर ते भजन निरस ठरेल!
वात्सल्य आणि भक्ती हे रस सद्गुरूंमध्येंच आढळतात. त्या सद्गुरूंना आवडणाऱ्या नामाचं स्मरण भजनांत झालं की आपोआप दहावा आणि अकरावा रस आपल्याला मिळेल!
म्हणून मला व्यक्तीशः असं वाटतं की, भजनम् नाम रसनम् म्हणजे भजनातून नामाचा रस आकंठ प्राशन करावा, तनमन, जीव प्राण तृप्त होऊन जाईल!
वात्सल्य आणि भक्ती हे रस सद्गुरूंमध्येंच आढळतात. त्या सद्गुरूंना आवडणाऱ्या नामाचं स्मरण भजनांत झालं की आपोआप दहावा आणि अकरावा रस आपल्याला मिळेल!
म्हणून मला व्यक्तीशः असं वाटतं की, भजनम् नाम रसनम् म्हणजे भजनातून नामाचा रस आकंठ प्राशन करावा, तनमन, जीव प्राण तृप्त होऊन जाईल!
दीप लाविजे गृहाभीतरी।
तोचि प्रकाशे गवाक्षाद्वारी।
तेवी मनी प्रगटला श्रीहरी।
तोचि इंद्रियांतरी भजनानंदू।।
फारच मार्मिक ओवी आहे! नाथभागवतातील दुसऱ्या अध्यायात भगवंताला 'मन' अर्पण करणे यावरील प्रसिद्ध श्लोक आहे- कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वाSनृसृतस्वभावात्। करोमि यज्ञत्सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि।
तोचि प्रकाशे गवाक्षाद्वारी।
तेवी मनी प्रगटला श्रीहरी।
तोचि इंद्रियांतरी भजनानंदू।।
फारच मार्मिक ओवी आहे! नाथभागवतातील दुसऱ्या अध्यायात भगवंताला 'मन' अर्पण करणे यावरील प्रसिद्ध श्लोक आहे- कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वाSनृसृतस्वभावात्। करोमि यज्ञत्सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि।
ये श्लोकींचे व्याख्यान। पहिले मानसिक अर्पण। पाठी इंद्रिये बुद्धि अभिमान। कायिक जाण श्लोकान्वये।।
म्हणजे, सर्वप्रथम मन- मनाचे संकल्पच भगवंताला अर्पण करावे. हेच महत्त्वाचे! नंतर इन्द्रिये बुद्धि अहंकार आणि शारीरिक कर्मे अर्पण करावीत- मन अर्पिल्या नंतर ती आपसुक अर्पिली जातात! अशा अर्पिलेल्या मनात श्रीहरी प्रकट होतो! तो कसा हे वरील श्लोकात सांगितले आहे.
म्हणजे, सर्वप्रथम मन- मनाचे संकल्पच भगवंताला अर्पण करावे. हेच महत्त्वाचे! नंतर इन्द्रिये बुद्धि अहंकार आणि शारीरिक कर्मे अर्पण करावीत- मन अर्पिल्या नंतर ती आपसुक अर्पिली जातात! अशा अर्पिलेल्या मनात श्रीहरी प्रकट होतो! तो कसा हे वरील श्लोकात सांगितले आहे.
घराच्या आत दिवा लावला तर त्याचा प्रकाश घरातील वस्तूंवर तर पडतोच परंतु तोच प्रकाश खिडक्यांमधून बाहेर देखील पसरतो. त्याप्रमाणे मनात जो श्रीहरी प्रकट होतो, तो इन्द्रियांद्वारा भजनातील आनंदाच्या रूपाने प्रकट होतो!
असे वाटते की आत्यंतिक प्रीती भगवंताच्या ठाई उत्पन्न झाली की त्या मनुष्यास भजन करावे लागत नाही तर ते त्याच्याकडून अनायासे घडते! त्याची इन्द्रिये नादमय होतात, हाताने टाळी आपोआप वाजते, पाय फेर धरतात आणि तो देहभान विसरून परमानंदी रमतो!
("नामप्रेम" पुस्तकातून साभार)
No comments:
Post a Comment