





*शंका*- माळीये जेउतें नेलें | तेउतें निवांतचि गेलें | तया पाणिया ऐसे केलें | होआवें गा ||
या ओवीवर चिंतन व्हावे-
या ओवीवर चिंतन व्हावे-

*श्रीराम!* वर ज्या ओवीवर चिंतन मांडायला सांगितलंय ती ओवी भक्तीयोगातील आहेच, पण त्या एकाच ओवीतून कर्मयोगी, ज्ञानयोगी आणि अनन्य भक्त बनण्याचं रहस्य ज्ञानेश्वर महाराजांनी उलगडलं आहे, असं मला वाटतं....
बघा, हा बारावा अध्याय आहे. याचा अर्थ भगवंतानें या अगोदर अकरा अध्यायांत अर्जुनाचा विषाद दूर करण्यापासून ते त्याला विश्वरूप दर्शन देण्यापर्यंतचे सर्व कार्यक्रम झाले होते...
भगवंताचं ते दिव्य दर्शन झाल्यानंतर भक्तानें कसं मुक्त जीवन जगावं, याचा संकेत ज्ञानेश्वर महाराजांनी या ओवीत केला आहे. किंबहुना, बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध सर्वांना कर्म, भक्ती आणि ज्ञानाचा सुगम मार्ग या ओवीत मांडलेला आहे....
माणसानें पाण्यासारखं जीवन जगावं. शेतामध्यें माळी पाण्याला जशी वाट करून देईल त्या दिशेनं ते शांतपणें जातं. त्याचप्रमाणें, भगवंतानें किंवा आपल्या सद्गुरूंनी आपल्या आयुष्यात जी माणसं, जी परिस्थितीची वाट निर्माण करून दिली आहे, ती 'रामेच्छा' समजून कर्तव्य करत रहावं!
हे ज्याला कळलं त्याला ज्ञान झालं असं म्हणता येईल. असं जो वागू लागला तो कर्मयोगी बनला असं म्हणता येईल आणि असं समर्पण ज्याला करता आलं तोच अनन्य भक्त बनला असं म्हणता येईल!
ही एकच ओवी जर तिन्ही योग साधणारी आहे, माणसाला दुःखापासून निवृत्त करणारी आणि अखंड समाधान देणारी आहे, तर भगवंतानें हे सुरुवातीलाच का नाही सांगितलं? एवढी मोठी गीता सांगण्याचा खटाटोप का केला?
ही एकच ओवी जर तिन्ही योग साधणारी आहे, माणसाला दुःखापासून निवृत्त करणारी आणि अखंड समाधान देणारी आहे, तर भगवंतानें हे सुरुवातीलाच का नाही सांगितलं? एवढी मोठी गीता सांगण्याचा खटाटोप का केला?
याचं एकच कारण आहे: अहंकार!
याचं एकच कारण आहे: अहंकार!
महाभारताचं युद्ध सुरू होण्याअगोदर 'मी' युद्ध करणार हा अहंपणा अर्जुनाच्या मनांत होता. या अहंपणाचा विस्तार म्हणजे हे माझे भाऊ, हे माझे काका, हे माझे गुरू अशी आसक्ती. या आसक्तीतून माझ्या माणसांबद्दल निर्माण झालेला मोह. आणि मोहात अडकल्यानें त्याच्या मनांत निर्माण झालेला युद्ध करावं की नाही असा विषाद!
माळी पाण्याला नेईल तिकडे पाण्यानं जाणं आणि ते सुद्धां निवांतपणें! असं भगवद्रुपी माळ्यावर सर्व सोपवून 'निवांतपणें' कर्म करण्यासाठी मनाची जबरदस्त तयारी असावी लागते. आणि अर्जुनाची ती मनाची तयारी करण्यासाठी भगवंताला अगोदर एवढं तत्वज्ञान सांगावं लागलं!
त्या पाण्याप्रमाणें जगण्यासाठी 'मी'पणा मारून कर्तव्य करावें लागते. आणि सगळी साधना ही अहंकार दूर करण्यासाठीच असतें....
एकदां एका शिष्यानें सद्गुरुंना भक्तीज्ञान मागितलं. तेंव्हा गुरूंनी त्या शिष्याला सांगितलं की तू आता वर्षभर वनवास भोगून चिंतन, उपासना कर. आणि मग माझ्याकडे परत ये....
वर्षभर साधना करून तो शिष्य आश्रमाजवळ आला आणि दारावर थाप दिली. गुरूंनी विचारलं, कोण आहे?
तो शिष्य म्हंटला, 'गुरूवर्य, मी आहे!'
गुरू म्हंटले, अजून तुझी साधना पूर्णत्वाला गेली नाही. तुझा 'मी' शाबुत आहे. आणखी एक वर्ष साधना करून मग ये'.
वर्षभर साधना, चिंतन, मनन करून तो शिष्य आश्रमाजवळ आला आणि दारावर थाप दिल्यावर गुरूंनी पुन्हा विचारलं कोण आहे?
यावेळी तो शिष्य म्हंटला, 'गुरूवर्य, तुम्ही आहात!'
यावर ते साधू म्हंटलें, 'तुझी साधना अजून शिल्लक राहिलीये. कारण 'तू' आहे म्हणजे 'मी' आहेच. तेंव्हा, आणखी एका वर्षांने साधना करून ये!'
आता पुन्हा वर्षभरानें तीच process झाली. यावेळी गुरूंनी कोण आहे विचारल्यावर या शिष्यानें उत्तर न देता पुन्हा दारावर थाप दिली. गुरूंनी दार उघडलं आणि म्हंटले, 'मी' नाही, 'तू' नाही. पण कुणीतरी म्हणजे 'ते' आहे. असा द्वैतभाव अजून आहेच. तेंव्हा, आणखी एक वर्ष साधना करून ये!'
आता मात्र गेल्यावर शिष्याच्या साधनेला चांगलीच धार चढली. आणि वर्ष पूर्ण झालं तरी तो आला नाही. तेंव्हा, सद्गुरूच त्याला भेटायला गेले...
वर्षभर साधना करून तो शिष्य आश्रमाजवळ आला आणि दारावर थाप दिली. गुरूंनी विचारलं, कोण आहे?
तो शिष्य म्हंटला, 'गुरूवर्य, मी आहे!'
गुरू म्हंटले, अजून तुझी साधना पूर्णत्वाला गेली नाही. तुझा 'मी' शाबुत आहे. आणखी एक वर्ष साधना करून मग ये'.
वर्षभर साधना, चिंतन, मनन करून तो शिष्य आश्रमाजवळ आला आणि दारावर थाप दिल्यावर गुरूंनी पुन्हा विचारलं कोण आहे?
यावेळी तो शिष्य म्हंटला, 'गुरूवर्य, तुम्ही आहात!'
यावर ते साधू म्हंटलें, 'तुझी साधना अजून शिल्लक राहिलीये. कारण 'तू' आहे म्हणजे 'मी' आहेच. तेंव्हा, आणखी एका वर्षांने साधना करून ये!'
आता पुन्हा वर्षभरानें तीच process झाली. यावेळी गुरूंनी कोण आहे विचारल्यावर या शिष्यानें उत्तर न देता पुन्हा दारावर थाप दिली. गुरूंनी दार उघडलं आणि म्हंटले, 'मी' नाही, 'तू' नाही. पण कुणीतरी म्हणजे 'ते' आहे. असा द्वैतभाव अजून आहेच. तेंव्हा, आणखी एक वर्ष साधना करून ये!'
आता मात्र गेल्यावर शिष्याच्या साधनेला चांगलीच धार चढली. आणि वर्ष पूर्ण झालं तरी तो आला नाही. तेंव्हा, सद्गुरूच त्याला भेटायला गेले...
'मी' 'तू' पणाची बोळवण खऱ्या अर्थानें झाली की भक्ताला भगवंताच्या कृपेचा जो निजध्यास लागतो, त्याहीपेक्षा भगवंतालाच भक्ताच्या दर्शनाची उत्कंठा लागते!
आणि मग भगवंतालाच भक्तावर पूर्ण कृपा केल्याशिवाय राहवत नाही!
आणि मग भगवंतालाच भक्तावर पूर्ण कृपा केल्याशिवाय राहवत नाही!
अर्जुनाचा विषाद, मोह, आसक्ती आणि 'मी' पणा पूर्ण नाहिसा होण्याची चिन्हे बघून भगवंतानें या अनन्य भक्ताच्या रथाच्या दोऱ्या स्वतः हातात घेऊन त्याचं लौकिक, अलौकिक दोन्ही अंगानें कल्याण केलं.
आपलीही अशीच अवस्था होण्यासाठी,
*माळीये जेउतें नेलें ।*
*तेउतें निवांतचि गेलें ।*
*तया पाणिया ऐसे केलें ।*
*होआवें गा ।।*
आपलीही अशीच अवस्था होण्यासाठी,
*माळीये जेउतें नेलें ।*
*तेउतें निवांतचि गेलें ।*
*तया पाणिया ऐसे केलें ।*
*होआवें गा ।।*
*("नामप्रेम" पुस्तकातून साभार)*


No comments:
Post a Comment