*" नामप्रेमचिंतन "*
🌹
🌷
🌹



*शंका*- श्रीमहाराज काळजीच्या सर्व प्रश्नांना नामस्मरण आणि राम कर्ता व करविता ही भावना ठेवा असे म्हणत असत तेव्हा कर्ता व करविता म्हणजे काय हे आपण कृपया स्पष्ट करून सांगता का ?

*श्रीराम!* प्रत्येक माणसाला काळजी असतेच. ही काळजी भितीतून निर्माण होतें. Anxiety is the child of fear! काळजी ही भयकन्या आहे, असं वचन आहे. तेंव्हा, भितीच्या मरणात काळजीचंसुद्धा मरण आहे. काळजी ही भयातून उत्पन्न झालेली असल्यानें ज्याला काळजी आहे, त्याला नक्कीच कसली तरी भिती असते. या भितीपासून सुटका करून घेतली की काळजी समूळ जाईल. मग आता भिती कशी जाईल?
नामालय सोहळ्यात एका शंकेवर बोलतांना मी प्रत्येक मनुष्याला पाच बाप असतात, असं ओझरतं बोललो होतो.... नाथभागवतातील उद्धव-श्रीकृष्ण संवाद बघावा. श्रीकृष्णानें उद्धवाला अध्यात्मज्ञान सांगताना म्हंटलं की, प्रत्येक मनुष्याला पाच बाप असतात.... १) जनिता २) उपनेता ३) प्रतिपाळिता ४) सामान्य भयापासून सोडवणारा ५) मृत्यूपासून सोडवणारा
१) जनिता : जन्म देणारा बाप
२) उपनेता : शिक्षण देणारा शिक्षक, तोही बाप
३) प्रतिपाळिता : कामधंदा देणारा बॉस, तोही बाप
४) चोरी, हल्ला इ.पासून रक्षण करणारा पोलिस, न्यायाधिकारी, तोही बाप
२) उपनेता : शिक्षण देणारा शिक्षक, तोही बाप
३) प्रतिपाळिता : कामधंदा देणारा बॉस, तोही बाप
४) चोरी, हल्ला इ.पासून रक्षण करणारा पोलिस, न्यायाधिकारी, तोही बाप
परंतु, सर्वांत मोठी भिती मृत्युची! त्या भितीपासून सुटका करणारा समर्थ सद्गुरू, हा वरील चारही बापांपेक्षा श्रेष्ठ बाप!
*उपजलिया बाळकासी तत्त्वतां । पंचविध जाण पिता ।*
*जनिता आणि उपनेता । तिजा प्रतिपाळिता अन्नदानें ॥*
*जो भयापासूनि सोडविता । जे बंधविमोचन करविता ।*
*जो देहाचें मरण चुकविता । तोही पिता शास्त्रार्थें ॥*
*यांवेगळा पांचवा पिता । जो झाडणी करी पंचभूतां ।*
*मृत्यूपासून सोडविता । जो गर्भव्यथा निवारी ॥*
*ज्याचे देखिलिया चरण । बांधूं न शके भवबंधन ।*
*तो सद्गुरु पिता जाण । भाग्येंवीण न पाविजे ॥*
*उपजलिया बाळकासी तत्त्वतां । पंचविध जाण पिता ।*
*जनिता आणि उपनेता । तिजा प्रतिपाळिता अन्नदानें ॥*
*जो भयापासूनि सोडविता । जे बंधविमोचन करविता ।*
*जो देहाचें मरण चुकविता । तोही पिता शास्त्रार्थें ॥*
*यांवेगळा पांचवा पिता । जो झाडणी करी पंचभूतां ।*
*मृत्यूपासून सोडविता । जो गर्भव्यथा निवारी ॥*
*ज्याचे देखिलिया चरण । बांधूं न शके भवबंधन ।*
*तो सद्गुरु पिता जाण । भाग्येंवीण न पाविजे ॥*
रसाळ भागवत म्हणजे नाथभागवत।। आता यासंदर्भात भागवतातील एक उद्बोधक चरित्र ओझरतं बघुया...
अंबऋषी आपल्या सर्वांना माहीत आहेत! या अंबरिष राजाकडे सर्व सुखोपभोगी झगमगाट, ऐश्वर्य होतं. तरीदेखील त्याला एक काळजी होती. किती काळ हे आहार, निद्रा, भय, मैथुनंच, ही काळजी. ही काळजी अर्थातच भितीतून निर्माण झालेली होती. आणि ही भिती होती जन्ममृत्युची! अंबरिष हा एक श्रेष्ठ विष्णूभक्त असल्यानें त्यानें जन्ममृत्युच्या भितीपासून सुटका करून घेण्यासाठी दृढ निष्ठेने नामस्मरण सुरू केलं....
हे पाहून भगवंताला वाटलं, "हा माझा अनन्य भक्त आहे आणि हा पुन्हा जन्म नको या विचाराने मुक्तीच्या मागे लागला आहे. हा जर मोक्षपदाला गेला तर माझं कसं होईल? यानें तर पुन्हा पुन्हा जन्म घेऊन भक्तीरस चाखावा आणि मला देखील भुलवावं."
म्हणून मग, शिव अवतारी दुर्वास ऋषींनी लीला केली. अंबरिषाचं एकादशी व्रत होतं. एकादशीला उपवास करून दिवसभर नामानुसंधान राखायचं आणि दुसऱ्या दिवशी साधनद्वादशी करून उपवास सोडायचा... एका द्वादशीला पहाटे दुर्वास ऋषी राजाकडे आले आणि मी नदीवर स्नान करून आल्यावर आपण सोबत उपवास सोडायचा अशी आज्ञा दिली. बराच वेळ झाला तरी दुर्वास ऋषी आले नाही हे पाहून व्रतभंग होऊ नयें आणि मुनींचा अनादरसुद्धा होऊ नयें म्हणून अंबरिष राजानें तुलसी तिर्थ घेऊन उपवास सोडला.
यांवर दुर्वास ऋषींना क्रोध अनावर होऊन त्यांनी राजाला दहा जन्म घ्यावें लागतील असा शाप दिला! या शापामुळे राजा अतिशय दुःख झाले. तेंव्हा, नारायण भगवान प्रगट झाले आणि म्हंटले, 'राजा, तुझं यात कल्याणच आहे. तू दहावेळा जन्म घे आणि तुझ्या भक्तीप्रेमासाठी मी सुद्धां दरवेळी जन्म घेईल. तू प्रत्येक जन्मात नाम घे, मी तुला प्रेम देईल!
आणि मग हे 'नामप्रेम' पुढे चालूच राहीलं. अंबरिष, प्रल्हाद, अंगद, उद्धव असं करता करता पुढे नामदेव आणि तुकारामापर्यंत हे सुरूच राहिलं.
आणि मग हे 'नामप्रेम' पुढे चालूच राहीलं. अंबरिष, प्रल्हाद, अंगद, उद्धव असं करता करता पुढे नामदेव आणि तुकारामापर्यंत हे सुरूच राहिलं.
या दहा जन्मात 'नामप्रेम' इतकं उचंबळलं की तुकारामाच्या अवतारात या भक्तानें आता दहा जन्म झाले असले तरी मला आता मोक्ष नको. मी पुन्हा जन्म घेईल आणि हे नारायणा, तु सुद्धां पुन्हा ये!
*न लगे मुक्ती धनसंपदा । संतसंग देई सदा ।।*
*तुका म्हणे गर्भवासी । सुखे घालावे आम्हासी ।।*
*न लगे मुक्ती धनसंपदा । संतसंग देई सदा ।।*
*तुका म्हणे गर्भवासी । सुखे घालावे आम्हासी ।।*
ज्या गर्भवासाच्या भितीनें अंबरिषाने साधना केली, तो गर्भवास गेला नाही पण ती जन्ममृत्युची चिंता, काळजी मात्र कायमची गेली.
*जन्म-मरणाची विसरलो चिंता ।*
*तूं माझ्या अनंता मायबापा ।।*
तेंव्हा,
*घेईन मी जन्म याजसाठी देवा ।*
*तुझी चरणसेवा साधावया ।।*
*जन्म-मरणाची विसरलो चिंता ।*
*तूं माझ्या अनंता मायबापा ।।*
तेंव्हा,
*घेईन मी जन्म याजसाठी देवा ।*
*तुझी चरणसेवा साधावया ।।*
*("नामप्रेम" पुस्तकातून साभार)*


No comments:
Post a Comment