Tuesday, March 20, 2018

भगवंताचे मर्म ओळखणारा भक्त: केवट


 🌹🌷" नामप्रेमचिंतन " 🌹🌷


भगवंताचे मर्म ओळखणारा भक्तकेवट

श्रीराम!

अखिल मानवजातीसाठी आदर्श आणि कल्याणकारी जीवन जगण्याची संहिता देणारा अद्वितिय अध्यात्म ग्रंथ म्हणजे रामायणपरब्रम्ह परमात्म्यानें मर्यादापुरूषोत्तम श्रीराम अवतारांत नीतिधर्म पालनाची शिकवण आचरणातून दिलीचपण या अवतारात रामरायाबरोबरच कितीतरी असें चरित्र आपल्याला बघायला मिळतील ज्यांनी भक्तीकर्मज्ञानसेवावैराग्याचे उच्चतम आदर्श उभे केलेयांतीलच एक मर्मज्ञ भक्त म्हणजे केवट!

प्रत्येक भक्ताचा शरणागतभावनिष्ठासाधनेतील चिकाटी भगवंत चांगल्या प्रकारे ओळखून असतोचपरंतु भगवंताचं मर्म ओळखणारा भक्त क्वचितच!जन्मजन्मांतरीची तपःसाधना करूनही ज्याचें मर्म मोठमोठ्या ऋषिमुनींना ओळखता येत नाहीं त्या श्रीरामासमोर उभे राहून केवट म्हणतो कींमी तुमचे मर्म ओळखले आहे.

रामरायाला नदीपार करून देण्यासाठी जेंव्हा केवट आला तेंव्हा तो भगवंताला एक विचित्र मागणी करतो की, "तुम्ही मला तुमचें पाय धुवायला सांगा." तो सरळ म्हंटला नाही कीं, "मला तुमचें पाय धुवू द्या." याचें कारण त्याच्या पूर्वजन्मात आहे....
हा केवट पूर्व जन्मी क्षीरसागरातील कासव असतांना नारायणाच्या दर्शनाला गेला होतापरंतु त्यावेळी भगवंताचें पाय लक्ष्मीच्या ताब्यात असल्यामुळे ती काही कासवाला दर्शन घेऊ देईना आणि शेष काही देवाची निद्रा मोडू द्यायला तयार होईना.
"पाय लक्ष्मीच्या हाती । तिसी यावी काकुळती । तुका म्हणें शेषा । जागे करा ऋषिकेषा ।। परंतुशेषाने दर्शन घेऊ दिले नाही आणि लक्ष्मीनेही दया दाखवली नाही.कासवाची ती इच्छा अपूर्ण राहिल्याने पुनर्जन्म झालायोगभ्रष्ट म्हणून तो कासव नदीकिनारी केवट झाला.

केवट झाल्यावर मागच्या पुण्य प्रभावानें स्वतः रामचंद्र त्याच्याकडे नदीपार करण्यासाठी आलेपण पुन्हा तीच परिस्थितीत्यावेळी लक्ष्मी व शेष दोघे होतेयावेळी ते दोघे सीता व लक्ष्मण या रूपात भगवंताजवळ होतेचतेंव्हा आता परत दर्शनाला प्रतिबंध होऊ नयें म्हणून दोघांचा मालक असणाऱ्या रामाला केवट म्हणाला की, "तुम्ही म्हणा कीतू माझे पाय धूमग हे विरोध करू शकत नाहीम्हणजे कोणताच प्रतिबंध राहणार नाहीतेंव्हा तुमचें पाय धुवायला तुम्हीच सांगा." आणि मग पुढे रामरायानें कृपा केल्यावर त्याचा जन्म सुफल झाला.

वरील प्रसंगाप्रमाणेंआपण सद्गुरूंना म्हणावे, "महाराजमाझे मी गेलो तर माझी लायकी पाहून भगवंत मला स्विकारेल की नाही शंका आहेपण तुम्ही माझा हात रामाच्या हातात दिला कीत्यानें स्विकारायचे की नाही हा प्रश्नच नाहीतुम्ही दिलेलें नाम मी निष्ठेनें घेईलपण तुम्ही माझ्यावर कृपा करून मला रामाच्या चरणी घाला!" केवट प्रमाणें आपल्यात हा निष्ठायुक्त शरणागतभाव येणें हेंच श्रेष्ठ भक्तीचं मर्म!

5 comments: