Saturday, March 24, 2018

अतुल्य त्याग, सेवा व पराक्रमाचा संगम: लक्ष्मण


 🌹🌷" नामप्रेमचिंतन " 🌹🌷

रामायण ! 

अतुल्य त्यागसेवा व पराक्रमाचा संगमलक्ष्मण

श्रीरामशेष हा भगवान नारायणाच्या सोबतच राहणारया न्यायानें रामावतारांत शेषाने लक्ष्मण रुपानें रामचंद्राची सेवा हाच मुख्य धर्म आणि हेंच परमध्येय मानलें.
अत्यंत निष्कपटतेजस्वीत्यागी आणि पराक्रमी लक्ष्मण विश्वामित्रांकडे यज्ञरक्षणासाठी आणि वनवासांत रामसीता सेवेसाठीं सदैव छायेप्रमाणें भगवंताबरोबर राहिला.वास्तविक पितृवचनाची पुर्ती रामालाच बंधनकारक असुनही लक्ष्मणानें सुद्धां १४ वर्षे ब्रम्हचर्यव्रतानें केवळ रामसीता सेवेंसाठी वनवास भोगला.

वनवासाला निघण्यापुर्वी माता सुमित्रा लक्ष्मणाला म्हंटली, "रामालाच साक्षात पिता दशरथसीतेला माझ्याठिकाणी आणि वनाला अयोध्या समजत्यांच्या सेवेंत चुकूं नकोसआपला ज्येष्ठ बंधूश्रीराम हीच तुझी परमगती आहे."
आणि एक महत्वाची सूचना याठिकाणी सुमित्रा मातेनें लक्ष्मणाला केली, 'हे बघतू क्रोधावतार आहेसपण या वनवास काळांत तुझ्या मनांत जागेपणी तर सोड स्वप्नांतसुद्धा मोहमदअहंकार इविकार येऊ देऊ नकोस!'
यांवर लक्ष्मणानें उत्तर दिलं ते फार बोधप्रद आहेच पण आचरायला कठीण आहेतो म्हंटला, 'मातेमी जागेपणी तर मी पूर्ण काळजी घेईलपण झोपल्यावर चुकून स्वप्नात मनामध्यें विकार आले तर तुझा अनादर होईलपरंतुमी झोपलो तर स्वप्न पडेल ना!'
असं म्हणून या सेवाधर्मी लक्ष्मणानें १४ वर्ष जागरणाचा संकल्प केला आणि तो तडीस नेला....
हे केवळ लक्ष्मण आणि लक्ष्मणच करू शकतोमन हा इंद्रियांचा राजा आहेत्या मनांत कोणताही विकार येऊ नयें म्हणून ज्याचं लक्ष मनांवर आहेतो लक्ष्मण!

लक्ष्मणाचे स्वभाववैशिष्ट्य म्हणजे त्याच्या मनाला जी गोष्ट खटकत असेती तो प्रखर शब्दांत श्रीरामासमोर मांडत असेंअर्थात वीररसाच्या आवेशात आणि रामाच्या प्रेमानें विवश होऊन तो असें वागायचा पण श्रीराम त्याला लगेच शांत करीत.
एकूण अवतारकार्यात लक्ष्मणानें फक्त एकदांच रामाच्या आज्ञेचें उल्लंघन केले ते म्हणजे सुवर्णमृग प्रसंगी वनदेवतांवर सीतेची जबाबदारी टाकून तो सीतेच्या कठोर आज्ञेपोटी रामाकडे गेलात्याचा परिणाम काय झाला हे आपल्याला ठाऊकच आहेम्हणूनच अवज्ञा कदा हो यदर्थी न किजे । मना सज्जनां राघवी वस्ती किजे ।।
सीताहरणानंतर सुग्रिवानें जेंव्हा जंगलात सापडलेली आभुषणें दाखवलीतेंव्हा लक्ष्मण म्हणाला, "हे बाजुबंद आणि कुंडले माहीत नाहीतपण ही पैंजणे मात्र नक्कीच सीतामातेची आहेतकारणनमस्कार करतांना ती नजरेंस पडत होती!" असें ब्रम्हचर्य व्रतपुज्यभाव आणि मर्यादा आजपर्यंतच्या मानव इतिहासात इतर कुठे बघायला मिळेल?

लंकाविजय करून रामराया अयोध्येत परत आल्यावर एकदां अगस्ती ऋषी रामदरबारात आले होते. अगस्ती ऋषी म्हंटलेंलक्ष्मणासारखा वीरपुरूष त्रिभुवनांत नाही,रामसुद्धा नाहीं. रामानें कुंभकर्णरावणासारख्या महापराक्रमी राक्षसांना मारलं यांत मोठी विरता आहेपरंतुइंद्रजीतला मारणं सर्वांत दुष्कर कार्य होतंकारण,इंद्रजीतला वरदान होतं कीज्यानें १४ वर्षांत निद्रा भोगली नाहीस्त्रीचं मुख पाहिलं नाही आणि भोजनही केलं नाहीअसाच वीर त्याला मारू शकत होताअसा वीर लक्ष्मणाशिवाय दुसरा कुणी नव्हता....
१४ वर्ष निद्रा नाहीस्त्रीचा चेहरा बघितला नाही हे वैराग्य माहीत आहेपरंतु भोजनाचं काय?
तरवनवासांत लक्ष्मण दररोज जी फळे तोडून आणत होतात्याचे तीन भाग करून रामराया व सीतामाईला दिल्यावर तिसरा भाग तसाच ठेवून देत असे. (शबरीची बोरं न खाण्याचं कारण इंद्रजीतला संपवणें हे होतं)
चौदा वर्षे लक्ष्मणानें स्वतःच्या वाट्याची फळे तशीच ठेवून दिलीती मागवण्यात आली तर त्यातील फळांत ७ दिवसांची फळे कमी आढळलीत्या सात दिवसांचा हिशोब लक्ष्मणानें दिला....वनवासांत दशरथ महाराजांच्या स्वर्गवासाची बातमी समजल्यावर निराहाराचे दिवसांत फळे आणलीच नाहीइंद्रजीतनें नागपाशात बांधले त्या दिवशी,रावणानें शक्ती मारली त्या दिवशी आणि रावणवधाच्या आनंदानें आणखी एक दिवस अशाप्रकारे सात दिवस फळे न आणल्यानें त्या सात दिवसांची फळे कमी भरली!

अतुल्य पराक्रमानें इंद्रजिताचा वधश्रीराम राज्याभिषेकानंतर सीतामातेला वनवासात नेऊन सोडण्याच्या ह्रदयविदारक आज्ञेचे पालन आणि शेवटी प्रत्यक्ष रामरायानें आपलासुध्दां त्याग केल्यावर शरयूत देहत्याग करून अवतारसमाप्तीभगवंतानें स्वमुखानें भक्ताला भक्तीचं तत्वज्ञान सांगावं हे क्वचितच घडतंआपण मागे एकदां रामरायानें शबरीला नवविधा भक्तीचं स्तवन केलेलं बघितलंशबरी व्यतिरिक्त आणखी एका भक्ताला भगवंताच्या मुखांतून नवविधा भक्तीचं चिंतन श्रवण करण्याचं भाग्य लाभलंतो भक्त म्हणजे "लक्ष्मण"!

लक्ष्मणाच्या एकूण चरित्रातला प्रत्येक गुण आजच्या माणसाला आदर्श तर आहेच पण तो आचरणांत आणून जीवन राममय करण्यासाठी बोधप्रद आहेया अनुपम चरित्राइतकं नाही तरी किमान परस्त्री मातेसमान मानून अतिआहारअतिनिद्राअतीबोलणं टाळलं आणि मनाचं लक्ष नामाकडें ठेवून कर्तव्य केलं तर आपलं जीवन कृतार्थ होईलयात संशय नाही!

("नामप्रेम" पुस्तकातून साभार)

   !!! जानकी जीवन स्मरण जय जय राम !!! 🙏

No comments:

Post a Comment