Tuesday, March 20, 2018

वेदाधिष्टित ज्ञानोपासक कर्म : रामजन्म


  🌹🌷" नामप्रेमचिंतन " 🌹🌷


रामायण !
वेदाधिष्टित ज्ञानोपासक कर्म रामजन्म

श्रीराम!
माझ्या अंतःकरणात कोणत्याही परिस्थितीत खळबळ न होताचिरसमाधानाचा अनुभव यावा असं वाटत असेल तर योग्य पार्श्वभुमी तयार करावीही पार्श्वभुमी कशी तयार करावीयाचा विस्तृत आदर्श ज्या जीवनग्रंथात दिसतोत्याला म्हणतात "रामायण"!
रामायण हा ग्रंथ आणि रामावतार यांत श्रीराम हा मर्यादा पुरूषोत्तम आहेचपरंतु इतर व्यक्तीदेखील संपूर्ण जगतासाठी सर्वकालीन वेगवेगळे आदर्श प्रस्थापित करतांना दिसतात.
वाल्मिकी मुनींची तपःसाधना पूर्ण झाल्यावर त्यांना समाजासाठी एक आदर्श जीवनाची आचारसंहिता ग्रंथरूपानें मांडायची होतीत्यासाठी त्यांनी आपल्या सद्गुरूंना म्हणजे नारद महर्षींना विचारलं कीसांप्रत युगांत संपूर्ण जगताला आदर्शवत् चरित्र कुणाचं आहे?
नारद महर्षींनी सांगितलंज्या नामाचं तू अखंड स्मरण केलंस तो नामी श्रीराम हाच मर्यादा पुरूषोत्तम आहेतोच परब्रम्ह परमात्मा आहेआणि मग नामाच्या तपोबलानें नामसाधकानें नामीचं विस्तृत चरित्र लिहिलं!
रामराया हा जगकारण आहेपरंतुत्याच्या जन्माचं कारण म्हणजे त्याचे माता पिता म्हणजेच दशरथ महाराज आणि तीन माता!
भगवंतानें आपल्या अवतारासाठी या चौघांची निवड करण्याचं कारण म्हणजेज्ञान शक्तिश्च कौसल्या सुमित्रोपासनात्मिका । क्रिया शक्तिश्च कैकेयी वेदो दशरथो नृप।।
कौसल्या माता ही ज्ञानाचं प्रतिक आहेसुमित्रा माता ही उपासनेचं तर कैकयी माता ही कर्माचं प्रतिक आहेदशरथ राजा वेदस्वरूप आहेया माता-पिताबद्दल किती सांगावं आणि किती नाही असं आहे....
कौसल्या माता मुर्तीमंत ज्ञानपूर्व जन्मातील मनु महाराज व त्यांची पत्नी शतरुपा यांच्या दृढ तपश्चर्येनं त्यांनी विष्णू भगवंत आमचा पुत्र व्हावाहा वर मागितला!
आणि त्या अद्वितिय साधनेमुळेंच त्रेतायुगांतच नाही तर द्वापारयुगांत देखील त्यांना परब्रम्ह परमात्म्याचे माता पिता बनण्याचं सद्भाग्य लाभलं!
ही कौसल्या माता रामराया वनवासाला निघालेतेंव्हा राम कोण आहे याचं ज्ञान असल्यानें रामाला उपदेश करते कीवन म्हणजेच अयोध्या आणि वनवासी म्हणजे अयोध्यावासी मानून त्यांची सेवा कर!
ज्या भगवंताला पुत्र म्हणून प्राप्त केलंत्याचा असा वियोग होत असुनही उद्विग्नता आली नाहीती कौसल्या!
सुमित्रा माता ही उपासनेचं प्रतिकउपासना म्हणजे जवळ असणेंआपली दोन्ही मुलं सेवेसाठी तत्पर बनवलेंलक्ष्मणानें जशी रामाची सेवा केलीतशीच शत्रुघ्नानें भरताची सेवा केली!
जेंव्हालक्ष्मण सीतारामासोबत वनवासाला निघू लागला तेंव्हाचा सुमित्राचा उपदेश आजही आदर्शवत् आहे!
सुमित्रा माता सौमित्राला म्हंटलीतुम्हरे ही भाग राम बन जाई।
लक्ष्मण वाईट वाटून म्हंटला, 'माझ्यामुळें रामराया वनवासांत जात आहेतअसं असेल तर मी आत्ता प्राणत्याग करेन! '
सुमित्रा माता म्हंटली, "तू शेष आहेसतुझ्यावर पृथ्वीचा भार आणि पृथ्वीवर पापाचा भार आहेपापीदुराचारी दुष्टांचं निर्दालन करण्यासाठी राम वनवासांत जातोयम्हणजेच तुझ्यावरील भार कमी करण्यासाठी वनवासांत जात आहेतेंव्हात्याला पितासमान आणि सीतेला माझ्याजागी मानून त्यांची सेवा कर!"
काय सांगू खरंचरामचरित्रात सगळीकडे त्याग आणि समर्पणाची स्पर्धा दिसून येते!
माता कैकयी!
संपूर्ण जग कैकयीला नांव ठेवतंदोष देतंकुणीही आपल्या मुलीचं नाव कैकयी ठेवत नाही...
परंतुकैकयी सारखं रामप्रेमकैकयीसारखी रामभक्ती एकमेवद्वितीय!
दशरथाचं सर्वाधिक प्रेम कैकयीवर होतंयाचं कारण कैकयीचं सर्वाधिक प्रेम रामावर होतं!
रामाला वनवासांत पाठवलं नाही तर राम विनाकारण राक्षसांचाविशेषतः रावणाचा संहार करणार नाही. परंतुजेंव्हा दशरथ महाराजांनी रामाच्या राज्याभिषेकाची घोषणा केलीतेंव्हा सर्व चक्र उलटे फिरवण्यासाठी काहीतरी विपरित होणं अनिवार्य होतंआणि त्यासाठी रघुवंशातील कुणाला तरी वाईटपणा घेणंही अनिवार्य होतंहा वाईटपणा आणि पुढील दुःखद घटनांचा कलंक स्वतःवर घ्यायला जी व्यक्ती तयार झालीती म्हणजे "कैकयी माता"!
कैकयीचं रामावर प्रेम होतं आणि रामाचंही कैकयीवर नितांत प्रेम होतंयाचा पुरावा काय?
कैकयी मातेनें रामाला वनवासांत जाण्याची आज्ञा केल्यावर राम म्हंटलें, ''मातेतुझं माझ्यावर किती प्रेम आहेमला आतापर्यंत तुमची सेवा घडली आणि आता अरण्यातील ऋषी मुनींचं दर्शनत्यांची सेवात्यांची कृपा मला मिळावीम्हणून तू खासकरून मलाच वनवासांत पाठवत आहेसपरंतुपिताश्री दुःख करत आहेतयाचा अर्थ माझ्याकडून काहीतरी फार मोठा अपराध घडला आहे!"
यांवर कैकयी माता म्हंटली, 'रामाअपराधतुझ्याकडून स्वप्नांतसुद्धा लहानसादेखील प्रमाद होऊ शकत नाही!' या प्रसंगावरून दोघांचं आपापसातील प्रेम दिसून येतं!
वनवास संपवून परत आल्यावर रामानें कौसल्येपेक्षा कैकयीजवळ जास्त वेळ घालवला!
आणि सर्वांत मोठा पुरावा म्हणजे कैकयीला रामावर प्रेम व्यक्त करायला हा जन्म पुरला नाहीरामरायाला तिच्याकडून जास्त लाड करवून घेता यावें म्हणून द्वापारयुगांत रामराया आले कृष्ण बनून आणि कैकयी मातेचा पुनर्जन्म म्हणजे माता यशोदा!
द्वापारयुगांत तर या माता-लेकराच्या प्रेमानं जग जिंकलं!
अशी ही कैकयी माता मंथरेचा कुसंग लाभल्यानें क्रोधी बनली आणि प्राणप्रिय मुलाला वनवासांत पाठवलं!
मंथरा ही लोभविषयाचं प्रतिक आहेलोभविषय आणि क्रोध जिथें एकत्र येताततिथें रामराज्य नाही रामवनवास होतो!
हीच कैकयी माता पुढील जन्मात आपल्या लाडक्या मुलाला इतकं लोणी लावते की कृष्ण म्हणजे नवनीत हे समिकरण तयार झालं!
तेंव्हाकुसंग टाळावा आणि आपला विवेक जागृत ठेवण्यासाठी सतसंग धरावाकारणबिनू सतसंग विवेक न होई । राम कृपा बिनू सुलभ न सोई ।।


        ("नामप्रेम" पुस्तकातून साभार)

🙏  !!! जानकी जीवन स्मरण जय जय राम !!! 🙏


No comments:

Post a Comment