Sunday, March 25, 2018

शांती, साहस व असामान्य पातिव्रत्य: सीतामाई


 🌹🌷" नामप्रेमचिंतन " 🌹🌷

रामायण 

शांतीसाहस व असामान्य पातिव्रत्यसीतामाई

श्रीराम
जेंव्हा जेंव्हा जगत्कार्य करण्यासाठी भगवंतानें अवतार घेतलातेंव्हा तेंव्हा त्याच्यासोबत शक्ती कार्य करत होतीशिव-शक्ती एकत्र आल्याशिवाय साधुंचे परित्राण व दुर्जनांचा विनाश होत नाहीयाच न्यायानें भगवंतानें त्रेतायुगांत विप्र धेनु सुर संत हित लीन मनुज अवतार । आणि या कार्यात सीता ही शांती रूपानें अवतरीत झाली...
वैशाख शुद्ध नवमी यादिवशी यज्ञासाठी भूमी नांगरताना मिथिलानरेश जनकाला जमिनीतून एक मुलगी मिळालीनांगराच्या फाळाला सीत आणि सीतने जमिनीवर ओढलेल्या रेघेस सीता म्हणतातम्हणून जनकाने या मुलीचे नाव सीता’ ठेवले....

जे शिवधनुष्य रावणबाणासूर आदी वीर साधे हलवूही शकत नव्हतेते शिवधनुष्य सीतेनें लहानपणी खेळता खेळता उचलले होतेअशा या शक्ती रुपी जगज्जननी सीतेनें स्त्रीजन्मासाठी पुढे एक आदर्शवत् जीवन जगलेरामराया स्वयंवरासाठी मिथिलेत आले तो प्रसंग फार विलोभनीय आहे....
विश्वामित्र मुनींसोबतचे दोन महातेजस्वी तरूण पाहून विरागीविदेहीनिर्गुणोपासक जनक महाराज सुद्धां राजस सुकुमार मदनाचा पुतळा असलेल्या रामाच्या प्रेमात पडलेजनकानें विश्वामित्र मुनींना विचारलें, 'महाराजहे दोन तरूण नेमके कोण आहेतमुनीकुलतिलक की नृपकुलपालककी ज्याचं वर्णन करतांना वेदांनी नेति नेति म्हंटलं ते ब्रम्ह युगल अवतारांत आलं?'
विश्वामित्र मुनीं हसूनपण नम्रतेनं म्हंटलेंराजन् तुम्ही कधीही असत्य बोलू शकत नाहीहे दोन तरूण सर्व ऋषी मुनींचं रक्षण करण्यासाठी माझ्यासोबत आल्यानें ते मुनीकुलतिलक आहेतते दोघं अयोध्यासम्राट दशरथ महाराजांचे चिरंजीव असल्यानें ते नृपकुलपालक सुद्धां आहेत!
हे ऐकून जनक महाराजांना रामाच्या परब्रम्ह तत्वाची खात्री पटली!

आता हा विदेही जनक सगुण साकार परब्रम्हाच्या रुपाला भुलून विचार करू लागला की या रामाशी मला नातं जोडलं पाहिजेपण कोणतंजनक मनांत विचार करतो, 'मी याचा पिता बनू शकलो नाहीपरंतुमी ब्रम्हज्ञानी आहेमग मी याचा गुरू बनू शकतो कापणवसिष्ठविश्वामित्र मुनी याचें गुरू असल्यानें मी त्याचा गुरू बनलो तर त्यांचा अनादर होईलपिता बनू शकलो नाहीगुरू बनू शकत नाहीपरंतुआता जर विधात्यानें कृपा केली आणि याच्या हातानें शिवधनुष्य भंग झालं तर याला माझा जावई करून याचा सासरा तरी बनेलपण काही ना काही नातं मात्र नक्कीच जोडेलसंधी सोडणार नाही!
कल्पना करा काय मानसिक अवस्थेत जनक महाराज असतीलयांतून एक महत्वाचा बोध मिळतो कीब्रम्हज्ञान प्राप्त होऊनहीवैराग्यसंपन्न अधिकारी महात्मा बनुनही जोपर्यंत भगवंताचं सगुण प्रेम मिळत नाहीतोपर्यंत जीवन कृतार्थ झाल्यासारखं वाटत नाहीआणि हे रामप्रेम प्राप्त करून घेण्यासाठी रामाशी कोणतं तरी एक नातं जोडलं पाहिजेमाझा राम सखामी रामाचा दासनित्य बोलावें। हाचिं सुबोध गुरूंचारामापाशी अनन्य वागावें ।।

या इच्छापुर्तीसाठी जनकानें मग विश्वामित्र मुनींना महालात निवासाचा आग्रह केलाआणि रामरायाच्या निवासासाठी सर्वांत सुंदर सदन जे सीतेचं होतं ते रिकामं केलं.सीतेच्या सदनाचं नावच 'सुंदरसदनहोतंआणि बरोबरच आहेभगवंत जे शांतीरूप सुंदर सदन आहे तिथेंच निवास करतोआपण आपलं अंतःकरण नामप्रेमानें सुंदर बनवलं की रामराया तिथेंच वास्तव्य करेल!
याठिकाणी पुढील विलोभनीय प्रसंग अनेक आहेतपण आता मोह आवरतो आणि पुढे जातो....
संपूर्ण रामायण हे त्यागाच्या अधिष्ठानावर आहेयाची प्रचिती येते ती वनवास वचनाच्या प्रसंगापासून...

रामचंद्र वनवासांत जाण्यासाठी आनंदानें सज्ज झाले असतांना सीतेनें देखील कैकयी मातेविरुद्ध कोणताही आकांडतांडव न करता स्वतःदेखील वनवास भोगण्यासाठी सज्ज झाली....
रामानें विरोध केल्यावर ही शांतीमाता म्हंटलीतुम्ही माझे पती आहात आणि मी तुमची पत्नी आहे म्हणून मी तुमच्या सोबत येण्याचा हट्ट धरला आहे असं नाहीतर तुम्ही रामचंद्र आहात आणि मी चंद्रिकाचांदणी चंद्रासोबतच राहणारहा विधीनियम आहेतो तुम्ही नाकारू शकत नाहीतेंव्हा मला तुमच्यासोबत येऊ द्या!
शंभू तेथें अंबिकाचंद्र तेथें चंद्रिका। संत तिथें विवेकाअसणे चि की।।
वनगमनाच्या वेळी कैकयीनें सीतेला वल्कले नेसायला दिल्यावर वसिष्ठांसारख्या तपोनिष्ठ महर्षींनी सुद्धां प्रक्षुब्ध मनानें कैकयीची निर्भत्सना केलीपण सीतेच्या मनांत आपल्या सासूबद्दल कोणताही विकार किंवा क्रोध आला नाहीं.
श्रीरामाच्या तोंडून वनवासातील अनेक प्रकारच्या क्लेशांना ऐकूनही सीता आपल्या निश्चयापासून यत्किंचीतही ढळली नाहीत्यामुळेंपतीसेवेपुढे जगातील सर्व सुख आणि वैभव तुच्छ मानणाऱ्या सीतेला रामाला सोबत घ्यावें लागले.

सीताराम मला प्राप्त व्हावें ही जशी आपली इच्छा आहे तशीच इच्छा रावण व शुर्पणखा यांची सुद्धां होतीरावणाला सीता हवी होती तर त्याच्या बहिणीला राम हवा होतापरंतुया बहीण-भावांचा हेतू आणि मार्ग शुद्ध नव्हता!
श्रीराम हा भगवंत आणि सीता ही शांतीशांती सीता समाहिता आत्मारामो विराजते। असं आद्य शंकराचार्यांनी वर्णन केलं आहेशुर्पणखानें शांतीला दूर करून भगवंत आणि रावणानें भगवंताला दूर करून शांती प्राप्त करण्याचा प्रयत्न केलाआणि जो कपटाचरणानें हरण करून शांती प्राप्त करण्याचा प्रयत्न करतोत्या रावणाचा शेवट कसा झालाहे आपल्याला माहीत आहे!

अशोकवनांत रावणानें आपले वैभव आणि प्रलोभने दाखवून सीतेचें मन विचलीत करण्याचे काही कमी प्रयत्न केले नव्हतेंपरंतुआपल्या पतिव्रता धर्म आणि श्रीराम निष्ठेपासून सीतामाई स्वप्नांतसुद्धां ढळली नाहींतिन्ही अवस्थेत आणि कुठल्याही परिस्थितीत मनबुद्धीचित्तामध्यें केवळ पतीपरमेश्वराचेंच ध्यान हे या मातेचें चरित्र आहे.
पुढे रावणवधानंतर अग्नीदेवतेनें जिच्या पावित्र्याला सिद्ध केलें अशा सतीसाध्वी सीतेला लोकापवादासाठी गर्भिणी अवस्थेत पुन्हा वनवास भोगून शेवटी पाताळप्रवेश करावा लागला.
प्रेमममता आदी भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असलेल्या रामचंद्राच्या बरोबरीचें किंबहुना काकणभर वरचढ ठरलेल्या सीतामाईचें साहसधर्मपरायणताक्षमा आणि सेवाभाव पूजनीय आणि अनुकरणीय आहे!


("नामप्रेम" पुस्तकातून साभार)

   !!! जानकी जीवन स्मरण जय जय राम !!! 🙏

No comments:

Post a Comment