🌹
🌷
" नामप्रेमचिंतन "
🌹
🌷
शंका : पूजन आणि
अर्चन यातील फरक सांगावा! कारण प्रभु रामचंद्रांनी बिभीषणाला हे दोन्ही निरनिराळं सांगितलं म्हणजे नक्कीच दोन्हीत फरक
असणार ना?
➡
श्रीराम!
रामरायानें बिभिषणाला जी साधनपद्धती सांगितली ती स्वानुभवातून सांगितली असावी! भगवान शंकर हे सतत रामनामांत दंग असतात, त्याचप्रमाणें
श्रीराम शंकराला आपलं आराध्य दैवत मानतात. लंकेपर्यंत पोचण्यासाठी शिवपिंड स्थापन
करून त्याचे बिल्वपत्रअर्चन रामरायानें केलेलं आहे! म्हणूनच रामरायानें बिभिषणाला
शंकराचे अर्चन करायला सांगितलं.
आपण म्हणतो
मायबापाची पुजाअर्चा करणें म्हणजे त्रीभुवनाची पूजा केल्यासारखं आहे! रामरायानें
नेमकं हेंच बिभिषणाला सांगितलं. श्रीरामाचे आराध्य दैवत शिवभगवान! "शिव माझे
अलौकिक पिता आणि सती(पार्वती) ही माझी माता" हा राघवाचा भाव होता! सती सीतेचं
रूप घेऊन आली तेंव्हा रामरायानें तिला माता म्हणून वंदन केलं!
रामराया
स्वतः मायबापाची पुजाअर्चा करतो. मायबाईची पूजा म्हणजे पार्वतीचे पूजन; तर बापाची
अर्चा म्हणजे शंकराचे अर्चन! मग रामरायानें बिभिषणाला हे स्वतः
आचरण केलेलं सांगितलं की, शंकराचे अर्चन कर आणि पार्वतीचे पूजन कर!
अर्चनमध्ये
पूजा इ. असते पण समर्पणभाव प्रधान असतो; पूजनमध्ये अर्चन असते पण पूज्यभाव
प्रधान असतो. बिभिषणाला
असं पूजन अर्चन भेद सांगण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्याच्या मोठ्या भावानें, रावणानें
शंकराचे अर्चन अतुलनीय केलं. पण पूजनमध्ये म्हणजे सती असो की सीता यांच्याप्रति
पूज्यभाव ठेवला नाही! भावानें केलेला अपराध बिभिषणानें करू नयें म्हणून रामरायानें
त्याला शिवअर्चन आणि पार्वतीपूजन सांगितलं! रावणानें पूजन नाही केलं! यांत
रावणाच्या बाबतीत पूजन म्हणजे "परनारी राहो माता" हा भाव अपेक्षित आहे!
प्रत्येक
जीव शिवस्वरूप मानून त्याची सेवा करणें हे शंकराचे अर्चन;
तर परस्त्री मातेसमान पूजनीय
मानून तिला वंदन करावें हे पार्वतीचे पूजन! हा संकेत रघुनंदन बिभिषणाला देत
असावें! रावणानें
फक्त शिवालाच शिव मानलं! परंतु समस्त जीवांना शिव व परस्त्रीला सती न मानल्यामूळे
त्याचा विनाश झाला!
आपण जर
रामरायानें सांगितल्याप्रमाणें व्यापक पूजन अर्चन केलं नाही तर आपण रावणाच्या
कॅटॅगरीतले आहोत, हे समजून घ्यावं!
पूजन, अर्चन
दोन्ही बघितलंय. आता राहिलं स्मरण! रामरायानें
बिभिषणाला सांगितलं की अर्चन शंकराचे कर, पूजन पार्वतीचे कर, पण स्मरण
मात्र नारायणाचे कर!
नारायणाचं
स्मरण करायला सांगण्याची दोन कारणं असू शकतात. पहिलं कारण म्हणजे रामरायाला वाटलं
असेल माझे मायबाप म्हणजे शिवसती ज्याचं स्मरण करतात तेच सर्वश्रेष्ठ स्मरण असेल!
रामनाम नित शिवजी गाई ।। म्हणून तू
सुद्धां त्याच नारायणाचे स्मरण कर!
दुसरं कारण
म्हणजे आपण संकटात अडकल्यावर मदतीसाठी कुणाला तरी बोलवतो. बिभिषण हा तमोगुणी
लंकेच्या आणि दानवकुळाच्या भवसंकटात अडकलेला आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी त्याने
ज्याच्याकडून मदत घ्यायची त्याचेच स्मरण करावें!
आता भवसागर
पार करण्यासाठी शिवसतीला बोलवायचं तर ते दोघंही एकतर रामनामांत व्यस्त असतात किंवा
शिव रामचरित्राची किर्तनभक्ती आणि पार्वती रामचरित्राची श्रवणभक्ती करण्यात व्यस्त
असतात. मग अशावेळी
जो क्षिरसागरावर निवांत पडलेला आहे, त्या नारायणालाच मदतीला बोलावलं पाहिजे.
आणि
महत्त्वाची गोष्ट म्हणजे रामरायानें बिभिषणाला शंकराचे स्मरण करायला सांगणं म्हणजे
शिवशंकराला बिभिषणाला तार असा आदेश दिल्यासारखं होईल! समर्थ जसं म्हणतात, किती भार
घालू रघुनायकाला । त्याचप्रमाणें
रामरायाच्या मनांत आलं असेल की, किती भार
घालू शिवपार्वतीला ।
आणि
म्हणूनच रामरायानें म्हंटलं, "बिभिषणा, तुला भवसागर पार करायचा असेल तर
नारायणाच्या स्मरणांत रहा!"
हा नारायणच
रघुपतीच्या रूपानें त्रेतायुगांत तुझ्या समोर आहे, हे रामरायानें बिभिषणाला सुचवलं!
त्यामुळेच
दानवी भवसागर पार होण्यासाठी बिभिषण रघुनायकाच्या स्मरणांत राहून म्हणत असेल,
भक्तजनांना
तारायास्तव अवतरला तू भूवरती ।
तुझ्या
कृपेनें भवसागर हा आम्ही तरू हो रघुपती ।।
("नामप्रेम" पुस्तकातून साभार)


No comments:
Post a Comment