🌹
🌷
" नामप्रेमचिंतन "
🌹
🌷
भगवंताचे मर्म ओळखणारा भक्त: केवट
श्रीराम!
अखिल मानवजातीसाठी आदर्श आणि कल्याणकारी जीवन
जगण्याची संहिता देणारा अद्वितिय अध्यात्म ग्रंथ म्हणजे रामायण! परब्रम्ह परमात्म्यानें
मर्यादापुरूषोत्तम श्रीराम अवतारांत नीतिधर्म पालनाची शिकवण आचरणातून दिलीच, पण या अवतारात
रामरायाबरोबरच कितीतरी असें चरित्र आपल्याला बघायला मिळतील ज्यांनी भक्ती, कर्म, ज्ञान, सेवा, वैराग्याचे उच्चतम आदर्श
उभे केले. यांतीलच एक मर्मज्ञ भक्त
म्हणजे केवट!
प्रत्येक भक्ताचा शरणागतभाव, निष्ठा, साधनेतील चिकाटी भगवंत
चांगल्या प्रकारे ओळखून असतोच, परंतु भगवंताचं मर्म ओळखणारा भक्त क्वचितच!जन्मजन्मांतरीची तपःसाधना
करूनही ज्याचें मर्म मोठमोठ्या ऋषिमुनींना ओळखता येत नाहीं त्या श्रीरामासमोर उभे
राहून केवट म्हणतो कीं, मी तुमचे मर्म ओळखले आहे.
रामरायाला नदीपार करून देण्यासाठी जेंव्हा
केवट आला तेंव्हा तो भगवंताला एक विचित्र मागणी करतो की, "तुम्ही मला तुमचें पाय
धुवायला सांगा." तो सरळ म्हंटला नाही कीं, "मला तुमचें पाय धुवू द्या." याचें कारण त्याच्या
पूर्वजन्मात आहे....
हा केवट पूर्व जन्मी क्षीरसागरातील कासव
असतांना नारायणाच्या दर्शनाला गेला होता. परंतु त्यावेळी भगवंताचें
पाय लक्ष्मीच्या ताब्यात असल्यामुळे ती काही कासवाला दर्शन घेऊ देईना आणि शेष काही
देवाची निद्रा मोडू द्यायला तयार होईना.
"पाय लक्ष्मीच्या हाती ।
तिसी यावी काकुळती । तुका म्हणें शेषा । जागे करा ऋषिकेषा ।। परंतु, शेषाने दर्शन घेऊ दिले
नाही आणि लक्ष्मीनेही दया दाखवली नाही.कासवाची ती इच्छा अपूर्ण राहिल्याने
पुनर्जन्म झाला. योगभ्रष्ट म्हणून तो कासव
नदीकिनारी केवट झाला.
केवट झाल्यावर मागच्या पुण्य प्रभावानें
स्वतः रामचंद्र त्याच्याकडे नदीपार करण्यासाठी आले. पण पुन्हा तीच परिस्थिती. त्यावेळी लक्ष्मी व शेष
दोघे होते, यावेळी ते दोघे सीता व
लक्ष्मण या रूपात भगवंताजवळ होतेच. तेंव्हा आता परत दर्शनाला
प्रतिबंध होऊ नयें म्हणून दोघांचा मालक असणाऱ्या रामाला केवट म्हणाला की, "तुम्ही म्हणा की, तू माझे पाय धू, मग हे विरोध करू शकत नाही. म्हणजे कोणताच प्रतिबंध
राहणार नाही. तेंव्हा तुमचें पाय
धुवायला तुम्हीच सांगा." आणि मग पुढे रामरायानें
कृपा केल्यावर त्याचा जन्म सुफल झाला.
वरील
प्रसंगाप्रमाणें, आपण सद्गुरूंना म्हणावे, "महाराज, माझे मी
गेलो तर माझी लायकी पाहून भगवंत मला स्विकारेल की नाही शंका आहे. पण
तुम्ही माझा हात रामाच्या हातात दिला की, त्यानें
स्विकारायचे की नाही हा प्रश्नच नाही. तुम्ही
दिलेलें नाम मी निष्ठेनें घेईल, पण
तुम्ही माझ्यावर कृपा करून मला रामाच्या चरणी घाला!" केवट
प्रमाणें आपल्यात हा निष्ठायुक्त शरणागतभाव येणें हेंच श्रेष्ठ भक्तीचं मर्म!
छान उपक्रम !
ReplyDeleteसमर्थ श्रीराम सत्तेने सुरु आहे! प्रणाम!!!
DeleteKeval apratim
ReplyDeleteश्रीराम समर्थ!!!
DeleteKeval apratim
ReplyDelete