Saturday, March 31, 2018

"रामदूत वायुसुत" या सवाईवर निरूपण

श्रीराम! गेल्या वर्षी सद्गुरू कृपेने साखरखेर्डा येथे झालेल्या "रामदूत वायुसुत" या सवाईवरचे निरूपण -


Sunday, March 25, 2018

श्रीराम चरित्र : सेतू चरित्र


 🌹🌷" नामप्रेमचिंतन " 🌹🌷

रामायण 

श्रीराम चरित्र सेतू चरित्र

श्रीराम!
सज्जनांचे परित्राणदुर्जनांचा विनाश व धर्माची स्थापना करण्यासाठी मला पृथ्वीवर अवतार घ्यावा लागतोअसं भगवंतानें स्वतः म्हंटलं आहेत्रेतायुगातील सातव्या अवतारात परब्रम्ह परमात्म्यानें वरील तीन कारणांपेक्षा मानवी जीवनाचा एक अद्वितिय आदर्श आचरून दाखवण्यावर विशेष भर दिलाया पूर्णावतारी सगुण साकार परब्रम्हाला आपण म्हणतो, "श्रीराम"!
भगवंत अवतरीत होण्यापूर्वी या पृथ्वीवर दशानन रावणाची आसुरी शक्ती दहशत पसरवत होतीसाधूसंतऋषीमुनीभगवद्भक्तांना धर्माचरण करणें अशक्य बनलं होतं.परंतुअशा अनियंत्रीत परिस्थितीत सर्व आतंकी असुरांसह रावणासारख्या महापराक्रमी राक्षसाचा निःपात करण्यासाठीच भगवंतानें रामावतार घेतलाहे पूर्ण सत्य मानता येणार नाही....

रावणाला संपवणें हा भगवंताच्या मनुष्य अवताराचा हेतू नव्हताकारणरावणाला संपवण्याची क्षमता असणाऱ्या अनेक शक्ती या भूतलावर अगोदरच अस्तित्वात होत्या.अनेकदा देवासूर संग्रामात देवांना सहकार्य करून असुरांना नामोहरम करणारे अयोध्याधीश दशरथ महाराज हे चक्रवर्ती सम्राट त्यावेळी होतेमहातपस्वी जन्मानें क्षत्रिय आणि कर्मानें ब्राम्हण असणारे विश्वामित्र मुनी शास्त्रविद्येबरोबर शस्त्रविद्येत अतुलनीय होतेमहर्षीं वसिष्ठमुनींचं तपोबल संकल्प शक्तीनें रावणाला संपवू शकत होतं.वालीसारख्या पराक्रमी वानरानें रावणाला आपल्या बगलेत दाबून मरणासन्न अवस्थेत सोडलंयाच वालीनें आपल्या लहान बालकालाअंगदला खेळणं म्हणून रावणाला उलटं लटकवलं होतंहा वाली रावणाला कधीही संपवू शकत होताआपल्या परशुच्या जोरावर सहस्त्रार्जुनच्या सर्व भूजा कापून मस्तक धडावेगळं करणारं आणि पृथ्वीला २१वेळा निःक्षत्रिय करणारं भगवद्तत्व परशुराम पृथ्वीवर होतं.

तेंव्हारावणाला संपवण्याची क्षमता असलेले दशरथ महाराजविश्वामित्रवसिष्ठमुनीपरशुरामवाली असें दिग्गज असतांना देखील भगवंतानें अवतार का घेतलायाचं महत्वाचं कारण म्हणजे वरील दिग्गज मंडळी पृथ्वीवर होतीपरंतु ती एकसंध नव्हतीविश्वामित्र-वसिष्ठ बेबनावपरशुराम एकीकडेदशरथ महाराज दुसरीकडेजनक महाराज वेगळ्या दिशेलाया सर्वांना एकत्र बांधण्याचं दिव्य कार्य करणारी शक्ती म्हणजे श्रीरामतेंव्हारामाचं चरित्र म्हणजे सेतूचं चरित्र!
संपूर्ण अवतार कार्यात रामानें जोडण्याचंच काम केलं आहेवसिष्ठमुनी-विश्वामित्र यांना रामानें जोडलंजनक-दशरथ यांना रामानें जोडलंएवढंच नाही तर नर-वानर यांना जोडणारा देखील हाच पुरूषोत्तम आहेतेंव्हारामरायाच्या अवताराचा मुख्य हेतू म्हणजे विप्रधेनूसुरसंतहित लीन मनुज अवतार ।
वरील वचनाचा एक अर्थ असाही काढल्या जातो की साधूगोमातादेव आणि संताच्या हितासाठी भगवंतानें अवतार घेतलाम्हणजेच या सर्वांचं अहित करणाऱ्या रावणाचं अहित करण्यासाठी सुद्धां भगवंताचा अवतार होता. हे मत सर्वथा चुकीचं आहेरामानें रावणाच्या सुद्धां हीताचाच विचार केलाआणि हीच गोष्ट रामावताराला इतर अवतारांपेक्षा एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतें!
रामानें रावणाचं हीतच पाहीलंयाचं उदाहरण अंगद शिष्टाई!
जेंव्हाश्रीराम वानरसेनेसह लंकेजवळ आलेतेंव्हा अंगद दूत बनून रावणाकडे गेला होतात्यावेळी रावणाला काय बोलू असं अंगदनें रामाला विचारल्यावर रामरायानें सांगितलं'काज हमार तासूं हित होई'! ज्यानें साधूसंतांचा छळ करून अधर्म वाढवलादशाननी विचारधारेचा प्रभाव वाढवला आणि आपल्या पत्नीचं अपहरण करून रघुकुलाच्या किर्तीला कलंक लावला अशा रावणाचंही हित जपणारा अद्वितिय आदर्श पुरूषोत्तम म्हणजे श्रीराम!

अशा रामरायाचं संपूर्ण चरित्रप्रत्येक प्रसंगाकडेप्रत्येक जीवाकडे बघण्याचा दृष्टीकोन आणि 'दुःखेषु अनुद्विग्न मनःसुखेषु विगतस्पृहः ||' ही वृत्ती ज्याला समजली आणि ज्यानें त्याच आदर्शावर चालण्याचा प्रयत्न केलात्याच्या अंतःकरणरूपी अयोध्येत रामजन्म होऊन ती व्यक्ती समाजात खऱ्या अर्थानें रामराज्य प्रस्थापित करू शकेलही अवस्था येण्यासाठी आपण सर्वांनी सतत नामांत राहून कर्तव्य करावेंरामराया सर्वांचं कोटकल्याण करेल!


("नामप्रेम" पुस्तकातून साभार)

   !!! जानकी जीवन स्मरण जय जय राम !!! 🙏

शांती, साहस व असामान्य पातिव्रत्य: सीतामाई


 🌹🌷" नामप्रेमचिंतन " 🌹🌷

रामायण 

शांतीसाहस व असामान्य पातिव्रत्यसीतामाई

श्रीराम
जेंव्हा जेंव्हा जगत्कार्य करण्यासाठी भगवंतानें अवतार घेतलातेंव्हा तेंव्हा त्याच्यासोबत शक्ती कार्य करत होतीशिव-शक्ती एकत्र आल्याशिवाय साधुंचे परित्राण व दुर्जनांचा विनाश होत नाहीयाच न्यायानें भगवंतानें त्रेतायुगांत विप्र धेनु सुर संत हित लीन मनुज अवतार । आणि या कार्यात सीता ही शांती रूपानें अवतरीत झाली...
वैशाख शुद्ध नवमी यादिवशी यज्ञासाठी भूमी नांगरताना मिथिलानरेश जनकाला जमिनीतून एक मुलगी मिळालीनांगराच्या फाळाला सीत आणि सीतने जमिनीवर ओढलेल्या रेघेस सीता म्हणतातम्हणून जनकाने या मुलीचे नाव सीता’ ठेवले....

जे शिवधनुष्य रावणबाणासूर आदी वीर साधे हलवूही शकत नव्हतेते शिवधनुष्य सीतेनें लहानपणी खेळता खेळता उचलले होतेअशा या शक्ती रुपी जगज्जननी सीतेनें स्त्रीजन्मासाठी पुढे एक आदर्शवत् जीवन जगलेरामराया स्वयंवरासाठी मिथिलेत आले तो प्रसंग फार विलोभनीय आहे....
विश्वामित्र मुनींसोबतचे दोन महातेजस्वी तरूण पाहून विरागीविदेहीनिर्गुणोपासक जनक महाराज सुद्धां राजस सुकुमार मदनाचा पुतळा असलेल्या रामाच्या प्रेमात पडलेजनकानें विश्वामित्र मुनींना विचारलें, 'महाराजहे दोन तरूण नेमके कोण आहेतमुनीकुलतिलक की नृपकुलपालककी ज्याचं वर्णन करतांना वेदांनी नेति नेति म्हंटलं ते ब्रम्ह युगल अवतारांत आलं?'
विश्वामित्र मुनीं हसूनपण नम्रतेनं म्हंटलेंराजन् तुम्ही कधीही असत्य बोलू शकत नाहीहे दोन तरूण सर्व ऋषी मुनींचं रक्षण करण्यासाठी माझ्यासोबत आल्यानें ते मुनीकुलतिलक आहेतते दोघं अयोध्यासम्राट दशरथ महाराजांचे चिरंजीव असल्यानें ते नृपकुलपालक सुद्धां आहेत!
हे ऐकून जनक महाराजांना रामाच्या परब्रम्ह तत्वाची खात्री पटली!

आता हा विदेही जनक सगुण साकार परब्रम्हाच्या रुपाला भुलून विचार करू लागला की या रामाशी मला नातं जोडलं पाहिजेपण कोणतंजनक मनांत विचार करतो, 'मी याचा पिता बनू शकलो नाहीपरंतुमी ब्रम्हज्ञानी आहेमग मी याचा गुरू बनू शकतो कापणवसिष्ठविश्वामित्र मुनी याचें गुरू असल्यानें मी त्याचा गुरू बनलो तर त्यांचा अनादर होईलपिता बनू शकलो नाहीगुरू बनू शकत नाहीपरंतुआता जर विधात्यानें कृपा केली आणि याच्या हातानें शिवधनुष्य भंग झालं तर याला माझा जावई करून याचा सासरा तरी बनेलपण काही ना काही नातं मात्र नक्कीच जोडेलसंधी सोडणार नाही!
कल्पना करा काय मानसिक अवस्थेत जनक महाराज असतीलयांतून एक महत्वाचा बोध मिळतो कीब्रम्हज्ञान प्राप्त होऊनहीवैराग्यसंपन्न अधिकारी महात्मा बनुनही जोपर्यंत भगवंताचं सगुण प्रेम मिळत नाहीतोपर्यंत जीवन कृतार्थ झाल्यासारखं वाटत नाहीआणि हे रामप्रेम प्राप्त करून घेण्यासाठी रामाशी कोणतं तरी एक नातं जोडलं पाहिजेमाझा राम सखामी रामाचा दासनित्य बोलावें। हाचिं सुबोध गुरूंचारामापाशी अनन्य वागावें ।।

या इच्छापुर्तीसाठी जनकानें मग विश्वामित्र मुनींना महालात निवासाचा आग्रह केलाआणि रामरायाच्या निवासासाठी सर्वांत सुंदर सदन जे सीतेचं होतं ते रिकामं केलं.सीतेच्या सदनाचं नावच 'सुंदरसदनहोतंआणि बरोबरच आहेभगवंत जे शांतीरूप सुंदर सदन आहे तिथेंच निवास करतोआपण आपलं अंतःकरण नामप्रेमानें सुंदर बनवलं की रामराया तिथेंच वास्तव्य करेल!
याठिकाणी पुढील विलोभनीय प्रसंग अनेक आहेतपण आता मोह आवरतो आणि पुढे जातो....
संपूर्ण रामायण हे त्यागाच्या अधिष्ठानावर आहेयाची प्रचिती येते ती वनवास वचनाच्या प्रसंगापासून...

रामचंद्र वनवासांत जाण्यासाठी आनंदानें सज्ज झाले असतांना सीतेनें देखील कैकयी मातेविरुद्ध कोणताही आकांडतांडव न करता स्वतःदेखील वनवास भोगण्यासाठी सज्ज झाली....
रामानें विरोध केल्यावर ही शांतीमाता म्हंटलीतुम्ही माझे पती आहात आणि मी तुमची पत्नी आहे म्हणून मी तुमच्या सोबत येण्याचा हट्ट धरला आहे असं नाहीतर तुम्ही रामचंद्र आहात आणि मी चंद्रिकाचांदणी चंद्रासोबतच राहणारहा विधीनियम आहेतो तुम्ही नाकारू शकत नाहीतेंव्हा मला तुमच्यासोबत येऊ द्या!
शंभू तेथें अंबिकाचंद्र तेथें चंद्रिका। संत तिथें विवेकाअसणे चि की।।
वनगमनाच्या वेळी कैकयीनें सीतेला वल्कले नेसायला दिल्यावर वसिष्ठांसारख्या तपोनिष्ठ महर्षींनी सुद्धां प्रक्षुब्ध मनानें कैकयीची निर्भत्सना केलीपण सीतेच्या मनांत आपल्या सासूबद्दल कोणताही विकार किंवा क्रोध आला नाहीं.
श्रीरामाच्या तोंडून वनवासातील अनेक प्रकारच्या क्लेशांना ऐकूनही सीता आपल्या निश्चयापासून यत्किंचीतही ढळली नाहीत्यामुळेंपतीसेवेपुढे जगातील सर्व सुख आणि वैभव तुच्छ मानणाऱ्या सीतेला रामाला सोबत घ्यावें लागले.

सीताराम मला प्राप्त व्हावें ही जशी आपली इच्छा आहे तशीच इच्छा रावण व शुर्पणखा यांची सुद्धां होतीरावणाला सीता हवी होती तर त्याच्या बहिणीला राम हवा होतापरंतुया बहीण-भावांचा हेतू आणि मार्ग शुद्ध नव्हता!
श्रीराम हा भगवंत आणि सीता ही शांतीशांती सीता समाहिता आत्मारामो विराजते। असं आद्य शंकराचार्यांनी वर्णन केलं आहेशुर्पणखानें शांतीला दूर करून भगवंत आणि रावणानें भगवंताला दूर करून शांती प्राप्त करण्याचा प्रयत्न केलाआणि जो कपटाचरणानें हरण करून शांती प्राप्त करण्याचा प्रयत्न करतोत्या रावणाचा शेवट कसा झालाहे आपल्याला माहीत आहे!

अशोकवनांत रावणानें आपले वैभव आणि प्रलोभने दाखवून सीतेचें मन विचलीत करण्याचे काही कमी प्रयत्न केले नव्हतेंपरंतुआपल्या पतिव्रता धर्म आणि श्रीराम निष्ठेपासून सीतामाई स्वप्नांतसुद्धां ढळली नाहींतिन्ही अवस्थेत आणि कुठल्याही परिस्थितीत मनबुद्धीचित्तामध्यें केवळ पतीपरमेश्वराचेंच ध्यान हे या मातेचें चरित्र आहे.
पुढे रावणवधानंतर अग्नीदेवतेनें जिच्या पावित्र्याला सिद्ध केलें अशा सतीसाध्वी सीतेला लोकापवादासाठी गर्भिणी अवस्थेत पुन्हा वनवास भोगून शेवटी पाताळप्रवेश करावा लागला.
प्रेमममता आदी भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असलेल्या रामचंद्राच्या बरोबरीचें किंबहुना काकणभर वरचढ ठरलेल्या सीतामाईचें साहसधर्मपरायणताक्षमा आणि सेवाभाव पूजनीय आणि अनुकरणीय आहे!


("नामप्रेम" पुस्तकातून साभार)

   !!! जानकी जीवन स्मरण जय जय राम !!! 🙏

Saturday, March 24, 2018

अतुल्य त्याग, सेवा व पराक्रमाचा संगम: लक्ष्मण


 🌹🌷" नामप्रेमचिंतन " 🌹🌷

रामायण ! 

अतुल्य त्यागसेवा व पराक्रमाचा संगमलक्ष्मण

श्रीरामशेष हा भगवान नारायणाच्या सोबतच राहणारया न्यायानें रामावतारांत शेषाने लक्ष्मण रुपानें रामचंद्राची सेवा हाच मुख्य धर्म आणि हेंच परमध्येय मानलें.
अत्यंत निष्कपटतेजस्वीत्यागी आणि पराक्रमी लक्ष्मण विश्वामित्रांकडे यज्ञरक्षणासाठी आणि वनवासांत रामसीता सेवेसाठीं सदैव छायेप्रमाणें भगवंताबरोबर राहिला.वास्तविक पितृवचनाची पुर्ती रामालाच बंधनकारक असुनही लक्ष्मणानें सुद्धां १४ वर्षे ब्रम्हचर्यव्रतानें केवळ रामसीता सेवेंसाठी वनवास भोगला.

वनवासाला निघण्यापुर्वी माता सुमित्रा लक्ष्मणाला म्हंटली, "रामालाच साक्षात पिता दशरथसीतेला माझ्याठिकाणी आणि वनाला अयोध्या समजत्यांच्या सेवेंत चुकूं नकोसआपला ज्येष्ठ बंधूश्रीराम हीच तुझी परमगती आहे."
आणि एक महत्वाची सूचना याठिकाणी सुमित्रा मातेनें लक्ष्मणाला केली, 'हे बघतू क्रोधावतार आहेसपण या वनवास काळांत तुझ्या मनांत जागेपणी तर सोड स्वप्नांतसुद्धा मोहमदअहंकार इविकार येऊ देऊ नकोस!'
यांवर लक्ष्मणानें उत्तर दिलं ते फार बोधप्रद आहेच पण आचरायला कठीण आहेतो म्हंटला, 'मातेमी जागेपणी तर मी पूर्ण काळजी घेईलपण झोपल्यावर चुकून स्वप्नात मनामध्यें विकार आले तर तुझा अनादर होईलपरंतुमी झोपलो तर स्वप्न पडेल ना!'
असं म्हणून या सेवाधर्मी लक्ष्मणानें १४ वर्ष जागरणाचा संकल्प केला आणि तो तडीस नेला....
हे केवळ लक्ष्मण आणि लक्ष्मणच करू शकतोमन हा इंद्रियांचा राजा आहेत्या मनांत कोणताही विकार येऊ नयें म्हणून ज्याचं लक्ष मनांवर आहेतो लक्ष्मण!

लक्ष्मणाचे स्वभाववैशिष्ट्य म्हणजे त्याच्या मनाला जी गोष्ट खटकत असेती तो प्रखर शब्दांत श्रीरामासमोर मांडत असेंअर्थात वीररसाच्या आवेशात आणि रामाच्या प्रेमानें विवश होऊन तो असें वागायचा पण श्रीराम त्याला लगेच शांत करीत.
एकूण अवतारकार्यात लक्ष्मणानें फक्त एकदांच रामाच्या आज्ञेचें उल्लंघन केले ते म्हणजे सुवर्णमृग प्रसंगी वनदेवतांवर सीतेची जबाबदारी टाकून तो सीतेच्या कठोर आज्ञेपोटी रामाकडे गेलात्याचा परिणाम काय झाला हे आपल्याला ठाऊकच आहेम्हणूनच अवज्ञा कदा हो यदर्थी न किजे । मना सज्जनां राघवी वस्ती किजे ।।
सीताहरणानंतर सुग्रिवानें जेंव्हा जंगलात सापडलेली आभुषणें दाखवलीतेंव्हा लक्ष्मण म्हणाला, "हे बाजुबंद आणि कुंडले माहीत नाहीतपण ही पैंजणे मात्र नक्कीच सीतामातेची आहेतकारणनमस्कार करतांना ती नजरेंस पडत होती!" असें ब्रम्हचर्य व्रतपुज्यभाव आणि मर्यादा आजपर्यंतच्या मानव इतिहासात इतर कुठे बघायला मिळेल?

लंकाविजय करून रामराया अयोध्येत परत आल्यावर एकदां अगस्ती ऋषी रामदरबारात आले होते. अगस्ती ऋषी म्हंटलेंलक्ष्मणासारखा वीरपुरूष त्रिभुवनांत नाही,रामसुद्धा नाहीं. रामानें कुंभकर्णरावणासारख्या महापराक्रमी राक्षसांना मारलं यांत मोठी विरता आहेपरंतुइंद्रजीतला मारणं सर्वांत दुष्कर कार्य होतंकारण,इंद्रजीतला वरदान होतं कीज्यानें १४ वर्षांत निद्रा भोगली नाहीस्त्रीचं मुख पाहिलं नाही आणि भोजनही केलं नाहीअसाच वीर त्याला मारू शकत होताअसा वीर लक्ष्मणाशिवाय दुसरा कुणी नव्हता....
१४ वर्ष निद्रा नाहीस्त्रीचा चेहरा बघितला नाही हे वैराग्य माहीत आहेपरंतु भोजनाचं काय?
तरवनवासांत लक्ष्मण दररोज जी फळे तोडून आणत होतात्याचे तीन भाग करून रामराया व सीतामाईला दिल्यावर तिसरा भाग तसाच ठेवून देत असे. (शबरीची बोरं न खाण्याचं कारण इंद्रजीतला संपवणें हे होतं)
चौदा वर्षे लक्ष्मणानें स्वतःच्या वाट्याची फळे तशीच ठेवून दिलीती मागवण्यात आली तर त्यातील फळांत ७ दिवसांची फळे कमी आढळलीत्या सात दिवसांचा हिशोब लक्ष्मणानें दिला....वनवासांत दशरथ महाराजांच्या स्वर्गवासाची बातमी समजल्यावर निराहाराचे दिवसांत फळे आणलीच नाहीइंद्रजीतनें नागपाशात बांधले त्या दिवशी,रावणानें शक्ती मारली त्या दिवशी आणि रावणवधाच्या आनंदानें आणखी एक दिवस अशाप्रकारे सात दिवस फळे न आणल्यानें त्या सात दिवसांची फळे कमी भरली!

अतुल्य पराक्रमानें इंद्रजिताचा वधश्रीराम राज्याभिषेकानंतर सीतामातेला वनवासात नेऊन सोडण्याच्या ह्रदयविदारक आज्ञेचे पालन आणि शेवटी प्रत्यक्ष रामरायानें आपलासुध्दां त्याग केल्यावर शरयूत देहत्याग करून अवतारसमाप्तीभगवंतानें स्वमुखानें भक्ताला भक्तीचं तत्वज्ञान सांगावं हे क्वचितच घडतंआपण मागे एकदां रामरायानें शबरीला नवविधा भक्तीचं स्तवन केलेलं बघितलंशबरी व्यतिरिक्त आणखी एका भक्ताला भगवंताच्या मुखांतून नवविधा भक्तीचं चिंतन श्रवण करण्याचं भाग्य लाभलंतो भक्त म्हणजे "लक्ष्मण"!

लक्ष्मणाच्या एकूण चरित्रातला प्रत्येक गुण आजच्या माणसाला आदर्श तर आहेच पण तो आचरणांत आणून जीवन राममय करण्यासाठी बोधप्रद आहेया अनुपम चरित्राइतकं नाही तरी किमान परस्त्री मातेसमान मानून अतिआहारअतिनिद्राअतीबोलणं टाळलं आणि मनाचं लक्ष नामाकडें ठेवून कर्तव्य केलं तर आपलं जीवन कृतार्थ होईलयात संशय नाही!

("नामप्रेम" पुस्तकातून साभार)

   !!! जानकी जीवन स्मरण जय जय राम !!! 🙏