🌹🌷🌹 *" नामप्रेमचिंतन "* 🌹🌷🌹
*शंका*- एका अधिकारी सत्शिष्यानें विचारलं की, भगवंताच्या प्रति असलेलं प्रेम वेडं खरं की डोळस खरं? आणि यातलं उच्चकोटीचं कोणतं?
➡
*श्रीराम!* मुळात प्रेमाचं खरं स्वरूप म्हणजे प्रेम हे खरं असतं, डोळस असतं आणि वेडंही असतं!
विषयावरचं प्रेम हे प्रेम नसतं. याची तीन मुख्य कारणं आहेत. पहिलं कारण स्थल, काल, निमित्तानुसार विषयात प्रेमाचं केंद्र बदलत असतं. दुसरं म्हणजे ते अज्ञानावर आधारित असतं आणि तिसरं कारण म्हणजे त्यात स्वार्थ, अपेक्षांचं गालबोट लागलेलं असतं! विषयावरची आसक्ती जाऊन जेंव्हा मन, बुद्धी, चित्त, अहंकार भगवंताला समर्पित होतं, तेंव्हा विषयाची आस जाऊन भगवंताचा ध्यास लागतो. यालाच "प्रेम" म्हणतात.
हे 'प्रेम' भगवंतावर असते आणि भगवंत हा शाश्वत असल्याने, खरा असल्याने हे 'प्रेम' देखील खरे असते. या खरेपणाला, शाश्वतपणाला अध्यात्मशास्त्रात 'सत्' म्हणतात! विषय अनित्य, असत्य आहे याची जाणीव झाली की मनुष्याला अखंड समाधान देणाऱ्या भगवंताची ओढ लागते. याचा अर्थ, भगवंताच्या प्रेमात पडणें हे विषयासक्ती जाण्याचं लक्षण आहे. म्हणजेच भगवंतावर प्रेम जडणें हे ज्ञानाचं लक्षण आहे.
ज्ञानाचा प्रकाश चित्तात प्रगट होतो. प्रेमाच्या चित्तातील प्रगटीकरणाला अध्यात्मशास्त्रात 'चिद्' म्हणतात!
विषयासक्ती असत्य आणि भगवंताचें प्रेम खरं असल्याचं ज्ञान झाल्यावर त्या प्रेमाचा निजध्यास लागतो. हा निजध्यास जेंव्हा आपली परिसिमा गाठतो, तेंव्हा त्या भक्ताला लौकिकाची चाड, धनमानाची कामना रहात नाही. याला भगवंताचें वेड लागणें म्हणतात. याच वेडेपणाला अध्यात्मशास्त्रात 'आनंद' म्हणतात!
अशाप्रकारे, भगवंताचें 'प्रेम' हे खरे म्हणजे सत्; डोळस म्हणजे चिद्; आणि वेड म्हणजे आनंद स्वरूप अर्थात सच्चिदानंद स्वरूप आहे!
("नामप्रेम" पुस्तकातून साभार)
🙏 !!! जानकी जीवन स्मरण जय जय राम !!! 🙏
*शंका*- एका अधिकारी सत्शिष्यानें विचारलं की, भगवंताच्या प्रति असलेलं प्रेम वेडं खरं की डोळस खरं? आणि यातलं उच्चकोटीचं कोणतं?
➡
*श्रीराम!* मुळात प्रेमाचं खरं स्वरूप म्हणजे प्रेम हे खरं असतं, डोळस असतं आणि वेडंही असतं!
विषयावरचं प्रेम हे प्रेम नसतं. याची तीन मुख्य कारणं आहेत. पहिलं कारण स्थल, काल, निमित्तानुसार विषयात प्रेमाचं केंद्र बदलत असतं. दुसरं म्हणजे ते अज्ञानावर आधारित असतं आणि तिसरं कारण म्हणजे त्यात स्वार्थ, अपेक्षांचं गालबोट लागलेलं असतं! विषयावरची आसक्ती जाऊन जेंव्हा मन, बुद्धी, चित्त, अहंकार भगवंताला समर्पित होतं, तेंव्हा विषयाची आस जाऊन भगवंताचा ध्यास लागतो. यालाच "प्रेम" म्हणतात.
हे 'प्रेम' भगवंतावर असते आणि भगवंत हा शाश्वत असल्याने, खरा असल्याने हे 'प्रेम' देखील खरे असते. या खरेपणाला, शाश्वतपणाला अध्यात्मशास्त्रात 'सत्' म्हणतात! विषय अनित्य, असत्य आहे याची जाणीव झाली की मनुष्याला अखंड समाधान देणाऱ्या भगवंताची ओढ लागते. याचा अर्थ, भगवंताच्या प्रेमात पडणें हे विषयासक्ती जाण्याचं लक्षण आहे. म्हणजेच भगवंतावर प्रेम जडणें हे ज्ञानाचं लक्षण आहे.
ज्ञानाचा प्रकाश चित्तात प्रगट होतो. प्रेमाच्या चित्तातील प्रगटीकरणाला अध्यात्मशास्त्रात 'चिद्' म्हणतात!
विषयासक्ती असत्य आणि भगवंताचें प्रेम खरं असल्याचं ज्ञान झाल्यावर त्या प्रेमाचा निजध्यास लागतो. हा निजध्यास जेंव्हा आपली परिसिमा गाठतो, तेंव्हा त्या भक्ताला लौकिकाची चाड, धनमानाची कामना रहात नाही. याला भगवंताचें वेड लागणें म्हणतात. याच वेडेपणाला अध्यात्मशास्त्रात 'आनंद' म्हणतात!
अशाप्रकारे, भगवंताचें 'प्रेम' हे खरे म्हणजे सत्; डोळस म्हणजे चिद्; आणि वेड म्हणजे आनंद स्वरूप अर्थात सच्चिदानंद स्वरूप आहे!
("नामप्रेम" पुस्तकातून साभार)
🙏 !!! जानकी जीवन स्मरण जय जय राम !!! 🙏
Shri Ram
ReplyDelete