🌹🌷🌹 *" नामप्रेमचिंतन "* 🌹🌷🌹
*शंका*- रघुवीरजी कृपया ज्ञान आणि भक्तीचा भावार्थ उलगडून सांगावा.
➡
*श्रीराम!* एखाद्या अभंगाच्या प्रति असलेला भाव म्हणजे भक्ती! आणि त्या भक्तीपोटी एखाद्याने मांडलेलं भावपूर्ण चिंतन म्हणजे ज्ञान!
*भाव = भक्ती; अर्थ = ज्ञान*
*भावार्थ = भक्ती + ज्ञान*
भक्ती आणि ज्ञान यांचा अन्योन्य संबंध आहे, असं एका रामायणकारानें म्हंटलं आहे. श्रीरामचंद्राचं चरित्र सर्वप्रथम महादेवानें गायलं. त्यावेळी श्रोता होती पार्वती माता! नंतर हे रामायण काकभुषुंडींने गरुडाला ऐकवलं. नंतर तीच कथा भारद्वाज मुनींनी याज्ञवल्क्य या अधिकारी श्रोत्यासमोर गायली. पुढे तुलसीदासानें तेच रामचरित स्वान्तःसुखाय गायलं! यापैकी काकभुषुंडींने गरूडासमोर रामकथा गातांना भक्ती-ज्ञानाचा समन्वय सांगितला की,
*ज्ञानहिं भगतिहि नहिं कछु भेदा ।*
*उभय हरहि भव संभव खेदा ।।*
काकभुषुंडी म्हंटले, ज्ञान आणि भक्ती यांच्यात काहीही भेद नाहीये; दोन्हीचं कार्य एकच आहे, ते म्हणजे भवभ्रम आणि भवदुःख हरण करणें! काय गंमत आहे बघा, ज्ञानी मनुष्याला जगत मिथ्या आहे, हे ज्ञान झालेलं असतं. आणि जगतच मिथ्या तर त्या जगातील दुःखसुद्धां ज्ञानी माणसाला मिथ्याच अाहे. त्यामुळे, त्याला भवभ्रम होत नाही आणि भवदुःखही रहात नाही. तो मनुष्य कर्म करुनही ज्ञानयोगी जीवन जगत असतो!
भक्तीमार्गामध्ये सुद्धां भवभ्रम आणि भवदुःख उरत नाही. कसं? तर भक्त भगवंताला समर्पित झालेला असल्याने त्याला जगताचं भानच उरत नाही. म्हणजे जग सत्य आहे की मिथ्या या भानगडीत तो पडत नाही. आणि जो जगाला विसरला त्याला जगातील दुःखाचं भय कसं उरेल? तो तर नित्य आनंदाचे डोही आनंद तरंग अनुभवत असतो! तेंव्हा, भगवद्भजनी रंगलेल्या भक्ताला भवभ्रम होत नाही आणि भवदुःखही रहात नाही! अशाप्रकारे, ज्ञान आणि भक्ती यांच्यात काहीही भेद नाहीये!
तुलसीदासानें भक्ती-ज्ञानाचा समन्वय सांगितला असला तरी त्यात एक निराळी तार आहे असं मला वाटतं! ज्ञान प्राप्त झाल्यानंतर समाधीसुख मिळेल, पण ते थोडं कोरडं असेल. क्षमा मागतो, पण एक जेवणाचं उदाहरण बघुया. एखाद्याला बटाटा आवडतो. पण पोळीसोबत बटाट्याची कोरडी भाजी खातांना जेवण थोडं कोरडं वाटेल, एखाद्याच्या छातीत बसेल. मग तो म्हणेल या भाजीला रस्सा केला तर आणखी मजा येईल, जेवणाचा आस्वाद घेता येईल! तसंच जीवन सर्वांना आवडतं. पण, भगवंतासोबत ज्ञान जोडलं तर ते कोरडं वाटेल, एखाद्याच्या छातीत नाही पण अहंकाररुपानें मस्तकात बसेल. मग तो म्हणेल या कोरड्या ज्ञानाला भक्तीप्रेमाचा रस्सा मिळाला तर मजा येईल, जीवनाचा आस्वाद घेता येईल!
उद्धवाकडे ज्ञान होतं, परंतु ते कोरडं होतं, कच्चं होतं. तांदुळ कच्चा राहिला तर त्याला पुन्हा अग्नीवर शिजवतात. या सिद्धांताप्रमाणें उद्धवाचे ज्ञान पक्व करण्यासाठी भगवंतानें त्याला आपल्या सर्वोत्तम भक्तांकडे म्हणजे गोपींकडे आपला संदेश देऊन पाठवलं. तिथें त्याचं ज्ञान कोणत्या अग्नीवर पक्व करायचं होतं? तर सर्व गोपिका कान्हाच्या विरहाच्या ज्या अग्नीवर जळत होत्या त्या अग्नीवर!
गोपिकांना भेटल्यावर उद्धव त्यांना म्हंटला, मी तुमच्यासाठी कन्हैयाचा संदेश घेऊन आलो आहे. यांवर गोपिका हसून म्हंटल्या, "संदेश कुणाचा येतो? जो दूर आहे त्याचा. जो सतत आपल्या जवळच असतो त्याचा संदेश वगैरे काही येत नसतो, वेड्या!" गोपिकांच्या प्रेमाग्नीने उद्धवाचं ज्ञान परिपक्व झालं. गोपिकांनी भक्तीरसानें त्याला इतका भिजवला की तो त्या मातीत कृष्णप्रेमानें लोळू लागला!
तत्वज्ञानी उद्धव आला। प्रबोधन्या त्या गोपीबाला।
पाहुनी त्यांच्या दृढ भक्तीला । हरले त्याचे समूळही ज्ञान ।
तेंव्हा, भक्ती म्हणजे ज्ञानाची परिपक्व अवस्था! आणि ज्ञान म्हणजे भक्तीची पराकाष्ठा! गोपिकांनी वेद, उपनिषदे इ. ग्रंथांचे अध्ययन न करता जे अंतिम ज्ञान उद्धवाला मिळालं नाही ते त्यांनी कमावलं! हे कसं शक्य झालं? तर, त्यांच्या भक्तीनें परिसिमा गाठली होती. आणि भक्त जेंव्हा आपल्या भगवद्प्रेमाची परिसिमा गाठतो, तेंव्हा तो आपोआप, अनायासे ब्रम्हज्ञानी बनतो!
भक्तीचे तीन प्रकार आहेत: प्रवेशात्मक भक्ती, क्रियात्मक भक्ती आणि संबंधात्मक भक्ती! प्रवेशात्मक भक्तीमध्यें तीन मार्ग आहेत. त्यांना श्रवण, कीर्तन आणि नामस्मरण असं म्हणतात; क्रियात्मक भक्तीमध्यें तीन मार्ग आहेत. त्यांना पादसेवन, अर्चन आणि वंदन म्हणतात; तर संबंधात्मक भक्तीमध्यें देखील तीन मार्ग आहेत. त्यांना दास्यत्व, सख्य आणि आत्मनिवेदन असं म्हणतात!
जेंव्हा एखादा भक्त या तीन प्रकारातील नऊ भक्तीमार्ग अनुभवतो, तेंव्हा त्याला नवविधा भक्तीमुळे जे समाधीसुख प्राप्त होतं, त्याचं वर्णन वेदांतच काय प्रत्यक्ष परब्रम्ह परमात्मा सुद्धां करू शकत नाही! आपण या समाधीसुखाच्या दिशेने चालायला निष्ठेनं, चिकाटीनं आणि प्रेमानं सुरूवात करूया, आज ना उद्या मुक्कामाला पोहचूच!
*("नामप्रेम" पुस्तकातून साभार)*
🙏 !!! जानकी जीवन स्मरण जय जय राम !!! 🙏
*शंका*- रघुवीरजी कृपया ज्ञान आणि भक्तीचा भावार्थ उलगडून सांगावा.
➡
*श्रीराम!* एखाद्या अभंगाच्या प्रति असलेला भाव म्हणजे भक्ती! आणि त्या भक्तीपोटी एखाद्याने मांडलेलं भावपूर्ण चिंतन म्हणजे ज्ञान!
*भाव = भक्ती; अर्थ = ज्ञान*
*भावार्थ = भक्ती + ज्ञान*
भक्ती आणि ज्ञान यांचा अन्योन्य संबंध आहे, असं एका रामायणकारानें म्हंटलं आहे. श्रीरामचंद्राचं चरित्र सर्वप्रथम महादेवानें गायलं. त्यावेळी श्रोता होती पार्वती माता! नंतर हे रामायण काकभुषुंडींने गरुडाला ऐकवलं. नंतर तीच कथा भारद्वाज मुनींनी याज्ञवल्क्य या अधिकारी श्रोत्यासमोर गायली. पुढे तुलसीदासानें तेच रामचरित स्वान्तःसुखाय गायलं! यापैकी काकभुषुंडींने गरूडासमोर रामकथा गातांना भक्ती-ज्ञानाचा समन्वय सांगितला की,
*ज्ञानहिं भगतिहि नहिं कछु भेदा ।*
*उभय हरहि भव संभव खेदा ।।*
काकभुषुंडी म्हंटले, ज्ञान आणि भक्ती यांच्यात काहीही भेद नाहीये; दोन्हीचं कार्य एकच आहे, ते म्हणजे भवभ्रम आणि भवदुःख हरण करणें! काय गंमत आहे बघा, ज्ञानी मनुष्याला जगत मिथ्या आहे, हे ज्ञान झालेलं असतं. आणि जगतच मिथ्या तर त्या जगातील दुःखसुद्धां ज्ञानी माणसाला मिथ्याच अाहे. त्यामुळे, त्याला भवभ्रम होत नाही आणि भवदुःखही रहात नाही. तो मनुष्य कर्म करुनही ज्ञानयोगी जीवन जगत असतो!
भक्तीमार्गामध्ये सुद्धां भवभ्रम आणि भवदुःख उरत नाही. कसं? तर भक्त भगवंताला समर्पित झालेला असल्याने त्याला जगताचं भानच उरत नाही. म्हणजे जग सत्य आहे की मिथ्या या भानगडीत तो पडत नाही. आणि जो जगाला विसरला त्याला जगातील दुःखाचं भय कसं उरेल? तो तर नित्य आनंदाचे डोही आनंद तरंग अनुभवत असतो! तेंव्हा, भगवद्भजनी रंगलेल्या भक्ताला भवभ्रम होत नाही आणि भवदुःखही रहात नाही! अशाप्रकारे, ज्ञान आणि भक्ती यांच्यात काहीही भेद नाहीये!
तुलसीदासानें भक्ती-ज्ञानाचा समन्वय सांगितला असला तरी त्यात एक निराळी तार आहे असं मला वाटतं! ज्ञान प्राप्त झाल्यानंतर समाधीसुख मिळेल, पण ते थोडं कोरडं असेल. क्षमा मागतो, पण एक जेवणाचं उदाहरण बघुया. एखाद्याला बटाटा आवडतो. पण पोळीसोबत बटाट्याची कोरडी भाजी खातांना जेवण थोडं कोरडं वाटेल, एखाद्याच्या छातीत बसेल. मग तो म्हणेल या भाजीला रस्सा केला तर आणखी मजा येईल, जेवणाचा आस्वाद घेता येईल! तसंच जीवन सर्वांना आवडतं. पण, भगवंतासोबत ज्ञान जोडलं तर ते कोरडं वाटेल, एखाद्याच्या छातीत नाही पण अहंकाररुपानें मस्तकात बसेल. मग तो म्हणेल या कोरड्या ज्ञानाला भक्तीप्रेमाचा रस्सा मिळाला तर मजा येईल, जीवनाचा आस्वाद घेता येईल!
उद्धवाकडे ज्ञान होतं, परंतु ते कोरडं होतं, कच्चं होतं. तांदुळ कच्चा राहिला तर त्याला पुन्हा अग्नीवर शिजवतात. या सिद्धांताप्रमाणें उद्धवाचे ज्ञान पक्व करण्यासाठी भगवंतानें त्याला आपल्या सर्वोत्तम भक्तांकडे म्हणजे गोपींकडे आपला संदेश देऊन पाठवलं. तिथें त्याचं ज्ञान कोणत्या अग्नीवर पक्व करायचं होतं? तर सर्व गोपिका कान्हाच्या विरहाच्या ज्या अग्नीवर जळत होत्या त्या अग्नीवर!
गोपिकांना भेटल्यावर उद्धव त्यांना म्हंटला, मी तुमच्यासाठी कन्हैयाचा संदेश घेऊन आलो आहे. यांवर गोपिका हसून म्हंटल्या, "संदेश कुणाचा येतो? जो दूर आहे त्याचा. जो सतत आपल्या जवळच असतो त्याचा संदेश वगैरे काही येत नसतो, वेड्या!" गोपिकांच्या प्रेमाग्नीने उद्धवाचं ज्ञान परिपक्व झालं. गोपिकांनी भक्तीरसानें त्याला इतका भिजवला की तो त्या मातीत कृष्णप्रेमानें लोळू लागला!
तत्वज्ञानी उद्धव आला। प्रबोधन्या त्या गोपीबाला।
पाहुनी त्यांच्या दृढ भक्तीला । हरले त्याचे समूळही ज्ञान ।
तेंव्हा, भक्ती म्हणजे ज्ञानाची परिपक्व अवस्था! आणि ज्ञान म्हणजे भक्तीची पराकाष्ठा! गोपिकांनी वेद, उपनिषदे इ. ग्रंथांचे अध्ययन न करता जे अंतिम ज्ञान उद्धवाला मिळालं नाही ते त्यांनी कमावलं! हे कसं शक्य झालं? तर, त्यांच्या भक्तीनें परिसिमा गाठली होती. आणि भक्त जेंव्हा आपल्या भगवद्प्रेमाची परिसिमा गाठतो, तेंव्हा तो आपोआप, अनायासे ब्रम्हज्ञानी बनतो!
भक्तीचे तीन प्रकार आहेत: प्रवेशात्मक भक्ती, क्रियात्मक भक्ती आणि संबंधात्मक भक्ती! प्रवेशात्मक भक्तीमध्यें तीन मार्ग आहेत. त्यांना श्रवण, कीर्तन आणि नामस्मरण असं म्हणतात; क्रियात्मक भक्तीमध्यें तीन मार्ग आहेत. त्यांना पादसेवन, अर्चन आणि वंदन म्हणतात; तर संबंधात्मक भक्तीमध्यें देखील तीन मार्ग आहेत. त्यांना दास्यत्व, सख्य आणि आत्मनिवेदन असं म्हणतात!
जेंव्हा एखादा भक्त या तीन प्रकारातील नऊ भक्तीमार्ग अनुभवतो, तेंव्हा त्याला नवविधा भक्तीमुळे जे समाधीसुख प्राप्त होतं, त्याचं वर्णन वेदांतच काय प्रत्यक्ष परब्रम्ह परमात्मा सुद्धां करू शकत नाही! आपण या समाधीसुखाच्या दिशेने चालायला निष्ठेनं, चिकाटीनं आणि प्रेमानं सुरूवात करूया, आज ना उद्या मुक्कामाला पोहचूच!
*("नामप्रेम" पुस्तकातून साभार)*
🙏 !!! जानकी जीवन स्मरण जय जय राम !!! 🙏
No comments:
Post a Comment