🌹🌷🌹 *" नामप्रेमचिंतन "* 🌹🌷🌹
*शंका*- दादा, ग्रहणकाळाबद्दल थोडं सांगाल का?
➡
*श्रीराम!*
मनुष्य जन्माला येतो तो विषयवासनेच्या आहारी गेल्याने. याचा अर्थ विषय पूर्णपणे त्याज्य आहे असे नाही. विषय भगवंताने दिलेले असल्याने ते आपल्या कल्याणासाठीच असले पाहिजे. धर्माच्या मर्यादेत राहून देहाने अर्थ आणि काम सेवन केला व मनाने निर्विषय होऊन साधना केली तर मोक्षाचे दार उघडते, असे अध्यात्म सांगते. तेंव्हा, स्थल, काल, निमित्त सांभाळून भोगलेला विषय ग्राह्य आहे. परंतु, नको तिथे, नको तेंव्हा, अकारण भोगलेल्या विषयामुळे साधकाच्या साधनेला ग्रहण लागते.
मर्यादित आहार, मर्यादित विहार, मर्यादित व्यापार वगळता इतर अतिरेकी आहार, विहार, उच्चार हा आपल्या साधनेतील महत्वाचा वेळ खाऊन टाकतो. हा वाया गेलेला वेळ म्हणजे ग्रहणकाळ समजावा. जो मनुष्य या ग्रहणकाळात विषयसेवन करतो, त्याला ग्रहण विशेषत्वाने ग्रासू शकते. ज्याठिकाणी रजोगुणी, तमोगुणी विचार, उच्चार आणि आचार असतो, त्याठिकाणी सत्वगुणी माणसाने जाणे टाळावे. परंतु, प्रसंग आलाच तर अशावेळी आपला सत्वगुण जपण्याचा पूर्ण प्रयत्न करावा.
सूर्यग्रहण, चंद्रग्रहण हा अध्यात्मिक व वैज्ञानिक दोन्ही अंगांनी बघितले असता रजोगुणी व तमोगुणी वृत्तीचा काळ मानल्या जातो. याचे महत्वाचे कारण म्हणजे सूर्याचे जीवनदायी तेज व चंद्राची शीतलता दोन्ही पृथ्वीवर येण्यास बाधा निर्माण होते. अशावेळी जो सत्वगुण वाढवतो, तो इतरवेळी तर नक्कीच सदाचरण राखू शकतो. प्रतिकूल काळात ज्याला साधन टिकवता आले, त्याला अनुकूल काळात तर सहज साधना घडेल. म्हणून या ग्रहणकाळात साधकाने विषय सोडून विश्वात्मा धरावा. उपासना, नामस्मरण, सद्ग्रंथाचे वाचन, मनन केल्यास ते निष्ठेच्या दृष्टीने विशेष फलदायी ठरेल.
यांत श्रीमद्भागवतासारखा सद्ग्रंथ चिंतनाला घेतला तर विषयाचे पर्यवसान विश्वासात होईल. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे पाचही विषय परमात्ममय करण्याचा हा सुवर्णकाळ म्हणता येईल.
ग्रहणकाळात इतर शब्दरुपी विषय सोडून भागवत वाचल्यास शब्दब्रम्ह प्रगट होईल. *येथें व्यासांची वाणी | सार्थक हरिगुण गाउनी |*
या ग्रंथात एकाग्र चित्त झाल्यास स्पर्श नावाचा विषय रजोतमोगुण सोडून कृष्णस्पर्शाची सुखद अनुभूती देईल. *कृष्णपदी ठेवू माथा |*
व्यासांनी उभ्या केलेल्या या शब्दब्रम्हाला आपण मनाने स्पर्श केला तर रूप नावाचा विषय सौम्य होऊन परब्रम्हाचे रूप अंतःचक्षूसमोर येईल. *ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण | गीते वेधी मन पूर्ण |*
भागवत ग्रंथ हा भगवंताच्या लीलांचे भावपूर्ण वर्णन असल्याने लौकिक कामरस नावाचा विषय जाऊन कान्हरस चाखायला मिळेल. *भान हरपले रस पिता | आरती करू तुज भगवंता |*
आणि याची परिणती म्हणजे विषयाचा पाचवा घटक गंध जाऊन भगवद्प्रेमाचा गंध अंतःकरणात दरवळू लागेल. *निर्मळ भक्तीजले भारित | विहरे हरि हंसचि चित्त |*
अशाप्रकारे लौकिक पंचविषय जाऊन पाच अंगांनी भगवंतावरचे प्रेम दृढ होण्यासाठी ग्रहणकाळात *वेदतरूचे मधुर फळ | स्वादुरसे जे सोज्वळ |* अशा भागवत ग्रंथाचे किंवा आपल्या श्रद्धेनुसार आपल्या दैवताचे चिंतन वाचून मनन करूया; परमात्मप्रेमाचा निजध्यास नक्की अनुभवला येईल!
ग्रहणकाळात रजोगुणी व तमोगुणी वृत्ती खुप जास्त प्रमाणात वातावरण दूषित करतात. त्याचा आपल्या साधनेवर दुष्परिणाम होऊ नये यासाठी सद्गुरूंनी दिलेल्या नामात राहून आपली सत्वशुद्धी करून घ्यावी.
याकाळात जो मुखात गुरूमंत्र आणि मनात गुरूमुर्ती स्थीर करेल, त्याच्या साधनेला ग्रहण न लागता अंतःकरणातील विकार नाहिसे होण्यासाठी त्याला सात्विक गुरूबल मिळेल आणि त्यायोगे गुरूनिष्ठा व नामप्रेम वृद्धिंगत होईल!
("नामप्रेम" पुस्तकातून साभार)
🙏 *जानकी जीवन स्मरण जय जय राम* 🙏
*शंका*- दादा, ग्रहणकाळाबद्दल थोडं सांगाल का?
➡
*श्रीराम!*
मनुष्य जन्माला येतो तो विषयवासनेच्या आहारी गेल्याने. याचा अर्थ विषय पूर्णपणे त्याज्य आहे असे नाही. विषय भगवंताने दिलेले असल्याने ते आपल्या कल्याणासाठीच असले पाहिजे. धर्माच्या मर्यादेत राहून देहाने अर्थ आणि काम सेवन केला व मनाने निर्विषय होऊन साधना केली तर मोक्षाचे दार उघडते, असे अध्यात्म सांगते. तेंव्हा, स्थल, काल, निमित्त सांभाळून भोगलेला विषय ग्राह्य आहे. परंतु, नको तिथे, नको तेंव्हा, अकारण भोगलेल्या विषयामुळे साधकाच्या साधनेला ग्रहण लागते.
मर्यादित आहार, मर्यादित विहार, मर्यादित व्यापार वगळता इतर अतिरेकी आहार, विहार, उच्चार हा आपल्या साधनेतील महत्वाचा वेळ खाऊन टाकतो. हा वाया गेलेला वेळ म्हणजे ग्रहणकाळ समजावा. जो मनुष्य या ग्रहणकाळात विषयसेवन करतो, त्याला ग्रहण विशेषत्वाने ग्रासू शकते. ज्याठिकाणी रजोगुणी, तमोगुणी विचार, उच्चार आणि आचार असतो, त्याठिकाणी सत्वगुणी माणसाने जाणे टाळावे. परंतु, प्रसंग आलाच तर अशावेळी आपला सत्वगुण जपण्याचा पूर्ण प्रयत्न करावा.
सूर्यग्रहण, चंद्रग्रहण हा अध्यात्मिक व वैज्ञानिक दोन्ही अंगांनी बघितले असता रजोगुणी व तमोगुणी वृत्तीचा काळ मानल्या जातो. याचे महत्वाचे कारण म्हणजे सूर्याचे जीवनदायी तेज व चंद्राची शीतलता दोन्ही पृथ्वीवर येण्यास बाधा निर्माण होते. अशावेळी जो सत्वगुण वाढवतो, तो इतरवेळी तर नक्कीच सदाचरण राखू शकतो. प्रतिकूल काळात ज्याला साधन टिकवता आले, त्याला अनुकूल काळात तर सहज साधना घडेल. म्हणून या ग्रहणकाळात साधकाने विषय सोडून विश्वात्मा धरावा. उपासना, नामस्मरण, सद्ग्रंथाचे वाचन, मनन केल्यास ते निष्ठेच्या दृष्टीने विशेष फलदायी ठरेल.
यांत श्रीमद्भागवतासारखा सद्ग्रंथ चिंतनाला घेतला तर विषयाचे पर्यवसान विश्वासात होईल. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे पाचही विषय परमात्ममय करण्याचा हा सुवर्णकाळ म्हणता येईल.
ग्रहणकाळात इतर शब्दरुपी विषय सोडून भागवत वाचल्यास शब्दब्रम्ह प्रगट होईल. *येथें व्यासांची वाणी | सार्थक हरिगुण गाउनी |*
या ग्रंथात एकाग्र चित्त झाल्यास स्पर्श नावाचा विषय रजोतमोगुण सोडून कृष्णस्पर्शाची सुखद अनुभूती देईल. *कृष्णपदी ठेवू माथा |*
व्यासांनी उभ्या केलेल्या या शब्दब्रम्हाला आपण मनाने स्पर्श केला तर रूप नावाचा विषय सौम्य होऊन परब्रम्हाचे रूप अंतःचक्षूसमोर येईल. *ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण | गीते वेधी मन पूर्ण |*
भागवत ग्रंथ हा भगवंताच्या लीलांचे भावपूर्ण वर्णन असल्याने लौकिक कामरस नावाचा विषय जाऊन कान्हरस चाखायला मिळेल. *भान हरपले रस पिता | आरती करू तुज भगवंता |*
आणि याची परिणती म्हणजे विषयाचा पाचवा घटक गंध जाऊन भगवद्प्रेमाचा गंध अंतःकरणात दरवळू लागेल. *निर्मळ भक्तीजले भारित | विहरे हरि हंसचि चित्त |*
अशाप्रकारे लौकिक पंचविषय जाऊन पाच अंगांनी भगवंतावरचे प्रेम दृढ होण्यासाठी ग्रहणकाळात *वेदतरूचे मधुर फळ | स्वादुरसे जे सोज्वळ |* अशा भागवत ग्रंथाचे किंवा आपल्या श्रद्धेनुसार आपल्या दैवताचे चिंतन वाचून मनन करूया; परमात्मप्रेमाचा निजध्यास नक्की अनुभवला येईल!
ग्रहणकाळात रजोगुणी व तमोगुणी वृत्ती खुप जास्त प्रमाणात वातावरण दूषित करतात. त्याचा आपल्या साधनेवर दुष्परिणाम होऊ नये यासाठी सद्गुरूंनी दिलेल्या नामात राहून आपली सत्वशुद्धी करून घ्यावी.
याकाळात जो मुखात गुरूमंत्र आणि मनात गुरूमुर्ती स्थीर करेल, त्याच्या साधनेला ग्रहण न लागता अंतःकरणातील विकार नाहिसे होण्यासाठी त्याला सात्विक गुरूबल मिळेल आणि त्यायोगे गुरूनिष्ठा व नामप्रेम वृद्धिंगत होईल!
("नामप्रेम" पुस्तकातून साभार)
🙏 *जानकी जीवन स्मरण जय जय राम* 🙏