🌹🌷🌹" नामप्रेमचिंतन " 🌹🌷🌹
शंका- पू. कलावती आई मनशुद्धीसाठी शिवपूजन श्रेष्ठ मानतात. प्रापंचिकानें शिवरूप होण्यासाठी ही शिवोपासना कशी करावी? याबद्दल थोडं सांगावं.
➡
🌿🌿 ।। जय उमा महेश्वर ।। 🌿🌿
श्रीराम!
प्रपंच हा शारिरिक प्रधानतेने करावा; तर परमार्थ हा मानसिक प्रधानतेने करावा. मन हा इंद्रियाचा राजा । त्याची सर्वाआधी पुजा ।। या संतवचनाला प्रमाण मानून अगोदर मनाला शुद्ध सात्विक केलं तर परमार्थ उत्तम होईल आणि त्याच्या अधिष्ठानावर प्रपंच कल्याणकारी होईल.
प्रपंच आणि परमार्थ दोन्ही अंततोगत्वा समाधान देणारे होण्यासाठी मनशुद्धी नितांत आवश्यक आहे. जसे देहाचे अवयव हात, पाय, डोळे इ. आहेत; तसे मनाला शरीर मानले तर मनाचे सुद्धा अवयव आहेत. मनाचे अवयव म्हणजे विचार, कल्पना, भावना, स्मृती इ. या सर्व अवयवांना सात्विक बनवणं म्हणजे मनाची शुद्धी!
ही सर्वांगीण शुद्धी साधण्यासाठी अगोदर मनाची धारणा सुधारली पाहिजे. आज मनाची धारणा ही आहे की, 'मी जीव आहे'. ही धारणा 'मी शिव आहे' अशी वळवली की मन शुद्धीकरणाचा पाया आणि कळस दोन्ही साधेल!
मनशुद्धी संदर्भात पु. कलावती आईंच्या चिंतनाचा आपण संदर्भ दिला आहे. आईंचे आराध्य दैवत "शिव" आहे. आपण केवळ देहाने शिवपूजन करतो, परंतु मनाने शिवाला शिवले की जीव-शिव एकात्म्य साधले जाते, हे पु. आईंच्या चरित्राचं सार आहे, असं मला वाटतं. ते सार ध्यानात घेऊन आपण जर शिवरूप झालो तर सत्य आणि सुंदर काय आहे, याची अनुभूति येईल!
जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला त्याच्या उगमस्थानाचं म्हणजेच शिवाचं स्मरण करून देण्याचा महापर्वकाळ म्हणजे महाशिवरात्र!
प्रत्येक मनुष्य जीवानें शिवरूप होण्यासाठी 'मनापासून' जी उपासना करावी, तिला म्हणतात "शिवोपासना"!
विशेषतः ज्या शिवतत्वाच्या प्रेरणेनें हा जीव प्रपंचांत येतो, त्याच शिवप्रेरणेनें हा प्रपंच सत्यं, शिवम् आणि सुंदरम् करण्याचा संकल्पदिवस म्हणजे ही आजची पावन तिथी!
मग प्रापंचिकानें शिवरूप होण्यासाठी ही शिवोपासना कशी करावी?
शिवोपासना यांत शिव आणि उपासना असें दोन शब्द आले आहेत. शिव म्हणजे परमात्मा आणि उपासना म्हणजे जवळ असणें! तेंव्हा, शिव आपल्या जवळ 'प्रगटावस्थेत' असणें म्हणजेच शिवोपासना!
ही शिवोपासना करण्यासाठी म्हणजेच शिवरूप होण्यासाठी आपण शिवाचरण करायला हवं!
जसं शिवाचं आचरण तसंच आपलं आचरण असावं!
जे शिवाचे गुण तेच गुण आपल्यात जागृत करणे म्हणजे शिवरूप होणें म्हणजेच शिवाचरण. आणि हीच शिवोपासना! मग शिवाचें गुण कोणते?
जेंव्हा, हिमालयानें नारदाला आपल्या कन्येचं, पार्वतीचं भविष्यकथन करायला सांगितलं, तेंव्हा नारदानें सांगितलं हिचं वैवाहिक जीवन आदर्शवत् असेल. प्रत्येक स्त्री हिला माता मानेल!
तिच्या पतीचे गुण सांगा म्हंटल्यावर नारद महर्षीं म्हंटलें,
गुणहीन, मानहीन, माता-पिताविहीन, उदासीन, संशयहीन, जोगी, जटिल, अकाम मन, नगन, अमंगल बेष।
हे तिच्या पतीचें गुण आहेत. हे ऐकून पार्वती आणि तिच्या माता-पितांच्या डोळ्यांत अश्रू आले. माता-पितांच्या डोळ्यांत अश्रू दुःखानें आलें तर पार्वतीच्या डोळ्यांत अश्रू अत्यानंदानें आलें!
वरील वर्णन हे महादेवाचं आहे, हे सर्वांच्या ध्यानांत आलंच होतं. परंतु, इतके दोष असलेल्या वैराग्याला जावई करणं या माता-पितांना चुकीचं वाटत होतं. वरील गुणांवर आणि पार्वतीच्या लक्षणांवर प्रत्येकानें आत्मचिंतन करावं! या गुण-लक्षणांतून प्रत्येक स्त्री पार्वतीरूप आणि प्रत्येक पुरूष शिवरूप कसा होऊ शकतो हे बघुया!
प्रत्येक महिलेनें पार्वती चरित्र चिंतन करावं. पार्वती ही राजमहालातील ऐश्वर्यसंपन्न, सुखी जीवन सोडून एका जटाधारी बैराग्याची पत्नी का बनली? यांतून तिनें काय साधलं याचा विचार करून त्यातून बोध घ्यावा.
नारदाकडून पार्वतीच्या भावी पतीचें दहा गुण ऐकल्यावर ते गुण नसून दोष आहेत, असं पार्वतीच्या पालकांना वाटलं.
खरंतर गुण हा सद्गुण आहे की दुर्गुण हे तो धारण करणाऱ्यावर अवलंबून असतात. उदा. चोरी करणे हा गुण आपल्यात असेल तर तो दुर्गुण म्हंटला जातो. परंतु, तोच गुण श्रीकृष्णाचा सद्गुण म्हंटला जातो. चौराग्रगण्यम् ।
तेंव्हा, गुणहीन, मानहीन, माता-पिताविहीन, उदासीन, संशयहीन, जोगी, जटिल, अकाम मन, नगन, अमंगल बेष।
हे गुण वरकरणी दोष दिसत असले तरी शिव-पार्वती विवाहानें हेंच गुण सद्गुण आहेत, हे कळेल असं आश्वासन नारदानें दिलं....
वरील शिवगुण आपल्यात येण्यासाठी केलेला यत्न म्हणजे "शिवोपासना"!
गुणहीन:
शिव गुणहीन आहेत म्हणजे उपाधीरहीत. निर्लेप मनुष्य हा स्वच्छ व्यक्तिमत्वाचा असतो. आपण स्वतःला तसं गुणावगुणाच्या पलिकडे नेलं पाहिजे..
मानहीन:
मानाची हौस नाही. आपल्या सासऱ्यानें म्हणजे सतीचे पिता दक्ष राजानें सर्व देव, देवता, गंधर्व यांना बोलावलं. परंतु, देवांचा देव म्हणजे महादेवाला, जावयाला बोलावलं नाही, मुद्दाम. तरी त्याबद्दल खंत नाही.
आणि आपण किती लहानसहान गोष्टींच्या मानात अडकतो. तेंव्हा, मानहीन हा गुण आपल्यात आला म्हणजे आपल्यातील जीवत्वाला शिवत्वस्पर्श झालाच!
माता-पिताविहीन:
ज्याच्या आईवडिलांचा पत्ता नाही, कुळ गोत्र माहीत नाही, त्याला आपली मुलगी कोण देईल?
परंतु, शिव हाच उद्गाता, प्रेरक तत्व आहे. या शिवाच्या प्रेरणेनें जीव निर्माण झालें. त्यामुळें, तोच जगद्पिता आहे. भोळाभाव असल्यानें तोच जीवाची माता आहे.
आपण त्याच उद्गात्याचा अंश असल्यानें त्याच्या स्मरणानें जीव शिवत्व पावेल.
उदासिन:
शिव नित्य रामनामीं दंग असल्यानें सुखाची अभिलाषा आणि दुःखाची अनिच्छा याबद्दल उदासिन आहे.
'दुःखेषु अनुद्विग्न मनः । सुखेषु विगतस्पृहः ।।' ही आपली अवस्था होण्यासाठी शिव आदर्श ठेवून त्याच्याप्रमाणें रामनामीं रंगलं पाहिजे!
संशयहीन:
'संशयात्मा विनश्यति' हे वचन ध्यानांत ठेवून संशयहीन म्हणजे भगवंताप्रती पूर्ण विश्वास जागृत करणें म्हणजे शिवरूप होणें. शिव हा विश्वासाचं घनीभूत रूप आहे तर पार्वती ही श्रद्धारूपी मती आहे!
जोगी:
जोगी म्हणजे योगी! कर्म, भक्ती, ज्ञानाचा त्रिवेणी संगम म्हणजे योग. शिव हा श्रेष्ठतम योगी आहे. तसं योगी बनण्यासाठी "राम कर्ता" या तत्वाचं ज्ञान करून प्रत्येक कर्म स्मरणभक्तीनें करावं!
जटील:
जटाभार म्हणजे गुंता. तुम्ही भगवद्प्रेमांत गुंता म्हणजे जशी शिवाच्या जटेतून गंगा उगम पावली, तशी तुमच्या मुखातून नामगंगा वाहू लागेल....
अकाम मन:
मनांत कामवासना नसणें, हा शिवगुण आपल्याला विरागी बनवेल. मर्यादेचं भान करून देणारं मन म्हणजे अकाम मन म्हणजेच शिवमन!
नगन:
नग्न म्हणजे विकारांचं प्रावरण नाही. पूर्ण पारदर्शक. ही flawless transparency आपल्यात येण्यासाठी स्वार्थाचे कपडे सोडून सदाचरणाच्या मुक्तावस्थेत राहणें!
अमंगलवेष:
गळ्यात मुंढमाळा, अंगभर भस्म हा वेष अमंगल असं वरकरणी वाटत असेल. परंतु, या मुंढमाळा, भस्म आपल्याला स्मशानाचं स्मरण करून देतात.
मरणाचें स्मरण असावें। हरिभक्तीसी सादर व्हावें।।
Biology सांगते, आपण प्रत्येक क्षणी मरत असतो. तेंव्हा, प्रत्येक क्षण नामांत जावा, याचं स्मरण हा अमंगलवेष करून देत असतो. आपण सतत मरत असतो. राहिला प्रश्न चितेचा. तर, आपण चिंतारूपी चितेत नेहमीच जळत असतो. त्या चिंतेची राख करून ते भस्म शरीरभर ज्यानें फासलं तो जीवसुद्धां शिवरूप होईल!
वरील दहा गुण आपल्यात येण्याचा प्रत्येक पुरूषानें प्रयत्न करावा! आणि स्त्रीनें पार्वतीला आदर्श मानून आचरण करावं! यांत शिवतत्व जितकं आचरणीय आहे, तितकंच पार्वती मातेचं धर्माचरण महिलांसाठी आचरणीय आहे....
मुळात पार्वतीचा जन्मच शिवपदी प्रेम असल्यानें झाला आहे.
सतीं मरत हरि सन बरु मागा।
जनम जनम सिव पद अनुरागा॥
तेहि कारन हिमगिरि गृह जाई।
जनमीं पारबती तनु पाई॥
आपल्या पतीचा आपल्या माहेरी झालेला अवमान, निंदा सहन न झाल्यानें यज्ञांत सतीनें प्राणांची आहुती दिली. परंतु, त्याअगोदर शिवस्मरण करून वर मागितला की, 'जन्मोजन्मी शिवपदी अनुराग, प्रेम रहावं'!
आणि मग एका विरागीमध्यें अनुराग निर्माण करण्यासाठी हिमालयाची कन्या म्हणून सतीचा पार्वती नावानें जन्म झाला!
सती ही तर्कमिश्रीत मती होती, परंतु अग्नीप्रवेश केल्यावर तीचा तर्क जळून गेला आणि ती सती श्रद्धारूपी मती म्हणजे पार्वती बनली....
प्रत्येक महिलेनें सतीची मती आणि पार्वतीची श्रद्धा अंगी बाणावी. सतीचं पतीवर प्रेम होतं आणि पार्वतीचंही होतं. परंतु, सतीनें नको तिथें तर्क करून रामाला पत्नीविरहानें भटकणारा सामान्य मनुष्य समजून रामभक्त शिवाला दुखावलं. एवढंच नाही तर काही वेळाकरता सीतारूप धारण करून मर्यादा ओलांडली. त्याचवेळीं शिवानें सतीचा मानसिक त्याग केला.
स्त्रीनें मर्यादा ओलांडली तर काय होतं याचं हे एक मोठं उदाहरण!
नंतर पश्चात्ताप झाल्यावर तीच सती श्रद्धारूप बनली आणि जिथे शिव तिथें पार्वती हे सूत्र बनलं!
जिथें रामकथा, जेथें रामनाम तिथें रामभक्त शिव आणि जिथें शिव तिथें पार्वती!
तेंव्हा, प्रत्येक पुरूषानें वरील दहा गुण व प्रत्येक स्त्रीनें मर्यादा धारण केली तर खरी मनशुद्धी होईल व त्यांचं जीवन विश्वासरूपी शिव आणि श्रद्धारूपी पार्वती समान होईल!
🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺
("नामप्रेम" पुस्तकातून साभार)
🙏 !!! जानकी जीवन स्मरण जय जय राम !!! 
शंका- पू. कलावती आई मनशुद्धीसाठी शिवपूजन श्रेष्ठ मानतात. प्रापंचिकानें शिवरूप होण्यासाठी ही शिवोपासना कशी करावी? याबद्दल थोडं सांगावं.
➡
🌿🌿 ।। जय उमा महेश्वर ।। 🌿🌿
श्रीराम!
प्रपंच हा शारिरिक प्रधानतेने करावा; तर परमार्थ हा मानसिक प्रधानतेने करावा. मन हा इंद्रियाचा राजा । त्याची सर्वाआधी पुजा ।। या संतवचनाला प्रमाण मानून अगोदर मनाला शुद्ध सात्विक केलं तर परमार्थ उत्तम होईल आणि त्याच्या अधिष्ठानावर प्रपंच कल्याणकारी होईल.
प्रपंच आणि परमार्थ दोन्ही अंततोगत्वा समाधान देणारे होण्यासाठी मनशुद्धी नितांत आवश्यक आहे. जसे देहाचे अवयव हात, पाय, डोळे इ. आहेत; तसे मनाला शरीर मानले तर मनाचे सुद्धा अवयव आहेत. मनाचे अवयव म्हणजे विचार, कल्पना, भावना, स्मृती इ. या सर्व अवयवांना सात्विक बनवणं म्हणजे मनाची शुद्धी!
ही सर्वांगीण शुद्धी साधण्यासाठी अगोदर मनाची धारणा सुधारली पाहिजे. आज मनाची धारणा ही आहे की, 'मी जीव आहे'. ही धारणा 'मी शिव आहे' अशी वळवली की मन शुद्धीकरणाचा पाया आणि कळस दोन्ही साधेल!
मनशुद्धी संदर्भात पु. कलावती आईंच्या चिंतनाचा आपण संदर्भ दिला आहे. आईंचे आराध्य दैवत "शिव" आहे. आपण केवळ देहाने शिवपूजन करतो, परंतु मनाने शिवाला शिवले की जीव-शिव एकात्म्य साधले जाते, हे पु. आईंच्या चरित्राचं सार आहे, असं मला वाटतं. ते सार ध्यानात घेऊन आपण जर शिवरूप झालो तर सत्य आणि सुंदर काय आहे, याची अनुभूति येईल!
जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला त्याच्या उगमस्थानाचं म्हणजेच शिवाचं स्मरण करून देण्याचा महापर्वकाळ म्हणजे महाशिवरात्र!
प्रत्येक मनुष्य जीवानें शिवरूप होण्यासाठी 'मनापासून' जी उपासना करावी, तिला म्हणतात "शिवोपासना"!
विशेषतः ज्या शिवतत्वाच्या प्रेरणेनें हा जीव प्रपंचांत येतो, त्याच शिवप्रेरणेनें हा प्रपंच सत्यं, शिवम् आणि सुंदरम् करण्याचा संकल्पदिवस म्हणजे ही आजची पावन तिथी!
मग प्रापंचिकानें शिवरूप होण्यासाठी ही शिवोपासना कशी करावी?
शिवोपासना यांत शिव आणि उपासना असें दोन शब्द आले आहेत. शिव म्हणजे परमात्मा आणि उपासना म्हणजे जवळ असणें! तेंव्हा, शिव आपल्या जवळ 'प्रगटावस्थेत' असणें म्हणजेच शिवोपासना!
ही शिवोपासना करण्यासाठी म्हणजेच शिवरूप होण्यासाठी आपण शिवाचरण करायला हवं!
जसं शिवाचं आचरण तसंच आपलं आचरण असावं!
जे शिवाचे गुण तेच गुण आपल्यात जागृत करणे म्हणजे शिवरूप होणें म्हणजेच शिवाचरण. आणि हीच शिवोपासना! मग शिवाचें गुण कोणते?
जेंव्हा, हिमालयानें नारदाला आपल्या कन्येचं, पार्वतीचं भविष्यकथन करायला सांगितलं, तेंव्हा नारदानें सांगितलं हिचं वैवाहिक जीवन आदर्शवत् असेल. प्रत्येक स्त्री हिला माता मानेल!
तिच्या पतीचे गुण सांगा म्हंटल्यावर नारद महर्षीं म्हंटलें,
गुणहीन, मानहीन, माता-पिताविहीन, उदासीन, संशयहीन, जोगी, जटिल, अकाम मन, नगन, अमंगल बेष।
हे तिच्या पतीचें गुण आहेत. हे ऐकून पार्वती आणि तिच्या माता-पितांच्या डोळ्यांत अश्रू आले. माता-पितांच्या डोळ्यांत अश्रू दुःखानें आलें तर पार्वतीच्या डोळ्यांत अश्रू अत्यानंदानें आलें!
वरील वर्णन हे महादेवाचं आहे, हे सर्वांच्या ध्यानांत आलंच होतं. परंतु, इतके दोष असलेल्या वैराग्याला जावई करणं या माता-पितांना चुकीचं वाटत होतं. वरील गुणांवर आणि पार्वतीच्या लक्षणांवर प्रत्येकानें आत्मचिंतन करावं! या गुण-लक्षणांतून प्रत्येक स्त्री पार्वतीरूप आणि प्रत्येक पुरूष शिवरूप कसा होऊ शकतो हे बघुया!
प्रत्येक महिलेनें पार्वती चरित्र चिंतन करावं. पार्वती ही राजमहालातील ऐश्वर्यसंपन्न, सुखी जीवन सोडून एका जटाधारी बैराग्याची पत्नी का बनली? यांतून तिनें काय साधलं याचा विचार करून त्यातून बोध घ्यावा.
नारदाकडून पार्वतीच्या भावी पतीचें दहा गुण ऐकल्यावर ते गुण नसून दोष आहेत, असं पार्वतीच्या पालकांना वाटलं.
खरंतर गुण हा सद्गुण आहे की दुर्गुण हे तो धारण करणाऱ्यावर अवलंबून असतात. उदा. चोरी करणे हा गुण आपल्यात असेल तर तो दुर्गुण म्हंटला जातो. परंतु, तोच गुण श्रीकृष्णाचा सद्गुण म्हंटला जातो. चौराग्रगण्यम् ।
तेंव्हा, गुणहीन, मानहीन, माता-पिताविहीन, उदासीन, संशयहीन, जोगी, जटिल, अकाम मन, नगन, अमंगल बेष।
हे गुण वरकरणी दोष दिसत असले तरी शिव-पार्वती विवाहानें हेंच गुण सद्गुण आहेत, हे कळेल असं आश्वासन नारदानें दिलं....
वरील शिवगुण आपल्यात येण्यासाठी केलेला यत्न म्हणजे "शिवोपासना"!
गुणहीन:
शिव गुणहीन आहेत म्हणजे उपाधीरहीत. निर्लेप मनुष्य हा स्वच्छ व्यक्तिमत्वाचा असतो. आपण स्वतःला तसं गुणावगुणाच्या पलिकडे नेलं पाहिजे..
मानहीन:
मानाची हौस नाही. आपल्या सासऱ्यानें म्हणजे सतीचे पिता दक्ष राजानें सर्व देव, देवता, गंधर्व यांना बोलावलं. परंतु, देवांचा देव म्हणजे महादेवाला, जावयाला बोलावलं नाही, मुद्दाम. तरी त्याबद्दल खंत नाही.
आणि आपण किती लहानसहान गोष्टींच्या मानात अडकतो. तेंव्हा, मानहीन हा गुण आपल्यात आला म्हणजे आपल्यातील जीवत्वाला शिवत्वस्पर्श झालाच!
माता-पिताविहीन:
ज्याच्या आईवडिलांचा पत्ता नाही, कुळ गोत्र माहीत नाही, त्याला आपली मुलगी कोण देईल?
परंतु, शिव हाच उद्गाता, प्रेरक तत्व आहे. या शिवाच्या प्रेरणेनें जीव निर्माण झालें. त्यामुळें, तोच जगद्पिता आहे. भोळाभाव असल्यानें तोच जीवाची माता आहे.
आपण त्याच उद्गात्याचा अंश असल्यानें त्याच्या स्मरणानें जीव शिवत्व पावेल.
उदासिन:
शिव नित्य रामनामीं दंग असल्यानें सुखाची अभिलाषा आणि दुःखाची अनिच्छा याबद्दल उदासिन आहे.
'दुःखेषु अनुद्विग्न मनः । सुखेषु विगतस्पृहः ।।' ही आपली अवस्था होण्यासाठी शिव आदर्श ठेवून त्याच्याप्रमाणें रामनामीं रंगलं पाहिजे!
संशयहीन:
'संशयात्मा विनश्यति' हे वचन ध्यानांत ठेवून संशयहीन म्हणजे भगवंताप्रती पूर्ण विश्वास जागृत करणें म्हणजे शिवरूप होणें. शिव हा विश्वासाचं घनीभूत रूप आहे तर पार्वती ही श्रद्धारूपी मती आहे!
जोगी:
जोगी म्हणजे योगी! कर्म, भक्ती, ज्ञानाचा त्रिवेणी संगम म्हणजे योग. शिव हा श्रेष्ठतम योगी आहे. तसं योगी बनण्यासाठी "राम कर्ता" या तत्वाचं ज्ञान करून प्रत्येक कर्म स्मरणभक्तीनें करावं!
जटील:
जटाभार म्हणजे गुंता. तुम्ही भगवद्प्रेमांत गुंता म्हणजे जशी शिवाच्या जटेतून गंगा उगम पावली, तशी तुमच्या मुखातून नामगंगा वाहू लागेल....
अकाम मन:
मनांत कामवासना नसणें, हा शिवगुण आपल्याला विरागी बनवेल. मर्यादेचं भान करून देणारं मन म्हणजे अकाम मन म्हणजेच शिवमन!
नगन:
नग्न म्हणजे विकारांचं प्रावरण नाही. पूर्ण पारदर्शक. ही flawless transparency आपल्यात येण्यासाठी स्वार्थाचे कपडे सोडून सदाचरणाच्या मुक्तावस्थेत राहणें!
अमंगलवेष:
गळ्यात मुंढमाळा, अंगभर भस्म हा वेष अमंगल असं वरकरणी वाटत असेल. परंतु, या मुंढमाळा, भस्म आपल्याला स्मशानाचं स्मरण करून देतात.
मरणाचें स्मरण असावें। हरिभक्तीसी सादर व्हावें।।
Biology सांगते, आपण प्रत्येक क्षणी मरत असतो. तेंव्हा, प्रत्येक क्षण नामांत जावा, याचं स्मरण हा अमंगलवेष करून देत असतो. आपण सतत मरत असतो. राहिला प्रश्न चितेचा. तर, आपण चिंतारूपी चितेत नेहमीच जळत असतो. त्या चिंतेची राख करून ते भस्म शरीरभर ज्यानें फासलं तो जीवसुद्धां शिवरूप होईल!
वरील दहा गुण आपल्यात येण्याचा प्रत्येक पुरूषानें प्रयत्न करावा! आणि स्त्रीनें पार्वतीला आदर्श मानून आचरण करावं! यांत शिवतत्व जितकं आचरणीय आहे, तितकंच पार्वती मातेचं धर्माचरण महिलांसाठी आचरणीय आहे....
मुळात पार्वतीचा जन्मच शिवपदी प्रेम असल्यानें झाला आहे.
सतीं मरत हरि सन बरु मागा।
जनम जनम सिव पद अनुरागा॥
तेहि कारन हिमगिरि गृह जाई।
जनमीं पारबती तनु पाई॥
आपल्या पतीचा आपल्या माहेरी झालेला अवमान, निंदा सहन न झाल्यानें यज्ञांत सतीनें प्राणांची आहुती दिली. परंतु, त्याअगोदर शिवस्मरण करून वर मागितला की, 'जन्मोजन्मी शिवपदी अनुराग, प्रेम रहावं'!
आणि मग एका विरागीमध्यें अनुराग निर्माण करण्यासाठी हिमालयाची कन्या म्हणून सतीचा पार्वती नावानें जन्म झाला!
सती ही तर्कमिश्रीत मती होती, परंतु अग्नीप्रवेश केल्यावर तीचा तर्क जळून गेला आणि ती सती श्रद्धारूपी मती म्हणजे पार्वती बनली....
प्रत्येक महिलेनें सतीची मती आणि पार्वतीची श्रद्धा अंगी बाणावी. सतीचं पतीवर प्रेम होतं आणि पार्वतीचंही होतं. परंतु, सतीनें नको तिथें तर्क करून रामाला पत्नीविरहानें भटकणारा सामान्य मनुष्य समजून रामभक्त शिवाला दुखावलं. एवढंच नाही तर काही वेळाकरता सीतारूप धारण करून मर्यादा ओलांडली. त्याचवेळीं शिवानें सतीचा मानसिक त्याग केला.
स्त्रीनें मर्यादा ओलांडली तर काय होतं याचं हे एक मोठं उदाहरण!
नंतर पश्चात्ताप झाल्यावर तीच सती श्रद्धारूप बनली आणि जिथे शिव तिथें पार्वती हे सूत्र बनलं!
जिथें रामकथा, जेथें रामनाम तिथें रामभक्त शिव आणि जिथें शिव तिथें पार्वती!
तेंव्हा, प्रत्येक पुरूषानें वरील दहा गुण व प्रत्येक स्त्रीनें मर्यादा धारण केली तर खरी मनशुद्धी होईल व त्यांचं जीवन विश्वासरूपी शिव आणि श्रद्धारूपी पार्वती समान होईल!
🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺
("नामप्रेम" पुस्तकातून साभार)


अति सुंदर.....!
ReplyDeleteजय शिव शंकर!!!
ReplyDelete